शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी मनसेची पदयात्रा; अमित ठाकरेंच्या नेतृत्वात निघणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2023 11:38 IST

मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा असणार आहे. 

मुंबई :  गेल्या १२-१३ वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा (Mumbai-Goa Higway)महामार्गासाठीमनसेकडून (MNS)पदयात्रा काढण्यात येणार आहे. २३ ते ३० ऑगस्ट दरम्यान मुंबई-गोवा महामार्गावरमनसेची ही पदयात्रा निघणार आहे. मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा असणार आहे. 

नुकत्याच पनवेल येथे झालेल्या निर्धार मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना विविध प्रकारच्या आंदोलनातून मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा लावून धरण्याचे आदेश दिले होते. याच पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी ही पदयात्रा असणार आहे. या पदयात्रेमध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, ही पदयात्रा तीन टप्प्यात पार पडणार आहे. पहिल्या दोन टप्प्यात चालत ही पदयात्रा करण्यात येणार आहे. तर तिसऱ्या टप्प्यात मनससेकडून गाव जनजागृती अभियान राबवण्यात येणार आहे. 

दरम्यान, यासंदर्भात मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, महाराष्ट्रात रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. रस्त्याची दयनीय अवस्था आहे. विशेषतः मुंबई-गोवा महामार्गवर असंख्य खड्डे आहेत. या रस्त्यावर आतापर्यंत अनेक मृत्यू झाले आहेत. याबद्दल सरकार खंत व्यक्त करत नाही. सरकार गणपतीपर्यंत काम पूर्ण होणार असल्याचं फक्त आश्वासन देत आहे. त्यामुळे आम्ही ही जागर यात्रा काढणार आहोत, असे संदीप देशपांडे यांनी सांगितले. 

याचबरोबर, संदीप देशपांडे यांनी या पदयात्रेविषयी देखील माहिती दिली आहे. या यात्रेचा पहिला टप्पा हा पळस्पे ते माणगाव निघणार आहे. तर या यात्रेचा दुसरा टप्पा हा भरणी नाका ते राजापूर असणार आहे. तिसऱ्या टप्प्यात राजापूर ते बांदापर्यंत गाव जनजागृती अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती संदीप देशपांडे यांनी दिली आहे. तसेच, यावेळी कोकणातल्या लोकांनाही यात्रेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, मनसेचे या जनजागृती यात्रेला लोकांचा किती प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. 

राज ठाकरे यांनी दिला होता इशारामनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकताच पनवेलमध्ये निर्धार मेळावा घेतला होता. या मेळाव्यामध्ये मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरुन विरोधक आणि सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती. तसेच या मुद्द्यावरुन विविध प्रकारचे आंदोलन करण्याचे आदेश सुद्धा राज ठाकरे यांनी दिले होते. राज ठाकरे यांच्या मेळाव्यानंतर मनसे खड्ड्यांच्या मुद्द्यावर चांगलीच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

टॅग्स :Amit Thackerayअमित ठाकरेSandeep Deshpandeसंदीप देशपांडेhighwayमहामार्गMNSमनसे