शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

शिवाजी पार्कवर 'महायुती'चा दिपोत्सव? CM शिंदे, फडणवीस, राज एकाच मंचावर, चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2022 19:53 IST

आज मनसेकडून शिवाजी पार्कवर करण्यात आलेल्या दीपोत्सवाच्या कार्यक्रमात हे तीनही नेते एकत्र आल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण...

मुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जवळीक वाढल्याचे दिसून येत आहे. यातच, आज मनसेकडून शिवाजी पार्कवर करण्यात आलेल्या दीपोत्सवाच्या कार्यक्रमात हे तीनही नेते एकत्र आल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यावेळी मनसेच्या दीपोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज यांच्याकडून मुंख्यमंत्र्यांचा सत्कारही करण्यात आला. यानंतर मैदानावर फटाक्यांची जबरदस्त आतशबाजीही बघायला मिळाली. 

मनसेच्या या दीपोत्सव कार्यक्रमात प्रथमच मनसे प्रमुख राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र आल्याने, आता राज्यातील राजकीय वर्तुळात भाजप-मनसे आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्या महायुतीसंदर्भात चर्चा सुरू झाली आहे. मनसेच्या वतीने दिपावलीनिमित्त गेल्या १० वर्षांपासून शिवाजी पार्क मैदानावर या दिपोत्सवाचे आयोजन करण्यात येते.

यावेळी, राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. इश्वराने आपल्याला सुख समाधान आणि ऐश्वर्य द्यावे आपल्या सर्वांच्या जीवनात सुखाचे क्षण यावेत. दिवाळी हा महत्वाचा सण आहे. आपल्या या परिसरात लक्ष लक्ष दिवे प्रज्वलित झाले आहेत. या ठिकाणी जो प्रकाश बघायला मिळत आहे तसाच प्रकाश आपल्याही आयुष्यात यावा, अशा सब्दात फडणवीस यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी उपस्थितांना शुभेच्छा देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, हा दिपोत्सव गेल्या १० वर्षांपासून साजरा केला जातो. गेली दोन वर्षं कोरोनामुळे इच्छा असूनही अनेक उत्सव आपल्याला साजरे करता येत नव्हते. सर्वांना सोबत घेऊन ही दिवाळीची सुरुवात राज ठाकरे आणि सर्व सहकारी करतात मी त्यांचे अभिनंद करतो. आपण अनेक ठिकाणी बघतो की, दिवाळीत आपण आकाशकंदील लावून आणि रांगोळ्या काढून आनंद साजरा करतो. आपण नवरात्री आदी कार्यक्रमांत मोकळा श्वास घेतला आणि मोकळे झालो. दिवाळीची चांगली सुरुवात आहे. आनंद घेऊयात. 

बळीराजाला वाऱ्यावर सोडणार नाही -आम्ही ठरवले आहे, हे सरकार सर्वसामान्यांचे सरकार आहे. अनेक लोक भेटतात आपल्याला विनंती करतात. आपण त्यांच्या समस्या सोडवू शकतो. आपण शेतकऱ्यांनाही आधार द्यायला हवा. आमचे सरकार बळीराजाला वाऱ्यावर सोडणार नाही. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना जेवढे काही देता येईल, आपण तेवढे देऊ. सर्वांच्या जीवनात सुख समृद्धी आणण्यासाठी हे सरकार प्रयत्न करेल, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेMNSमनसेBJPभाजपा