शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

“जागा न मिळाल्याने रामदास आठवले हे राज ठाकरेंबद्दल बोलले असतील”; मनसे नेत्याचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 12:50 IST

MNS Vs Ramdas Athawale: राज ठाकरे धगधगता निखारा आहेत. रामदास आठवलेंची प्रेरणा घेऊन चार ओळी लिहिल्या आहेत, त्या त्यांनाच समर्पित करतो, असे सांगत मनसे नेत्याने खोचक टोला लगावला.

MNS Vs Ramdas Athawale:महायुतीतील जागावाटपाचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठकांचे सत्र सुरू आहे. यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीत सहभागी होणार की नाही, याबाबत अद्यापही स्पष्टता नाही. राज ठाकरेंना काही प्रस्ताव दिले असून, त्यावर चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे. राज ठाकरे यांच्या महायुतीतील समावेशाबाबत बोलताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी टीका केली होती. या टीकेला मनसेकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. 

राज ठाकरे स्वतंत्र लढण्यातच त्यांचा फायदा आहे. त्यांना घेऊन भाजपाचा फायदा होणार नाही. मी असताना राज ठाकरेंची आवश्यकता नाही, असे माझे मत आहे. राज ठाकरे महाराष्ट्रातील लोकप्रिय नेते आहेत. परंतु, ते महायुतीत येणार नाहीत. ते आले तरी त्यांना घेऊ नये असे माझे मत आहे, असे मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले होते. तसेच लोकसभेसाठी आम्हाला दोन जागा मिळाव्यात, यासाठी रामदास आठवले आग्रही होते. परंतु, रामदास आठवलेंना जागा मिळण्याची शक्यता मावळली असल्याचे बोलले जात आहे. यानंतर मनसे नेते प्रकाश महाजन यांनी रामदास आठवलेंना प्रत्युत्तर दिले.

जागा न मिळाल्याने रामदास आठवले हे राज ठाकरेंबद्दल बोलले असतील

मूळात राज ठाकरे यांना त्या विषयात का घेतले, हे माहिती नाही. रामदास आठवले हे शीघ्र कवी आहेत. रामदास आठवले यांच्याकडून प्रेरणा घेऊन चार ओळी लिहिल्या आहेत. या चार ओळी मी प्रथमच लिहिल्या आहेत. त्या रामदास आठवले यांना समर्पित करतो, असे सांगत, “अहो, आठवले साहेब, आपण बसलात भाजपाच्या ओसरीवर आणि राज साहेबांना घरात घ्यायचे नाही, हा सल्ला देता वरचेवर”, असा उपहासात्मक टोला प्रकाश महाजन यांनी रामदास आठवले यांना लगावला. 

राज ठाकरे कडवट हिंदुत्ववादी, धगधगता निखारा

रामदास आठवले यांना एकही जागा मिळाली नाही, त्या तणावातून ते राज ठाकरे यांच्याबद्दल बोलले असतील. राज ठाकरे यांना स्वतःचे मत आहे, स्वतःचे वलय आहे, राजकारणात त्यांच्याविषयी आकर्षण आहे. राज ठाकरे कडवट हिंदुत्ववादी आहेत. धर्मावर आले तर ते हिंदूंसाठी आहेत. मराठीवर आले तर मराठी माणसांसाठी आहेत. राज ठाकरे यांच्यासारखा धगधगता निखारा पदरात बांधून घेण्याची हिंमत फार कमी लोकांमध्ये आहे. त्यामुळे अन्य छोट्या मित्र पक्षांची किंवा मित्र पक्षातील नेत्यांची तुलना राज ठाकरे यांच्याशी होऊ शकत नाही, असे प्रकाश महाजन यांनी सांगितले.

दरम्यान, महायुतीत सहभागी झाल्यास राज ठाकरे यांना एक ते दोन जागांचा प्रस्ताव दिला असून, महायुतीतील एका पक्षाच्या चिन्हावर लढावे, असे सुचवले आहे. मात्र, असा प्रस्ताव राज ठाकरेंनी फेटाळल्याची चर्चा आहे. यावर बोलताना प्रकाश महाजन म्हणाले की, दुसऱ्याच्या चिन्हावर लढण्याचा ठराव राज ठाकरे यांनी फेटाळला असेल, तर ते माझे नेते आहेत, याचा मला सार्थ अभिमान आहे. कोणताही स्वाभिमानी नेता आपले चिन्ह सोडून दुसऱ्याच्या चिन्हावर निवडणूक लढवत नाही. राज ठाकरे यांनी हा बाणेदारपणा दाखवला असेल, तर मला त्यांचा अभिमान आहे, असे महाजन यांनी नमूद केले. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेMahayutiमहायुतीRamdas Athawaleरामदास आठवलेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४