शहरं
Join us  
Trending Stories
1
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले
4
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
5
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
6
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
7
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
8
पुत्रदा एकादशी-बुध प्रदोष: ८ राशींना सर्वोत्तम काळ, शुभ-लाभ; हाती पैसा राहील, कल्याण होईल!
9
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
10
वसईची भयंकर घटना, मुंबईला धोक्याची घंटा!
11
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
12
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
13
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
14
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
15
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
16
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
17
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
18
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
19
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
20
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ

मनसे नेते प्रकाश महाजनांची उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर खोचक टीका, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 15:36 IST

साधारणत: कुणीही मुख्यमंत्री असला ज्येष्ठ पोलीस अधिकारी त्यांना सकाळ-संध्याकाळ रिपोर्ट करत असतात. मग यांना कसं कळालं नाही याचा अर्थ उद्धव ठाकरे अतिशय बेसावध होते असं विधान मनसे नेते प्रकाश महाजनांनी केले आहे.

औरंगाबाद - उद्धव ठाकरे-संजय राऊत यांची मुलाखत पाहिली तर महाराष्ट्रात काही वर्षापूर्वी काळू-बाळूचा तमाशा खूप प्रसिद्ध होता. यात एकाने जय महाराष्ट्र बोललं त्याने तिकडून जय महाराष्ट्र बोलायचं. माजी मुख्यमंत्र्यांच्या तोंडून जय महाराष्ट्र म्हणताना मांजरही म्याव जोरात बोलते असं दिसून येते. बापजाद्याच्या संपत्ती घालवली. पत्रकार यांचा, नेता यांचा, प्रश्न यांचे आणि उत्तरही यांचेच आहेत. आडवा-तिडवा प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला मुलाखत दिली असती तर मुलाखत पाहिली असती. बाळासाहेबांच्या नावावर सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे असा आरोप मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केला आहे. 

प्रकाश महाजन म्हणाले की, सत्तेत असताना बाळासाहेबांचे फोटो दिसले नाही. गेलेली इज्जत, प्रतिष्ठा मिळवण्यासाठी मुलाखतीत बाळासाहेबांचा फोटो ठेवला. आपल्यासोबत लोक २५-३० वर्ष काम करतात तेव्हा ते चांगले असतात. परंतु ते सोडून गेले तर त्यांच्याविषयी चांगले बोलता येत नसले तरी वाईट बोलू नये एवढंही मोठं मन नाही. त्रयस्थ म्हणून आजच्या गोष्टीकडे पाहिले तर राजा हा संशयी नसला पाहिजे सावधान असला पाहिजे. शिवाजी महाराज सावधान होते औरंगजेबासारखे संशयी नव्हते. उद्धव ठाकरे संशयी आहेत परंतु सावधान नव्हते. आपल्या सहकाऱ्यांच्या मनात काय चाललंय? ते समजून घ्यावं. स्वत:मध्ये बदल करावा, यात उद्धव ठाकरे कमी पडले असं त्यांनी म्हटलं. 

तसेच साधारणत: कुणीही मुख्यमंत्री असला ज्येष्ठ पोलीस अधिकारी त्यांना सकाळ-संध्याकाळ रिपोर्ट करत असतात. मग यांना कसं कळालं नाही याचा अर्थ उद्धव ठाकरे अतिशय बेसावध होते. आजूबाजूचे लोक सांगत होते त्यावर विश्वास ठेवत बसले. महाराष्ट्राचा माजी मुख्यमंत्री आजारपणावर सहानुभूती मिळवतो. डास बसल्यावर खाजवू कसं असा प्रश्न पडला. तुम्ही मुख्यमंत्री होता ४ माणसं सोबत ठेवून पाहिजे तिथे खाजवून घ्यायचं ना. मुलाखतीत हे सांगण्याची गोष्ट आहे का? पर्रिकरांनी कुठल्या अवस्थेत अर्थसंकल्प मांडला ते देशाने पाहिले आहे. खाजवावा हा प्रश्न माजी मुख्यमंत्र्यांना पडत असेल तर जनतेला डोकं खाजवावं लागेल असा खोचक टोला प्रकाश महाजनांनी उद्धव ठाकरेंना लगावला. 

दरम्यान, मला या स्थिती गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन आणि बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येते. अशाप्रकारे समस्या आली तर कुशलतेने सोडवणूक करायचे. ज्यांचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता होईल हे युतीचं सूत्र होते. पण ते आता बिघडले गेले. छोट्या-मोठ्या गोष्टी घडत होत्या परंतु युती तिघांनी तुटू दिली नाही. मनोहर जोशींचा राजीनामा घेतला तेव्हा बाळासाहेबांनी प्रमोद महाजन-गोपीनाथ मुंडे यांना फोन करून सांगितले. हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न होता परंतु समन्वय होता. मात्र या तिघांच्या निधनानंतर हा समन्वय संपला असंही महाजनांनी सांगितले. 

टॅग्स :MNSमनसेUddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊतShiv Senaशिवसेना