शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

मनसे नेते प्रकाश महाजनांची उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर खोचक टीका, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 15:36 IST

साधारणत: कुणीही मुख्यमंत्री असला ज्येष्ठ पोलीस अधिकारी त्यांना सकाळ-संध्याकाळ रिपोर्ट करत असतात. मग यांना कसं कळालं नाही याचा अर्थ उद्धव ठाकरे अतिशय बेसावध होते असं विधान मनसे नेते प्रकाश महाजनांनी केले आहे.

औरंगाबाद - उद्धव ठाकरे-संजय राऊत यांची मुलाखत पाहिली तर महाराष्ट्रात काही वर्षापूर्वी काळू-बाळूचा तमाशा खूप प्रसिद्ध होता. यात एकाने जय महाराष्ट्र बोललं त्याने तिकडून जय महाराष्ट्र बोलायचं. माजी मुख्यमंत्र्यांच्या तोंडून जय महाराष्ट्र म्हणताना मांजरही म्याव जोरात बोलते असं दिसून येते. बापजाद्याच्या संपत्ती घालवली. पत्रकार यांचा, नेता यांचा, प्रश्न यांचे आणि उत्तरही यांचेच आहेत. आडवा-तिडवा प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला मुलाखत दिली असती तर मुलाखत पाहिली असती. बाळासाहेबांच्या नावावर सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे असा आरोप मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केला आहे. 

प्रकाश महाजन म्हणाले की, सत्तेत असताना बाळासाहेबांचे फोटो दिसले नाही. गेलेली इज्जत, प्रतिष्ठा मिळवण्यासाठी मुलाखतीत बाळासाहेबांचा फोटो ठेवला. आपल्यासोबत लोक २५-३० वर्ष काम करतात तेव्हा ते चांगले असतात. परंतु ते सोडून गेले तर त्यांच्याविषयी चांगले बोलता येत नसले तरी वाईट बोलू नये एवढंही मोठं मन नाही. त्रयस्थ म्हणून आजच्या गोष्टीकडे पाहिले तर राजा हा संशयी नसला पाहिजे सावधान असला पाहिजे. शिवाजी महाराज सावधान होते औरंगजेबासारखे संशयी नव्हते. उद्धव ठाकरे संशयी आहेत परंतु सावधान नव्हते. आपल्या सहकाऱ्यांच्या मनात काय चाललंय? ते समजून घ्यावं. स्वत:मध्ये बदल करावा, यात उद्धव ठाकरे कमी पडले असं त्यांनी म्हटलं. 

तसेच साधारणत: कुणीही मुख्यमंत्री असला ज्येष्ठ पोलीस अधिकारी त्यांना सकाळ-संध्याकाळ रिपोर्ट करत असतात. मग यांना कसं कळालं नाही याचा अर्थ उद्धव ठाकरे अतिशय बेसावध होते. आजूबाजूचे लोक सांगत होते त्यावर विश्वास ठेवत बसले. महाराष्ट्राचा माजी मुख्यमंत्री आजारपणावर सहानुभूती मिळवतो. डास बसल्यावर खाजवू कसं असा प्रश्न पडला. तुम्ही मुख्यमंत्री होता ४ माणसं सोबत ठेवून पाहिजे तिथे खाजवून घ्यायचं ना. मुलाखतीत हे सांगण्याची गोष्ट आहे का? पर्रिकरांनी कुठल्या अवस्थेत अर्थसंकल्प मांडला ते देशाने पाहिले आहे. खाजवावा हा प्रश्न माजी मुख्यमंत्र्यांना पडत असेल तर जनतेला डोकं खाजवावं लागेल असा खोचक टोला प्रकाश महाजनांनी उद्धव ठाकरेंना लगावला. 

दरम्यान, मला या स्थिती गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन आणि बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येते. अशाप्रकारे समस्या आली तर कुशलतेने सोडवणूक करायचे. ज्यांचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता होईल हे युतीचं सूत्र होते. पण ते आता बिघडले गेले. छोट्या-मोठ्या गोष्टी घडत होत्या परंतु युती तिघांनी तुटू दिली नाही. मनोहर जोशींचा राजीनामा घेतला तेव्हा बाळासाहेबांनी प्रमोद महाजन-गोपीनाथ मुंडे यांना फोन करून सांगितले. हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न होता परंतु समन्वय होता. मात्र या तिघांच्या निधनानंतर हा समन्वय संपला असंही महाजनांनी सांगितले. 

टॅग्स :MNSमनसेUddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊतShiv Senaशिवसेना