शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
5
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
6
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
7
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
8
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
9
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
10
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
11
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
12
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
13
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
14
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
15
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
16
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
17
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
18
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
19
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
20
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?

Raj Thackeray:...अन् उद्धव ठाकरेंना अडीच वर्षाचा साक्षात्कार झाला; राज ठाकरेंचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2022 22:45 IST

MNS Gudhipadva Melava Raj Thackeray: व्यासपीठांवर एकमेकांना शिव्या घालून पुन्हा सत्तेसाठी मांडीवर जाऊन बसता. तुमच्या आतील झंगाटाशी आमच्याशी काय संबंध? असा सवाल राज ठाकरेंनी केला.

मुंबई – २०१९ झालेली विधानसभा निवडणूक आठवा. भाजपा-शिवसेना विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी. निकाल लागल्यानंतर शिवसेनेला विशेषत: उद्धव ठाकरेंना साक्षात्कार झाला. अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाबाबत भाषणात एकदाही बोलले नाही. पंतप्रधानासमोर भाषण केले तेव्हाही काही बोलले नाहीत. अमित शाह भाषणात म्हणाले मुख्यमंत्री भाजपाचा होईल. तेव्हाही काही बोलले नाही. मात्र निकाल लागल्यानंतर आपल्यामुळे सरकार अडकतंय हे लक्षात आले. त्यावेळी अडीच वर्षाची टूम काढली असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी शिवसेनेला लगावला.

मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे म्हणाले की, अमित शाहांशी एकांतात बोलला होता मग ते बाहेर का बोलला नाही. मुख्यमंत्रिपद हे महाराष्ट्राचं जनतेचे आहे. मग चार भिंतीत ही गोष्ट का केली? अमित शाह बोलतात आम्ही काही बोललो नाही. पहाटे शपथविधी झाला पाहतो तर जोडा वेगळाच होता. पळून कुणासोबत गेले लग्न कुणासोबत केले काहीच कळालं नाही. राज्यातील ३ नंबरचा पक्ष पहिल्या आणि दुसऱ्या पक्षाला फिरवतोय. व्यासपीठांवर एकमेकांना शिव्या घालून पुन्हा सत्तेसाठी मांडीवर जाऊन बसता. तुमच्या आतील झंगाटाशी आमच्याशी काय संबंध? असा सवाल त्यांनी केला.

तसेच ज्या मतदारांनी तुम्हाला मतदान केले ते शिवसेना-भाजपासाठी केले होते. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्यासाठी नाही. मतदारांशी गद्दारी करण्याला कोणतं शासन करणार? कुणीही यावं जनतेला फरफटत न्यावं. हे विसरून जाता ना हेच हवं. सगळ्या गोष्टी आपण विसरतो. रोज नवनवीन बातम्या घडतात. मूळ विषय बाजूला न्यायचा असा आरोपही मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला.

दरम्यान, भाषणाच्या सुरुवातीला राज ठाकरेंनी महाराष्ट्र सैनिकांचे आभार मानले. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आलेल्या महाराष्ट्र सैनिकांचे दर्शन घेताना मला खूप आनंद होतोय. ३ वर्षापूर्वी ज्यावेळी इथं गुढीपाडवा मेळावा झाला. त्यानंतर २ वर्ष हा मेळावा घेता आला नाही. लॉकडाऊनचा काळ आठवला तर काही वेळ बरं वाटतं तर काही वेळा त्रास होतो. आज गजबजलेलं शिवतीर्थ सामसूम होतं. जगभरात शांतता होती. माणूसही दिसत नव्हता. लॉकडाऊनमुळे अनेक गोष्टी विस्मरणात गेल्या. त्यामुळे आजच्या सभेत थोडा फ्लॅशबॅक देऊ. २ वर्षापूर्वी झालेल्या घटना आपण विसरलो. तुम्ही विसरता तेच यांना फायद्याचं होतं. विस्मरणात जाऊन कसं चालेल असं म्हटलं.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना