शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

Raj Thackeray:...अन् उद्धव ठाकरेंना अडीच वर्षाचा साक्षात्कार झाला; राज ठाकरेंचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2022 22:45 IST

MNS Gudhipadva Melava Raj Thackeray: व्यासपीठांवर एकमेकांना शिव्या घालून पुन्हा सत्तेसाठी मांडीवर जाऊन बसता. तुमच्या आतील झंगाटाशी आमच्याशी काय संबंध? असा सवाल राज ठाकरेंनी केला.

मुंबई – २०१९ झालेली विधानसभा निवडणूक आठवा. भाजपा-शिवसेना विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी. निकाल लागल्यानंतर शिवसेनेला विशेषत: उद्धव ठाकरेंना साक्षात्कार झाला. अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाबाबत भाषणात एकदाही बोलले नाही. पंतप्रधानासमोर भाषण केले तेव्हाही काही बोलले नाहीत. अमित शाह भाषणात म्हणाले मुख्यमंत्री भाजपाचा होईल. तेव्हाही काही बोलले नाही. मात्र निकाल लागल्यानंतर आपल्यामुळे सरकार अडकतंय हे लक्षात आले. त्यावेळी अडीच वर्षाची टूम काढली असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी शिवसेनेला लगावला.

मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे म्हणाले की, अमित शाहांशी एकांतात बोलला होता मग ते बाहेर का बोलला नाही. मुख्यमंत्रिपद हे महाराष्ट्राचं जनतेचे आहे. मग चार भिंतीत ही गोष्ट का केली? अमित शाह बोलतात आम्ही काही बोललो नाही. पहाटे शपथविधी झाला पाहतो तर जोडा वेगळाच होता. पळून कुणासोबत गेले लग्न कुणासोबत केले काहीच कळालं नाही. राज्यातील ३ नंबरचा पक्ष पहिल्या आणि दुसऱ्या पक्षाला फिरवतोय. व्यासपीठांवर एकमेकांना शिव्या घालून पुन्हा सत्तेसाठी मांडीवर जाऊन बसता. तुमच्या आतील झंगाटाशी आमच्याशी काय संबंध? असा सवाल त्यांनी केला.

तसेच ज्या मतदारांनी तुम्हाला मतदान केले ते शिवसेना-भाजपासाठी केले होते. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्यासाठी नाही. मतदारांशी गद्दारी करण्याला कोणतं शासन करणार? कुणीही यावं जनतेला फरफटत न्यावं. हे विसरून जाता ना हेच हवं. सगळ्या गोष्टी आपण विसरतो. रोज नवनवीन बातम्या घडतात. मूळ विषय बाजूला न्यायचा असा आरोपही मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला.

दरम्यान, भाषणाच्या सुरुवातीला राज ठाकरेंनी महाराष्ट्र सैनिकांचे आभार मानले. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आलेल्या महाराष्ट्र सैनिकांचे दर्शन घेताना मला खूप आनंद होतोय. ३ वर्षापूर्वी ज्यावेळी इथं गुढीपाडवा मेळावा झाला. त्यानंतर २ वर्ष हा मेळावा घेता आला नाही. लॉकडाऊनचा काळ आठवला तर काही वेळ बरं वाटतं तर काही वेळा त्रास होतो. आज गजबजलेलं शिवतीर्थ सामसूम होतं. जगभरात शांतता होती. माणूसही दिसत नव्हता. लॉकडाऊनमुळे अनेक गोष्टी विस्मरणात गेल्या. त्यामुळे आजच्या सभेत थोडा फ्लॅशबॅक देऊ. २ वर्षापूर्वी झालेल्या घटना आपण विसरलो. तुम्ही विसरता तेच यांना फायद्याचं होतं. विस्मरणात जाऊन कसं चालेल असं म्हटलं.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना