शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

Maharashtra Political Crisis : "ठाकरे पिता-पुत्रांनी गुवाहाटी गाठावी आणि शिंदेंसह सर्व आमदारांना बैलगाडीतून परत घेऊन यावे"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 12:34 IST

MNS Gajanan Kale Slams Uddhav Thackeray And Aaditya Thackeray : सत्तापेच शिगेला पोहोचला आहे. याच दरम्यान मनसेने पुन्हा एकदा ठाकरे सरकारला खोचक टोला लगावला आहे. तसेच यांची उलटी गिनती सुरू झाली आहे असं म्हणत हल्लाबोल केला आहे. 

मुंबई - राज्यातील सत्ता संघर्षात आजचा दिवस अत्यंत महत्वाचा ठरू शकतो. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपाकडून काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे विधानसभेत बहुमत चाचणी घेण्याची मागणी करण्यात आली आहे. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना पुन्हा एकदा पत्राच्या माध्यमातून परत येण्याचं आवाहन केल्यानंतरही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट आपल्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे सत्तापेच शिगेला पोहोचला आहे. याच दरम्यान मनसेने पुन्हा एकदा ठाकरे सरकारला खोचक टोला लगावला आहे. तसेच यांची उलटी गिनती सुरू झाली आहे असं म्हणत जोरदार हल्लाबोल केला आहे. 

"ठाकरे पिता-पुत्रांनी गुवाहाटी गाठावी आणि शिंदेंसह सर्व आमदारांना बैलगाडीतून परत घेऊन यावे" असं म्हणत आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. मनसेचे प्रवक्ते गजानन काळे (MNS Gajanan Kale) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "भावनिक साद घालण्यापेक्षा ठाकरे पिता-पुत्रांनी आता थेट गुवाहाटी गाठावी आणि शिंदेंसह सर्व आमदारांना बैलगाडीतून परत घेऊन यावे. ( विमानाचा खर्च परवडणार नाही) नाहीतर छोटे नवाब यांना पण शिंदे सेनेत सामील करून स्वतःचे मुख्यमंत्री पद नाही पण किमान छोटे नवाब यांचे मंत्रीपद तरी वाचवावे" असं काळे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

गजानन काळे यांनी आणखी एक ट्विट केलं आहे. यामध्ये "महाराष्ट्राचं दैवत' छत्रपती शिवाजी महाराज' आणि वंदनीय' बाळासाहेब'यांची प्रतिमा व्यासपीठाखाली व चिंपाट विश्वप्रवक्ते व्यासपीठावर. यामुळेच यांची उलटी गिनती सुरू झाली आहे. या कृतीतून'नवाब सेनेने' दाखवून दिले आहे की त्यांना ना बाळासाहेबांचे विचार मान्य आहेत ना छत्रपतींचे हिंदवी स्वराज्य" असं म्हणत शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. 

मनोहर जोशींचे घर जाळण्याचा आदेश कुणी दिला? याबाबत आता सदा सरवणकरांनी मोठा गौप्यस्फोट केला. यावरूनही मनसेने ठाकरे सरकारला आणि शिवसेनेला खोचक टोला लगावला होता. "मनोहर जोशींचे घर जाळण्याचे आदेश संजय राऊत यांनी दिले होते असं आमदार सरवणकर यांनी म्हटलं आहे. इतरांची घरं जाळता, जाळता स्वतःचं घर कधी पेटलं कळलंच नाही" असं गजानन काळे यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. तसेच अहो पण आता राहिलय कोण? असं म्हणत एक व्यंगचित्रही शेअर केलं होतं.  

टॅग्स :MNSमनसेUddhav Thackerayउद्धव ठाकरेAditya Thackreyआदित्य ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ