शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
6
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
7
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

Maharashtra Political Crisis : "ठाकरे पिता-पुत्रांनी गुवाहाटी गाठावी आणि शिंदेंसह सर्व आमदारांना बैलगाडीतून परत घेऊन यावे"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 12:34 IST

MNS Gajanan Kale Slams Uddhav Thackeray And Aaditya Thackeray : सत्तापेच शिगेला पोहोचला आहे. याच दरम्यान मनसेने पुन्हा एकदा ठाकरे सरकारला खोचक टोला लगावला आहे. तसेच यांची उलटी गिनती सुरू झाली आहे असं म्हणत हल्लाबोल केला आहे. 

मुंबई - राज्यातील सत्ता संघर्षात आजचा दिवस अत्यंत महत्वाचा ठरू शकतो. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपाकडून काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे विधानसभेत बहुमत चाचणी घेण्याची मागणी करण्यात आली आहे. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना पुन्हा एकदा पत्राच्या माध्यमातून परत येण्याचं आवाहन केल्यानंतरही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट आपल्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे सत्तापेच शिगेला पोहोचला आहे. याच दरम्यान मनसेने पुन्हा एकदा ठाकरे सरकारला खोचक टोला लगावला आहे. तसेच यांची उलटी गिनती सुरू झाली आहे असं म्हणत जोरदार हल्लाबोल केला आहे. 

"ठाकरे पिता-पुत्रांनी गुवाहाटी गाठावी आणि शिंदेंसह सर्व आमदारांना बैलगाडीतून परत घेऊन यावे" असं म्हणत आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. मनसेचे प्रवक्ते गजानन काळे (MNS Gajanan Kale) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "भावनिक साद घालण्यापेक्षा ठाकरे पिता-पुत्रांनी आता थेट गुवाहाटी गाठावी आणि शिंदेंसह सर्व आमदारांना बैलगाडीतून परत घेऊन यावे. ( विमानाचा खर्च परवडणार नाही) नाहीतर छोटे नवाब यांना पण शिंदे सेनेत सामील करून स्वतःचे मुख्यमंत्री पद नाही पण किमान छोटे नवाब यांचे मंत्रीपद तरी वाचवावे" असं काळे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

गजानन काळे यांनी आणखी एक ट्विट केलं आहे. यामध्ये "महाराष्ट्राचं दैवत' छत्रपती शिवाजी महाराज' आणि वंदनीय' बाळासाहेब'यांची प्रतिमा व्यासपीठाखाली व चिंपाट विश्वप्रवक्ते व्यासपीठावर. यामुळेच यांची उलटी गिनती सुरू झाली आहे. या कृतीतून'नवाब सेनेने' दाखवून दिले आहे की त्यांना ना बाळासाहेबांचे विचार मान्य आहेत ना छत्रपतींचे हिंदवी स्वराज्य" असं म्हणत शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. 

मनोहर जोशींचे घर जाळण्याचा आदेश कुणी दिला? याबाबत आता सदा सरवणकरांनी मोठा गौप्यस्फोट केला. यावरूनही मनसेने ठाकरे सरकारला आणि शिवसेनेला खोचक टोला लगावला होता. "मनोहर जोशींचे घर जाळण्याचे आदेश संजय राऊत यांनी दिले होते असं आमदार सरवणकर यांनी म्हटलं आहे. इतरांची घरं जाळता, जाळता स्वतःचं घर कधी पेटलं कळलंच नाही" असं गजानन काळे यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. तसेच अहो पण आता राहिलय कोण? असं म्हणत एक व्यंगचित्रही शेअर केलं होतं.  

टॅग्स :MNSमनसेUddhav Thackerayउद्धव ठाकरेAditya Thackreyआदित्य ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ