शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

"गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांपुढे अडचणी अन् बकरी ईदसाठी सुविधांची खैरात'; मनसेचं ठाकरे सरकारवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2020 15:27 IST

त्या इतिवृत्तानुसार ७ ऑगस्टनंतर कोकणात कोणालाही प्रवेश मिळणार नसल्याचीही माहिती पसरली होती. त्यानंतर या विषयावरून बराच गदारोळ झाला.

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून देशात लॉकडाऊन असल्यानं जिल्ह्याबाहेर जाण्यासाठीही ई-पासची आवश्यकता करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या  मोठी आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीतील इतिवृत्त बाहेर आलं होतं,  त्या इतिवृत्तानुसार ७ ऑगस्टनंतर कोकणात कोणालाही प्रवेश मिळणार नसल्याचीही माहिती पसरली होती. त्यानंतर या विषयावरून बराच गदारोळ झाला. विरोधकांनी सरकारच्या विरोधात टीकेची झोड उठवली, आता मनसेनंही त्याच मुद्द्यावरून शिवसेनेला कोंडीत पकडलं आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनीदेखील कोकणातील चाकरमान्यांचा प्रश्न उपस्थित करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. कोकणात जाण्यासाठी शासनाने काहीच व्यवस्था केली नसल्याचं म्हणत त्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना अडचणी आहेत, पण बकरी ईद साजरी करणाऱ्यांना सुविधा दिल्या जात आहेत, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली. टीव्ही ९कडे त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोकणात दरवर्षी मोठ्या प्रमाणात गणेशोत्सवाच्या काळात लोक जात असतात. पण यंदा कोरोनाच्या संकटातही त्यांना गावी जाण्यासाठी शासनाकडून ठोस अशी कोणतीच व्यवस्था नाही.परराज्यांतील लोकांना त्यांच्या राज्यात पाठवण्याची व्यवस्था केली आणि ते जाऊन परतसुद्धा आले आहेत,” असं टीकास्त्र संदीप देशपांडेंनी सोडलं आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे, पण बकरी ईद साजरी करणाऱ्यांना सुविधा दिल्या जात आहेत, असं म्हणत ठाकरे सरकारविरोधात घणाघात  केला. राज्य सरकार काही व्यवस्था करू शकत नसल्यास आम्ही बसेसची व्यवस्था करू, सरकारने आम्हाला परवानगी द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्यासाठी रेल्वे, एसटी सुरू कराकोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने केलेल्या नियमांचे पालन करत गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या वाहतुकीची व्यवस्था म्हणून कोकण रेल्वे मार्गावर रेल्वे व कोकणात एसटी बस फेऱ्या सुरू कराव्यात, अशी मागणी कोकण रेल्वे समन्वयक समितीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे केली आहे. त्यांनी सरकारला एक निवेदनही दिलं आहे. गणपतीत गावी जाणाऱ्यांची संख्या कमी असली, तरीही गावची घरे संपूर्ण बंद असणे, सर्व नातेवाईक बाहेरगावी असणे या व इतर काही कारणांमुळे बऱ्याच नागरिकांना गावी जाणे भाग असते, असे या निवेदनात म्हटले आहे. 

हेही वाचा

दररोज 3GB डेटा देणारे तीन कंपन्यांचे सर्वात स्वस्त प्लॅन; जाणून घ्या सर्वकाही

"सत्तेसाठी मोदी ताकदवान नेता असल्याची खोटी प्रतिमा पसरवली; आता तीच ठरतेय भारताची दुर्बलता"

भारतीय लष्कराची तयारी पाहून चीन बिथरला; तिबेटमध्ये बनवलं थेट 'उडतं हॉस्पिटल'

सोन्याचे भाव पुन्हा एकदा झाले कमी, असे आहेत आजचे दर

सोन्याची वायदा बाजारातील किंमत कमी झाली; जाणून घ्या...

ग्रामीण बँकांमध्ये 9638 पदांसाठी नोकऱ्यांची खैरात! उद्या संपणार मुदत, असा करा अर्ज

सरकारच्या 'या' योजनेत पाच वर्षांसाठी १ लाख गुंतवल्यावर मिळतोय मोठा लाभ, पैसेही राहणार सुरक्षित

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरे