शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
3
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
4
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
5
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
6
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
7
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
8
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
9
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
10
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
12
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
13
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
14
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
15
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
16
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
17
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
18
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
19
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
20
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा

"गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांपुढे अडचणी अन् बकरी ईदसाठी सुविधांची खैरात'; मनसेचं ठाकरे सरकारवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2020 15:27 IST

त्या इतिवृत्तानुसार ७ ऑगस्टनंतर कोकणात कोणालाही प्रवेश मिळणार नसल्याचीही माहिती पसरली होती. त्यानंतर या विषयावरून बराच गदारोळ झाला.

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून देशात लॉकडाऊन असल्यानं जिल्ह्याबाहेर जाण्यासाठीही ई-पासची आवश्यकता करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या  मोठी आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीतील इतिवृत्त बाहेर आलं होतं,  त्या इतिवृत्तानुसार ७ ऑगस्टनंतर कोकणात कोणालाही प्रवेश मिळणार नसल्याचीही माहिती पसरली होती. त्यानंतर या विषयावरून बराच गदारोळ झाला. विरोधकांनी सरकारच्या विरोधात टीकेची झोड उठवली, आता मनसेनंही त्याच मुद्द्यावरून शिवसेनेला कोंडीत पकडलं आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनीदेखील कोकणातील चाकरमान्यांचा प्रश्न उपस्थित करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. कोकणात जाण्यासाठी शासनाने काहीच व्यवस्था केली नसल्याचं म्हणत त्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना अडचणी आहेत, पण बकरी ईद साजरी करणाऱ्यांना सुविधा दिल्या जात आहेत, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली. टीव्ही ९कडे त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोकणात दरवर्षी मोठ्या प्रमाणात गणेशोत्सवाच्या काळात लोक जात असतात. पण यंदा कोरोनाच्या संकटातही त्यांना गावी जाण्यासाठी शासनाकडून ठोस अशी कोणतीच व्यवस्था नाही.परराज्यांतील लोकांना त्यांच्या राज्यात पाठवण्याची व्यवस्था केली आणि ते जाऊन परतसुद्धा आले आहेत,” असं टीकास्त्र संदीप देशपांडेंनी सोडलं आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे, पण बकरी ईद साजरी करणाऱ्यांना सुविधा दिल्या जात आहेत, असं म्हणत ठाकरे सरकारविरोधात घणाघात  केला. राज्य सरकार काही व्यवस्था करू शकत नसल्यास आम्ही बसेसची व्यवस्था करू, सरकारने आम्हाला परवानगी द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्यासाठी रेल्वे, एसटी सुरू कराकोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने केलेल्या नियमांचे पालन करत गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या वाहतुकीची व्यवस्था म्हणून कोकण रेल्वे मार्गावर रेल्वे व कोकणात एसटी बस फेऱ्या सुरू कराव्यात, अशी मागणी कोकण रेल्वे समन्वयक समितीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे केली आहे. त्यांनी सरकारला एक निवेदनही दिलं आहे. गणपतीत गावी जाणाऱ्यांची संख्या कमी असली, तरीही गावची घरे संपूर्ण बंद असणे, सर्व नातेवाईक बाहेरगावी असणे या व इतर काही कारणांमुळे बऱ्याच नागरिकांना गावी जाणे भाग असते, असे या निवेदनात म्हटले आहे. 

हेही वाचा

दररोज 3GB डेटा देणारे तीन कंपन्यांचे सर्वात स्वस्त प्लॅन; जाणून घ्या सर्वकाही

"सत्तेसाठी मोदी ताकदवान नेता असल्याची खोटी प्रतिमा पसरवली; आता तीच ठरतेय भारताची दुर्बलता"

भारतीय लष्कराची तयारी पाहून चीन बिथरला; तिबेटमध्ये बनवलं थेट 'उडतं हॉस्पिटल'

सोन्याचे भाव पुन्हा एकदा झाले कमी, असे आहेत आजचे दर

सोन्याची वायदा बाजारातील किंमत कमी झाली; जाणून घ्या...

ग्रामीण बँकांमध्ये 9638 पदांसाठी नोकऱ्यांची खैरात! उद्या संपणार मुदत, असा करा अर्ज

सरकारच्या 'या' योजनेत पाच वर्षांसाठी १ लाख गुंतवल्यावर मिळतोय मोठा लाभ, पैसेही राहणार सुरक्षित

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरे