शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

"गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांपुढे अडचणी अन् बकरी ईदसाठी सुविधांची खैरात'; मनसेचं ठाकरे सरकारवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2020 15:27 IST

त्या इतिवृत्तानुसार ७ ऑगस्टनंतर कोकणात कोणालाही प्रवेश मिळणार नसल्याचीही माहिती पसरली होती. त्यानंतर या विषयावरून बराच गदारोळ झाला.

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून देशात लॉकडाऊन असल्यानं जिल्ह्याबाहेर जाण्यासाठीही ई-पासची आवश्यकता करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या  मोठी आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीतील इतिवृत्त बाहेर आलं होतं,  त्या इतिवृत्तानुसार ७ ऑगस्टनंतर कोकणात कोणालाही प्रवेश मिळणार नसल्याचीही माहिती पसरली होती. त्यानंतर या विषयावरून बराच गदारोळ झाला. विरोधकांनी सरकारच्या विरोधात टीकेची झोड उठवली, आता मनसेनंही त्याच मुद्द्यावरून शिवसेनेला कोंडीत पकडलं आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनीदेखील कोकणातील चाकरमान्यांचा प्रश्न उपस्थित करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. कोकणात जाण्यासाठी शासनाने काहीच व्यवस्था केली नसल्याचं म्हणत त्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना अडचणी आहेत, पण बकरी ईद साजरी करणाऱ्यांना सुविधा दिल्या जात आहेत, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली. टीव्ही ९कडे त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोकणात दरवर्षी मोठ्या प्रमाणात गणेशोत्सवाच्या काळात लोक जात असतात. पण यंदा कोरोनाच्या संकटातही त्यांना गावी जाण्यासाठी शासनाकडून ठोस अशी कोणतीच व्यवस्था नाही.परराज्यांतील लोकांना त्यांच्या राज्यात पाठवण्याची व्यवस्था केली आणि ते जाऊन परतसुद्धा आले आहेत,” असं टीकास्त्र संदीप देशपांडेंनी सोडलं आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे, पण बकरी ईद साजरी करणाऱ्यांना सुविधा दिल्या जात आहेत, असं म्हणत ठाकरे सरकारविरोधात घणाघात  केला. राज्य सरकार काही व्यवस्था करू शकत नसल्यास आम्ही बसेसची व्यवस्था करू, सरकारने आम्हाला परवानगी द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्यासाठी रेल्वे, एसटी सुरू कराकोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने केलेल्या नियमांचे पालन करत गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या वाहतुकीची व्यवस्था म्हणून कोकण रेल्वे मार्गावर रेल्वे व कोकणात एसटी बस फेऱ्या सुरू कराव्यात, अशी मागणी कोकण रेल्वे समन्वयक समितीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे केली आहे. त्यांनी सरकारला एक निवेदनही दिलं आहे. गणपतीत गावी जाणाऱ्यांची संख्या कमी असली, तरीही गावची घरे संपूर्ण बंद असणे, सर्व नातेवाईक बाहेरगावी असणे या व इतर काही कारणांमुळे बऱ्याच नागरिकांना गावी जाणे भाग असते, असे या निवेदनात म्हटले आहे. 

हेही वाचा

दररोज 3GB डेटा देणारे तीन कंपन्यांचे सर्वात स्वस्त प्लॅन; जाणून घ्या सर्वकाही

"सत्तेसाठी मोदी ताकदवान नेता असल्याची खोटी प्रतिमा पसरवली; आता तीच ठरतेय भारताची दुर्बलता"

भारतीय लष्कराची तयारी पाहून चीन बिथरला; तिबेटमध्ये बनवलं थेट 'उडतं हॉस्पिटल'

सोन्याचे भाव पुन्हा एकदा झाले कमी, असे आहेत आजचे दर

सोन्याची वायदा बाजारातील किंमत कमी झाली; जाणून घ्या...

ग्रामीण बँकांमध्ये 9638 पदांसाठी नोकऱ्यांची खैरात! उद्या संपणार मुदत, असा करा अर्ज

सरकारच्या 'या' योजनेत पाच वर्षांसाठी १ लाख गुंतवल्यावर मिळतोय मोठा लाभ, पैसेही राहणार सुरक्षित

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरे