शहरं
Join us  
Trending Stories
1
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
2
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
3
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
4
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
5
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
6
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
7
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
8
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  
9
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
10
‘मद्यपान करून गाडी चालवणारे दहशतवादीच’, कुरनूल बस अपघातानंतर हैदराबादच्या पोलीस आयुक्तांचं परखड विधान
11
युक्रेन युद्धादरम्यान रशियाने केली धोकादायक क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी, ‘स्टॉर्म शॅडो क्रूज’ ला रोखणे अशक्य
12
गृहकर्ज घेताय? 'या' सरकारी आणि खासगी बँका देत आहेत सर्वात स्वस्त दरात होम लोन; लगेच तपासा व्याजदर
13
"त्या वेळचे फोटो, व्हिडीओ पोलिसांनी परिवाराला दाखवले नाहीत..."; आमदार धस यांनी व्यक्त केला संशय
14
2016 चौकार...! एकदिवसीय सामन्यांत सर्वाधिक चौकार लगावणारे ७ फलंदाज, कितव्या क्रमांकावर रोहित आणि विराट?
15
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण; गुन्हा दाखल एकीकडे, आरोपी PSI बदने हजर दुसरीकडे!
16
आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...
17
इंग्लंड दौऱ्यानंतर गंभीर, आगरकरने काढलं संघाबाहेर, त्याच फलंदाजाने कुटल्या १७४ धावा, केली चौकार, षटकारांची बरसात
18
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
19
गुंतवणूकदारांना बंपर भेट! 'ही' आयटी कंपनी देणार प्रति शेअर १३० रुपये लाभांश; रेकॉर्ड डेट कधी? लगेच तपासा
20
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...

"गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांपुढे अडचणी अन् बकरी ईदसाठी सुविधांची खैरात'; मनसेचं ठाकरे सरकारवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2020 15:27 IST

त्या इतिवृत्तानुसार ७ ऑगस्टनंतर कोकणात कोणालाही प्रवेश मिळणार नसल्याचीही माहिती पसरली होती. त्यानंतर या विषयावरून बराच गदारोळ झाला.

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून देशात लॉकडाऊन असल्यानं जिल्ह्याबाहेर जाण्यासाठीही ई-पासची आवश्यकता करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या  मोठी आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीतील इतिवृत्त बाहेर आलं होतं,  त्या इतिवृत्तानुसार ७ ऑगस्टनंतर कोकणात कोणालाही प्रवेश मिळणार नसल्याचीही माहिती पसरली होती. त्यानंतर या विषयावरून बराच गदारोळ झाला. विरोधकांनी सरकारच्या विरोधात टीकेची झोड उठवली, आता मनसेनंही त्याच मुद्द्यावरून शिवसेनेला कोंडीत पकडलं आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनीदेखील कोकणातील चाकरमान्यांचा प्रश्न उपस्थित करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. कोकणात जाण्यासाठी शासनाने काहीच व्यवस्था केली नसल्याचं म्हणत त्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना अडचणी आहेत, पण बकरी ईद साजरी करणाऱ्यांना सुविधा दिल्या जात आहेत, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली. टीव्ही ९कडे त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोकणात दरवर्षी मोठ्या प्रमाणात गणेशोत्सवाच्या काळात लोक जात असतात. पण यंदा कोरोनाच्या संकटातही त्यांना गावी जाण्यासाठी शासनाकडून ठोस अशी कोणतीच व्यवस्था नाही.परराज्यांतील लोकांना त्यांच्या राज्यात पाठवण्याची व्यवस्था केली आणि ते जाऊन परतसुद्धा आले आहेत,” असं टीकास्त्र संदीप देशपांडेंनी सोडलं आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे, पण बकरी ईद साजरी करणाऱ्यांना सुविधा दिल्या जात आहेत, असं म्हणत ठाकरे सरकारविरोधात घणाघात  केला. राज्य सरकार काही व्यवस्था करू शकत नसल्यास आम्ही बसेसची व्यवस्था करू, सरकारने आम्हाला परवानगी द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्यासाठी रेल्वे, एसटी सुरू कराकोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने केलेल्या नियमांचे पालन करत गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या वाहतुकीची व्यवस्था म्हणून कोकण रेल्वे मार्गावर रेल्वे व कोकणात एसटी बस फेऱ्या सुरू कराव्यात, अशी मागणी कोकण रेल्वे समन्वयक समितीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे केली आहे. त्यांनी सरकारला एक निवेदनही दिलं आहे. गणपतीत गावी जाणाऱ्यांची संख्या कमी असली, तरीही गावची घरे संपूर्ण बंद असणे, सर्व नातेवाईक बाहेरगावी असणे या व इतर काही कारणांमुळे बऱ्याच नागरिकांना गावी जाणे भाग असते, असे या निवेदनात म्हटले आहे. 

हेही वाचा

दररोज 3GB डेटा देणारे तीन कंपन्यांचे सर्वात स्वस्त प्लॅन; जाणून घ्या सर्वकाही

"सत्तेसाठी मोदी ताकदवान नेता असल्याची खोटी प्रतिमा पसरवली; आता तीच ठरतेय भारताची दुर्बलता"

भारतीय लष्कराची तयारी पाहून चीन बिथरला; तिबेटमध्ये बनवलं थेट 'उडतं हॉस्पिटल'

सोन्याचे भाव पुन्हा एकदा झाले कमी, असे आहेत आजचे दर

सोन्याची वायदा बाजारातील किंमत कमी झाली; जाणून घ्या...

ग्रामीण बँकांमध्ये 9638 पदांसाठी नोकऱ्यांची खैरात! उद्या संपणार मुदत, असा करा अर्ज

सरकारच्या 'या' योजनेत पाच वर्षांसाठी १ लाख गुंतवल्यावर मिळतोय मोठा लाभ, पैसेही राहणार सुरक्षित

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरे