शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
2
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
3
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
4
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
5
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
6
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
7
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
8
Vaishno Devi Yatra: भयंकर घटनेनंतर वैष्णो देवी यात्रेला पुन्हा सुरूवात; ३४ भाविकांचा झाला होता मृत्यू
9
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
10
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?
11
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
12
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
13
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
14
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
15
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
16
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
17
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली
18
मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
19
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
20
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार

लोकांना जेवण देताय की भिक; 'शिवभोजना'वरून मनसेची ठाकरे सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2020 12:09 IST

अशा योजनामुळे 'भिक नको पण कुत्रा आवर' असे लोकं काही दिवसात म्हणतील असे म्हणत देशपांडे यांनी ठाकरे सरकाराला खोचक टोला लगावला.

मुंबई : विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यभरात 10 रुपयात गरजूंना जेवण देणार असल्याचे आश्वासन दिले होते. तर सरकार स्थापन होताच ठाकरे यांनी 'शिवभोजन' योजनेची घोषणा केली आहे. तर या 'शिवभोजन' योजनेची २६ जानेवारीपासून राज्यभरात अंमलबजावणी होणार आहे. मात्र त्यापूर्वीच विरोधकांकडून ही फसवी योजना असल्याचा आरोप केला जात आहे.

भाजपनंतर आता महराष्ट्र नवनिर्माण सेनेकडूनही 'शिवभोजन' योजनेवरून सरकारवर टीका करण्यात आली आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी यावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. सराकार लोकांना 10 रुपयात थाळी देऊन उपकार करत नाही. 10 रुपयासाठी किती अटी लावणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

अशा योजनामुळे 'भिक नको पण कुत्रा आवर' असे लोकं काही दिवसात म्हणतील असे म्हणत देशपांडे यांनी ठाकरे सरकाराला खोचक टोला लगावला. सरकाराला देता येत नसेल तर त्यांनी तसे स्पष्ट करावे की, 10 रुपयात थाळी देता येणार नाही. मात्र त्यासाठी अटी-शर्ती लावून फसवणूक कशाला करता असेही ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, 'बिनशर्त, सरसकट अशा शब्दाचे आश्वासन द्यायचे आणि करायचं उलट. ठाकरे सरकारचा हाच खरा चेहरा आहे. यांची कर्जमाफी जितकी फसवी आहे, तितकीच त्यांची शिवभोजन योजना सुद्धा फसवी असल्याचा आरोप भाजपचे प्रवक्ते आणि माजी आमदार राम कदम यांनी केला आहे.