शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

Raj Thackeray : "एक दिवस सकाळी उठलो आणि पाहतो तर काय जोडा वेगळाच;" राज ठाकरेंचा अजित पवारांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2022 20:41 IST

मतदारांशी गद्दारी करणाऱ्यांना कोणतं शासन देणार असा सवालही राज ठाकरे यांनी केला. जनता सगळं विसरते याचाच ते फायदा घेतात : राज ठाकरे

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शनिवारी गुढी पाडव्यानिमित्त आयोजित मेळाव्यात शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला.  जसा कोरोनामुळे लावण्यात आलेला लॉकडाऊन आता विस्मरणात गेला, तशा अनेक गोष्टी विस्मरणात गेल्या. परंतु त्या दोन वर्षांपूर्वी झालेल्या घटनाही आपण विसरलो. २०१९ मध्ये झालेली निवडणूकही आपण विसरलो. जे तुम्ही विसरात तेच त्यांच्या फायद्याचं ठरतं असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. 

"२०१९ च्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस लढले होते. विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर शिवसेनेला आणि खासकरून अचानक उद्धव ठाकरे यांना अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्री बनणार असं ठरलं होतं असा साक्षात्कार झाला. महाराष्ट्रातील सभांमध्ये कधी यावर बोलले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी येऊन भाषण करत होते, तेव्हाही व्यासपीठावर बसले होते, तेव्हा पंतप्रधान मुख्यमंत्री भाजपचा मुख्यमंत्री बनेल असं ते म्हणाले त्यावेळी काही बोलले नाही. अमित शाहदेखील बोलले तेव्हाही काही बोलले नाहीत. जेव्हा निकाल लागला आणि आपल्यामुळे सरकार अडतंय हे समजल्यावर अडीच वर्षांचा विषय आला. तेव्हा अमित शाहंशी एकांतात बोललो असं सांगितलं. त्यावेळी बाहेर का नाही बोललात?," असा सवालही राज ठाकरे यांनी केला.

मुख्यमंत्रिपद हे महाराष्ट्राचं आहे, मग ती गोष्ट चार भिंतीत का केली. आमचं असं काही बोलणं झालं नाही हे अमित शाहही सांगतात. एक दिवस सकाळी उठलो आणि पाहतो तर काय जोडा वेगळाच. पळून कोणाबरोबर गेले लग्न कोणाबरोबर समजेचना. महाराष्ट्राला समजेचना मतदान केलं कोणाला आम्ही. मग नंतर सगळं फिस्कटलं आणि त्यानंतर दोघंही हिसमुसून घरी. एक नंबरचा पक्ष भाजप, दोन नंबरचा शिवसेना आणि तीन नंबरचा राष्ट्रवादी, पण तीन नंबरचा पक्ष एक आणि दोन नंबरला फिरवतोय. हा महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात प्रकार मी कधीही पाहिला नाही," असंही ते यावेळी म्हणाले. मतदारांशी गद्दारी करणाऱ्यांना कोणतं शासन देणार असा सवालही त्यांनी केला.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेAjit Pawarअजित पवारMahavikas Aghadiमहाविकास आघाडी