शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

Raj Thackeray : "एक दिवस सकाळी उठलो आणि पाहतो तर काय जोडा वेगळाच;" राज ठाकरेंचा अजित पवारांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2022 20:41 IST

मतदारांशी गद्दारी करणाऱ्यांना कोणतं शासन देणार असा सवालही राज ठाकरे यांनी केला. जनता सगळं विसरते याचाच ते फायदा घेतात : राज ठाकरे

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शनिवारी गुढी पाडव्यानिमित्त आयोजित मेळाव्यात शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला.  जसा कोरोनामुळे लावण्यात आलेला लॉकडाऊन आता विस्मरणात गेला, तशा अनेक गोष्टी विस्मरणात गेल्या. परंतु त्या दोन वर्षांपूर्वी झालेल्या घटनाही आपण विसरलो. २०१९ मध्ये झालेली निवडणूकही आपण विसरलो. जे तुम्ही विसरात तेच त्यांच्या फायद्याचं ठरतं असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. 

"२०१९ च्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस लढले होते. विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर शिवसेनेला आणि खासकरून अचानक उद्धव ठाकरे यांना अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्री बनणार असं ठरलं होतं असा साक्षात्कार झाला. महाराष्ट्रातील सभांमध्ये कधी यावर बोलले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी येऊन भाषण करत होते, तेव्हाही व्यासपीठावर बसले होते, तेव्हा पंतप्रधान मुख्यमंत्री भाजपचा मुख्यमंत्री बनेल असं ते म्हणाले त्यावेळी काही बोलले नाही. अमित शाहदेखील बोलले तेव्हाही काही बोलले नाहीत. जेव्हा निकाल लागला आणि आपल्यामुळे सरकार अडतंय हे समजल्यावर अडीच वर्षांचा विषय आला. तेव्हा अमित शाहंशी एकांतात बोललो असं सांगितलं. त्यावेळी बाहेर का नाही बोललात?," असा सवालही राज ठाकरे यांनी केला.

मुख्यमंत्रिपद हे महाराष्ट्राचं आहे, मग ती गोष्ट चार भिंतीत का केली. आमचं असं काही बोलणं झालं नाही हे अमित शाहही सांगतात. एक दिवस सकाळी उठलो आणि पाहतो तर काय जोडा वेगळाच. पळून कोणाबरोबर गेले लग्न कोणाबरोबर समजेचना. महाराष्ट्राला समजेचना मतदान केलं कोणाला आम्ही. मग नंतर सगळं फिस्कटलं आणि त्यानंतर दोघंही हिसमुसून घरी. एक नंबरचा पक्ष भाजप, दोन नंबरचा शिवसेना आणि तीन नंबरचा राष्ट्रवादी, पण तीन नंबरचा पक्ष एक आणि दोन नंबरला फिरवतोय. हा महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात प्रकार मी कधीही पाहिला नाही," असंही ते यावेळी म्हणाले. मतदारांशी गद्दारी करणाऱ्यांना कोणतं शासन देणार असा सवालही त्यांनी केला.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेAjit Pawarअजित पवारMahavikas Aghadiमहाविकास आघाडी