शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

राज ठाकरेंचा विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार?; भाजपाला घेरण्यासाठी नवी 'राजनीती'

By संदीप प्रधान | Updated: July 8, 2019 16:51 IST

मनसैनिकांमध्येही 'साहेबां'च्या पुढच्या आदेशाबद्दल उत्सुकता आहे.

ठळक मुद्देराज ठाकरे लोकसभेचा निकाल जाहीर झाल्यापासून राजकीय पडद्यावरून गायबच होते.राज ठाकरे विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा विचार गंभीरपणे करत असल्याची खळबळजनक माहिती सूत्रांकडून समजली आहे.'मॅच फिक्स असेल तर नेट प्रॅक्टिस करून उपयोग काय?', असं सूचक विधान राज ठाकरे यांनी केलं.

>> संदीप प्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सरकार पाडण्यासाठी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राज्यभर जाहीर सभा घेणारे, 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत मोदी सरकारच्या भूमिका-धोरणं-योजनांचा समाचार घेणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे लोकसभेचा निकाल जाहीर झाल्यापासून राजकीय पडद्यावरून गायबच आहेत. त्यांच्या डोक्यात नेमकं काय सुरू आहे, ते विधानसभेची रणनीती आखताहेत का, मनसे कुणासोबत जाईल की स्वबळावर मैदानात उतरेल, यावरून राजकीय वर्तुळात बरेच तर्कवितर्क लढवले जात आहेत. मनसैनिकांमध्येही 'साहेबां'च्या पुढच्या आदेशाबद्दल उत्सुकता आहे. अशातच, राज ठाकरे विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा विचार गंभीरपणे करत असल्याची खळबळजनक माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. महाराष्ट्रातील अन्य राजकीय पक्षांच्या नेत्यांना भेटून, त्यांनाही ते बहिष्काराचं आवाहन करणार असल्याचं समजतं.   

लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर आज जवळपास दीड महिन्यानी राज ठाकरे 'पॉलिटिकल पीच'वर उतरल्याचं पाहायला मिळालं. पुढच्या काळात होणाऱ्या निवडणुका ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर घ्याव्यात, असं निवेदन त्यांनी स्वतः दिल्लीत जाऊन केंद्रीय निवडणूक आयुक्तांना दिलं. तब्बल १४ वर्षांनी ते दिल्लीला गेलेत. विधानसभा निवडणुकीच्या दिशेनं मनसेनं टाकलेलं पहिलं पाऊल म्हणूनच त्यांच्या या भेटीकडे पाहिलं जातंय. परंतु, विधानसभा निवडणुकीकडे राज ठाकरे वेगळ्याच दृष्टिकोनातून पाहत असल्याचं मनसेतील काही सूत्रांना वाटतंय. राज ठाकरेंच्या एका विधानातूनही आज त्याची प्रचिती आली. 

'मॅच फिक्स असेल तर नेट प्रॅक्टिस करून उपयोग काय?', असं सूचक विधान राज ठाकरे यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना केलं. विधानसभा निवडणुकीच्या तयारीबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा, त्यांचा सूर अगदीच निराशाजनक वाटला. निवडणूक आयोगाकडून शून्य अपेक्षा आहेत, पण औपचारिकता म्हणून त्यांना भेटलो, या वाक्यातून त्यांची उद्विग्नता आणि हतबलता दिसली. भाजपा सर्व निवडणुका ईव्हीएम घोटाळा करूनच जिंकत असल्याची त्यांची अगदी ठाम धारणा झाली आहे. ती मॅच फिक्सिंगच्या विधानातून जाणवली. त्यातूनही, विधानसभेची 'मॅच' न खेळण्याबाबत ते विचार करत असल्याचे संकेत मिळाले आहेत. मुंबईत परतल्यावर पुढची भूमिका जाहीर करणार असल्याचं राज यांनी म्हटलंय. त्यामुळे सगळ्यांचीच धडधड वाढली आहे.  

राज ठाकरेंच्या सभांना तुफान गर्दी झाली, पण मतं भाजपालाच गेली. यातून, मनसेची संघटनात्मक ताकद प्रचंड कमी झाल्याचं स्पष्ट दिसतं. अर्थकारणाचा विचार केल्यास भाजपाच्या आसपास मोठे पक्षही फिरकू शकत नाहीत. अशा परिस्थितीत, लोकसभा निवडणुकीत जे झालं, तसाच निकाल विधानसभेलाही लागू शकतो. या पार्श्वभूमीवर, विधानसभेच्या मैदानात उतरण्यापेक्षा ईव्हीएमच्या मुद्द्यावरून बहिष्काराची 'राजनीती' करण्याचा विचार राज यांच्या डोक्यात सुरू असल्याची कुजबूज सुरू झाली आहे. इतकंच नव्हे तर, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यासह अन्य राजकीय पक्षांशी चर्चा करून त्यांनाही आपला मुद्दा पटवून देण्याचा प्रयत्न राज करू शकतात. राजू शेट्टी यांनी अलीकडेच राज ठाकरेंची भेट घेतली. अशा नेत्यांना सोबत घेऊन राज ठाकरे आपलं इंजिन वेगळ्या मार्गाने नेऊन भाजपा-शिवसेनेला धडक देणार का, हे पाहावं लागेल. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Narendra Modiनरेंद्र मोदीSharad Pawarशरद पवार