शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

राज ठाकरेंचा विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार?; भाजपाला घेरण्यासाठी नवी 'राजनीती'

By संदीप प्रधान | Updated: July 8, 2019 16:51 IST

मनसैनिकांमध्येही 'साहेबां'च्या पुढच्या आदेशाबद्दल उत्सुकता आहे.

ठळक मुद्देराज ठाकरे लोकसभेचा निकाल जाहीर झाल्यापासून राजकीय पडद्यावरून गायबच होते.राज ठाकरे विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा विचार गंभीरपणे करत असल्याची खळबळजनक माहिती सूत्रांकडून समजली आहे.'मॅच फिक्स असेल तर नेट प्रॅक्टिस करून उपयोग काय?', असं सूचक विधान राज ठाकरे यांनी केलं.

>> संदीप प्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सरकार पाडण्यासाठी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राज्यभर जाहीर सभा घेणारे, 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत मोदी सरकारच्या भूमिका-धोरणं-योजनांचा समाचार घेणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे लोकसभेचा निकाल जाहीर झाल्यापासून राजकीय पडद्यावरून गायबच आहेत. त्यांच्या डोक्यात नेमकं काय सुरू आहे, ते विधानसभेची रणनीती आखताहेत का, मनसे कुणासोबत जाईल की स्वबळावर मैदानात उतरेल, यावरून राजकीय वर्तुळात बरेच तर्कवितर्क लढवले जात आहेत. मनसैनिकांमध्येही 'साहेबां'च्या पुढच्या आदेशाबद्दल उत्सुकता आहे. अशातच, राज ठाकरे विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा विचार गंभीरपणे करत असल्याची खळबळजनक माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. महाराष्ट्रातील अन्य राजकीय पक्षांच्या नेत्यांना भेटून, त्यांनाही ते बहिष्काराचं आवाहन करणार असल्याचं समजतं.   

लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर आज जवळपास दीड महिन्यानी राज ठाकरे 'पॉलिटिकल पीच'वर उतरल्याचं पाहायला मिळालं. पुढच्या काळात होणाऱ्या निवडणुका ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर घ्याव्यात, असं निवेदन त्यांनी स्वतः दिल्लीत जाऊन केंद्रीय निवडणूक आयुक्तांना दिलं. तब्बल १४ वर्षांनी ते दिल्लीला गेलेत. विधानसभा निवडणुकीच्या दिशेनं मनसेनं टाकलेलं पहिलं पाऊल म्हणूनच त्यांच्या या भेटीकडे पाहिलं जातंय. परंतु, विधानसभा निवडणुकीकडे राज ठाकरे वेगळ्याच दृष्टिकोनातून पाहत असल्याचं मनसेतील काही सूत्रांना वाटतंय. राज ठाकरेंच्या एका विधानातूनही आज त्याची प्रचिती आली. 

'मॅच फिक्स असेल तर नेट प्रॅक्टिस करून उपयोग काय?', असं सूचक विधान राज ठाकरे यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना केलं. विधानसभा निवडणुकीच्या तयारीबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा, त्यांचा सूर अगदीच निराशाजनक वाटला. निवडणूक आयोगाकडून शून्य अपेक्षा आहेत, पण औपचारिकता म्हणून त्यांना भेटलो, या वाक्यातून त्यांची उद्विग्नता आणि हतबलता दिसली. भाजपा सर्व निवडणुका ईव्हीएम घोटाळा करूनच जिंकत असल्याची त्यांची अगदी ठाम धारणा झाली आहे. ती मॅच फिक्सिंगच्या विधानातून जाणवली. त्यातूनही, विधानसभेची 'मॅच' न खेळण्याबाबत ते विचार करत असल्याचे संकेत मिळाले आहेत. मुंबईत परतल्यावर पुढची भूमिका जाहीर करणार असल्याचं राज यांनी म्हटलंय. त्यामुळे सगळ्यांचीच धडधड वाढली आहे.  

राज ठाकरेंच्या सभांना तुफान गर्दी झाली, पण मतं भाजपालाच गेली. यातून, मनसेची संघटनात्मक ताकद प्रचंड कमी झाल्याचं स्पष्ट दिसतं. अर्थकारणाचा विचार केल्यास भाजपाच्या आसपास मोठे पक्षही फिरकू शकत नाहीत. अशा परिस्थितीत, लोकसभा निवडणुकीत जे झालं, तसाच निकाल विधानसभेलाही लागू शकतो. या पार्श्वभूमीवर, विधानसभेच्या मैदानात उतरण्यापेक्षा ईव्हीएमच्या मुद्द्यावरून बहिष्काराची 'राजनीती' करण्याचा विचार राज यांच्या डोक्यात सुरू असल्याची कुजबूज सुरू झाली आहे. इतकंच नव्हे तर, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यासह अन्य राजकीय पक्षांशी चर्चा करून त्यांनाही आपला मुद्दा पटवून देण्याचा प्रयत्न राज करू शकतात. राजू शेट्टी यांनी अलीकडेच राज ठाकरेंची भेट घेतली. अशा नेत्यांना सोबत घेऊन राज ठाकरे आपलं इंजिन वेगळ्या मार्गाने नेऊन भाजपा-शिवसेनेला धडक देणार का, हे पाहावं लागेल. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Narendra Modiनरेंद्र मोदीSharad Pawarशरद पवार