शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

...कारण नंतर बोंबलायचं आहे; राज ठाकरेंचं महापालिका निवडणुकीबाबत सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 13:21 IST

गेल्या काही दिवसापूर्वी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यात काही दिवसात निवडणुका लागतील असं वक्तव्य केले होते.

मुंबई- गेल्या काही दिवसापूर्वी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यात काही दिवसात निवडणुका लागतील असं वक्तव्य केले होते. यावरुन राज्यात पुन्हा निवडणुका लागणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही निवडणुकांसंर्भात एक वक्तव्य केले आहे. यावरुन राज्यात जानेवारी नंतर निवडणुका होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

 आज राज ठाकरे यांनी मुंबईतील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यात निवडणुका कधीही लागू शकतात असं वक्तव्य केले आहे. "मी आता भाषणाला उभा राहत नाही, कारण मला जानेवारीपासून भाषण द्यायचे आहे. कारण जानेवारीनंतर राज्यात निवडणुका लागतील, असं भाकीत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केले. त्यामुळे आता राज्यात निवडणुकीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. 

मी 'तो' व्हिडीओ संपूर्ण पाहिला, जितेंद्र आव्हाडांना विनंती करतो की...; अजितदादांनी दिली प्रतिक्रिया

जानेवारीनंतर राज्यात नेमक्या कोणत्या निवडणुका लागणार या चर्चा सुरू झाल्या आहेत. विधासभेसाठी मध्यावधी लागणार की महापालिका निवडणुका लागणार, या चर्चांना उधाण आले आहे. आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना केल्या. या बैठकीत राज्यातील निवडणुका तसेच, मुंबई महापालिका निवडणुकीवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. 

शिवसेनेत ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. आता राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले आहे. शिवसेनेच्या १६ आमदार अपात्रतेसाठी कोर्टात याचिका दाखल केली आहे. यावर अजुनही सुनावणी सुरू आहे. यापार्श्वभमिवर राज्यात मध्यावधी  निवडणुका लागतील अशी चर्चा सुरू आहे. 

उद्धव ठाकरे यांनी काही दिवसापूर्वी पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत मध्यावदी निवडणुकांवरुन वक्तव्य केले होते. यावरुन राज्यात मध्यावधी निवडणुका लागणार का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही निवडणुकीवरुन विधान केले आहे, त्यामुळे पुन्हा चर्चांना उधाण आले आहे.  

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेUddhav Thackerayउद्धव ठाकरेElectionनिवडणूक