शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

MNS:'हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सत्तेत आले आणि आता...', मनसे नेत्यांचा सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 21:36 IST

'एकाने राजीनामा दिला म्हणून तांडव करू नका, अनेक मुस्लिम पदाधिकारी अजूनही पक्षात आहेत'- अविनाश जाधव

ठाणे: 9 एप्रिल रोजी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची होणारी सभा आता 12 एप्रिल रोजी होणार आहे. याशिवाय, सभेचे ठिकाणही बदलण्यात आले आहे. मनसे नेत्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरेंच्या सभेविषयी माहिती दिली. तसेच, यावेळी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन विरोधकांवर टीकाही केली. यावेळी मनसेचे नेते अभिजीत पानसे, सदीप देशपांडे, आमदार राजू पाटील आणि अविनाश जाधव उपस्थित होते.

'सेनेने हिंदुत्व सोडले'यावेळी बोलताना अभिजीत पानसे म्हणाले की, आम्ही 9 तारखेला सभा घेणार होतो, पण नवरात्र सुरू असल्यामुळे अनेकांना त्रास होईल, हे लक्षात घेऊन सभा 12 तारखेला घेण्याचे ठरवले आहे. गडकरी रंगायतन समोरील रस्त्यावर ही सभा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच, राजकीय सभेला परवानगी द्यायला 10 तास लागत असतील पोलिसांवर कोणाचा दबाव आहे? असा सवाल त्यांनी यावेळी केला. याशिवाय, हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन सत्तेवर आले आणि आता हाच मुद्दा सोडून दिला, असा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला.

...तर ठाण्यात येऊन धमक्या द्यायावेळी मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. आमच्या सभेला परवानगी देऊ नये म्हणून यांचे मंत्री फोन करतात. ही नाटकं समजणार नाही इतके आम्ही दुधखुळे नाही. यांना आता लोकशाही आठवत नाही का? असा सवाल देशपांडे यांनी केला. याशिवाय, मुंब्रामधील कार्यालयाच्या जागी कोणी येऊ शकले नाही, तो मुद्दा आमच्या साठी संपला. हिम्मत आहे तर ठाण्यात येऊन अशा धमक्या द्या, असा इशारा मनसे नेते अविनाश जाधव यांनी यावेळी दिला.

निष्ठावान कार्यकर्ते पक्षात आहेतयावेळी अविनाश जाधव यांनी पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यावरही भाष्य केले. एका शाखाध्यक्षने राजीनामा दिला म्हणून इतका तांडव करू नये, असे खूप मुस्लिम कार्यकर्ते पदाधिकारी आहेत जे अजूनही पक्षात आहेत. वसंत मोरे अजूनही पक्षात आहेत, ते निष्ठावन आहेत. 12 तारखाला तेदेखील सभेला येतील, त्यामुले ज्या बातम्या सुरू आहेत त्या खोट्या आहेत, असे जाधव म्हणाले. 

टॅग्स :MNSमनसेAvinash Jadhavअविनाश जाधवSandeep Deshpandeसंदीप देशपांडेRaj Thackerayराज ठाकरे