शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने सेलिब्रेशनसाठी केक मागविला; कशासाठी?
2
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
3
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
4
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
5
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
6
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
7
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
8
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
9
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
10
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
11
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
12
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
13
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
14
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
15
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
16
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
17
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
18
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
19
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
20
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...

“अटल बिहारी वाजपेयी अन् बाळासाहेबांना जमले नाही ते राज ठाकरेंनी करून दाखवले”: मनसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 14:37 IST

MNS Avinash Jadhav News: भाजपाची खरे ऐकण्याची क्षमता नाही. आपल्याला हवे तेच हिंदुत्व अशी अवस्था झाली असून, भाजपाने आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. भाजपाने गंगेच्या स्वच्छतेत झालेल्या भ्रष्टाचाराबद्दल माफी मागायला हवी, असे प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

MNS Avinash Jadhav News: गंगा नदीसंदर्भात राज ठाकरे यांनी केलेले विधान नीट ऐकले तर एक गोष्ट लक्षात येईल की, ही सर्व भारतातील जनतेची भावना आहे. राज ठाकरे यांचा गंगास्नान करण्याला विरोध नाही. पण जी घाण केली जाते त्याला त्यांचा विरोध आहे. गंगा स्वच्छतेसाठी २० हजार कोटी रुपये खर्च केले. त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला. भाजपाची ओरड ही गंगा स्वच्छतेवर खर्च केलेल्या २० हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचारावर पांघरूण घालण्यासाठी आहे. त्यासाठी भाजपाचा टीकेचा खटाटोप आहे. तो भ्रष्टाचार आहे. भाजपाने माफी मागितली पाहिजे. हे भाजपाचेच पाप आहे, या शब्दांत मनसे नेत्यांनी राज ठाकरे यांच्यावर केल्या जात असलेल्या टीकेचा खरपूस शब्दांत समाचार घेतला.

कुंभमेळ्याला जाऊन आल्यावर बाळा नांदगावकर यांनी मला कमंडलूमधील पाणी दिले. ते म्हणाले, पिणार का? मी नाही म्हटले. देशातील एकही नदी स्वच्छ नाही, तरीही आम्ही नदीला माता म्हणतो. श्रद्धेला पण काही अर्थ आहे की नाही, असे परखड मत मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी चिंचवड येथे व्यक्त केले. यावरून आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत असून, याला मनसे नेते अविनाश जाधव यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना प्रत्युत्तर दिले. 

अटल बिहारी वाजपेयी अन् बाळासाहेबांना जमले नाही ते राज ठाकरेंनी करून दाखवले

अविनाश जाधव पुढे म्हणाले की, आम्हाला हिंदुत्वाच्या गोष्टी भाजपाने शिकवू नये. जे बाळासाहेब ठाकरे आणि अटलबिहारी वाजपेयी यांना जमले नाही ते राज ठाकरे यांनी केले. मशिदीवरील भोंगे राज ठाकरेंनी उतरवले. राज ठाकरे यांनी आपली हिंदुत्वाची भूमिका बदलली नाही. फक्त परिस्थिती समाजासमोर मांडली. तसेच गंगा स्वच्छ करण्याच्या गोष्टी राजीव गांधी यांच्या काळापासून सुरू असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. भाजपाला वाईट वाटायचे कारण नव्हते. गंगेचे पाणी वापरण्यायोग्य नाही हे अनेकांनी शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध करून दाखवले आहे. भाजपाची खरे ऐकण्याची क्षमता नाही. आपल्याला हवे तेच हिंदुत्व अशी अवस्था भाजपाची झाली आहे, असे प्रत्युत्तर अविनाश जाधव यांनी दिले. 

दरम्यान, गंगा स्वच्छ झालेली नाही. स्वच्छतेच्या नावाखाली प्रचंड भ्रष्टाचार झाला. हे भाजपाचेच पाप आहे. राज ठाकरे प्रत्येक वेळी हिंदुत्वावर बोलतानाच रस्त्यावरचे नमाज आणि मशिदीवरील भोंग्यांवरही बोलले आहेत. नितेश राणे यांनी राज ठाकरे यांची भाषणे ऐकली पाहिजेत. त्यांना हवे असल्यास राज ठाकरे यांच्या भाषणे मी पाठवून देईल, असा टोला अविनाश जाधव यांनी लगावला.

 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेMaharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाAvinash Jadhavअविनाश जाधवBJPभाजपा