शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

MLC Election: आवाssज कुणाचा?... शिवसेनेनं 'असा' केला 'डबल धमाका'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2018 2:11 PM

भाजपामधील काही मित्रांनाही आपल्या बाजूने वळवण्यात शिवसेना नेते यशस्वी ठरले आणि बघता-बघता ते ४००च्या जवळ पोहोचले.

मुंबईः 'झीरो टू हिरो' म्हणजे काय, हे शिवसेनेनं आज विधानपरिषद निवडणुकीत दाखवून दिलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन, भाजपाच्या दोन आणि काँग्रेसच्या एका सदस्याचा कार्यकाळ संपत असल्याने परिषदेच्या सहा जागांसाठी मतदान झालं होतं. त्यात दोन जागांवर आपला झेंडा फडकवून सेनेनं 'डबल धमाका' केला आहे. या विजयातून त्यांनी राष्ट्रवादीला धक्का दिला आहेच, पण भाजपालाही इंगा दाखवला आहे.

शिवसेनेनं नाशिकमध्ये मिळवलेला दणदणीत विजय हा सगळ्यांसाठी आश्चर्याचा धक्का आहे. कारण, ही जागा राष्ट्रवादीकडे होती आणि या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला - अॅड. शिवाजी सहाणे यांना काँग्रेससोबत भाजपानेही पाठिंबा दिला होता. असं असतानाही, ६४४ पैकी ३९९ मतं मिळवून शिवसेनेचे नरेंद्र दराडे विजयी झाले. वास्तविक, नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेत शिवसेना आणि मित्रांचं संख्याबळ २१२ इतकंच होतं. परंतु, शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी सगळी जुळवाजुळव व्यवस्थित केली आणि राष्ट्रवादीसोबत भाजपाही तोंडावर आपटली. राष्ट्रवादी काँग्रेसमधील भुजबळ गटानं शिवसेनेला साथ दिल्यानं त्यांचं बळ चांगलंच वाढलं होतं. त्याशिवाय, भाजपामधील काही मित्रांनाही आपल्या बाजूने वळवण्यात शिवसेना नेते यशस्वी ठरले आणि बघता-बघता ते ४००च्या जवळ पोहोचले. गेल्या निवडणुकीत शिवसेनेला ही जागा थोडक्यात गमवावी लागली होती. त्यावेळी भुजबळांनी राष्ट्रवादीच्या जयंत जाधवांसाठी गणित जुळवलं होतं, यावेळी त्यांच्याच समर्थकांनी ते बिघडवलं, अशी चर्चा आहे. 

परभणी-हिंगोलीत काँग्रेस-राष्ट्रवादीची ताकद जास्त होती. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे बाबा जानी दुर्राणी यांनी इथून सहज विजय मिळवला होता. परंतु, या निवडणुकीत ही जागा राष्ट्रवादीने काँग्रेससाठी सोडली. इथेच त्यांचं समीकरण बिघडलं आणि शिवसेनेचं भाग्य उघडलं. राष्ट्रवादीच्या नाराज मंडळींनी आपली मतं शिवसेनेच्या पारड्यात टाकली आणि विप्लव बाजोरिया यांनी बाजी मारली. भाजपाची मदतही इथे निर्णायक ठरली. विप्लव बाजोरिया यांना २५६ मतं मिळाली, तर काँग्रेसच्या सुरेश देशमुखांना २२१ पर्यंत मजल मारता आली. राष्ट्रवादीने ही जागा आपल्याकडेच ठेवली असती, कदाचित चित्र वेगळं असतं. पण त्यांची चूक सेनेच्या पथ्यावर पडली. 

तिकडे, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग कोकण विधानपरिषद मतदारसंघात, नारायण राणेंनी राष्ट्रवादीच्या अनिकेत सुनील तटकरे यांना पाठिंबा दिल्यानं शिवसेनेच्या राजीव साबळेंना पराभव पत्करावा लागला आहे. हा पराभव नक्कीच त्यांचा 'स्वाभिमान' दुखावणारा असला, तरी विधानपरिषेदतील संख्या दोनने वाढल्यानं त्यांची मान उंचावलीही आहे. या निवडणुकीनंतर, शिवसेनेच्या विधानपरिषदेतील आमदारांची संख्या ९ वरून ११ झाली आहे. 

दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीत भाजपाने आपल्या अमरावती (प्रवीण पोटे) आणि चंद्रपूर (रामदास आंबटकर) या दोन जागा राखल्या आहेत.  

टॅग्स :Vidhan Parishadविधान परिषदShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे