शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

"आमदार संपर्कात, शिंदे-ठाकरे गटाचे दावे-प्रतिदावे; भाजपा म्हणतं, २०२४ पर्यंत.."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 12:58 IST

उर्वरित १०-१५ आमदार शिवसेनेत राहतील का? याची काळजी खैरेंनी करावी असा टोला भाजपा आमदार नितेश राणेंनी लगावला. 

मुंबई - राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात शिवसेनेतील वर्चस्वाची लढाई सुरू आहे. शिवसेनेच्या एकूण आमदारांपैकी दोन तृतीयांश आमदार हे शिंदे गटात सहभागी झालेत. ठाकरे गटातील २-३ आमदार लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत सहभागी होतील असा दावा मंत्री संदीपान भुमरे यांनी केला तर त्याला प्रत्युत्तर देत शिंदे गटाचेच १०-१५ आमदार आमच्या संपर्कात असल्याचा प्रतिदावा माजी खासदार चंद्रकांत खैरेंनी केला. 

चंद्रकांत खैरे म्हणाले की, शिवसेनेचे कुणीही तिकडे जाणार नाही. परंतु शिंदे गटातील अनेक आमदार अस्वस्थ आहेत. आम्हाला फोन करून चुकलो म्हणतात. १०-१५ आमदार आहेत जे संपर्कात आहेत. भाजपा काहीही गेम खेळतील आणि सरकारमध्ये पूर्ण बहुमत सिद्ध करत आपल्याला आऊट करतील हे आमदारांना कळालंय असं त्यांनी म्हटलं. 

तर शिवसेना-भाजपा युतीचं सरकार अतिशय ताकदीने महाराष्ट्रात काम करतेय. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशनही सरकारने यशस्वीपणे सांभाळलं. येणारी अडीच वर्ष, २०२४ पर्यंत महाराष्ट्रात हेच सरकार कायम राहणार आहे. त्यामुळे हे आमच्या संपर्कात अशी विधाने केली जात आहे. उर्वरित १०-१५ आमदार शिवसेनेत राहतील का? याची काळजी खैरेंनी करावी असा टोला भाजपा आमदार नितेश राणेंनी लगावला. 

काय म्हणाले होते संदीपान भुमरे?  संदीपान भुमरे यांनी पैठण येथील कार्यक्रमात बोलताना हा दावा केला. भुमरे यांनी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. उद्धव सेनेत सध्या मुक्कामी असलेले दोन आमदार लवकरच फुटून शिंदे सेनेत येणार आहेत. एक जण येऊन आम्हाला भेटला असून दुसरा सुद्धा संपर्कात असल्याचे भुमरे यांनी सांगितले. कोकण, मराठवाड्यातील आमदार संपर्कात आहेत. त्याचसोबत मराठवाड्यातील जिल्हाप्रमुख १-२ वगळता सगळेच संपर्कात आहेत. ८० टक्के पदाधिकारी आमच्या संपर्कात आहेत. जसजसे भेटतील तसे पक्षप्रवेश होतील असं भुमरेंनी म्हटलं. मात्र भुमरेंच्या या दाव्यावर ठाकरे गटातील आमदार अंबादास दानवे यांनी टीका केली. पैठणमधील भूमरेंच्या कार्यक्रमाला ५० लोकही नव्हते. अनेक खुर्च्या रिकाम्या होत्या. त्यामुळे आधी स्वत:चं सांभाळा, अशी टीका अंबादास दानवेंनी केली होती. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपा