शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

आमदार बच्चू कडूंना दिलासा, जामीन मंजूर; वाहतूक पोलिसाला मारहाण प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2018 17:02 IST

वाहतूक पोलीस शिपायाला शिवीगाळ, मारहाण आणि सरकारी कामात अडथळा केल्याच्या आरोपावरून बुधवारी दुपारी १२ वाजता अचलपूर येथील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी डी.बी. पतंगे यांच्या न्यायालयाने अपक्ष आमदार बच्चू कडूंसह चौघांना प्रत्येकी सहा महिने शिक्षा व १२०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

परतवाडा (अमरावती) : वाहतूक पोलीस शिपायाला शिवीगाळ, मारहाण आणि सरकारी कामात अडथळा केल्याच्या आरोपावरून बुधवारी दुपारी १२ वाजता अचलपूर येथील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी डी.बी. पतंगे यांच्या न्यायालयाने अपक्ष आमदार बच्चू कडूंसह चौघांना प्रत्येकी सहा महिने शिक्षा व १२०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. शिक्षेच्या सुनावणीनंतर बच्चू कडूंसह चौघांना प्रत्येकी सात हजार रुपयांच्या मुचलक्यावर जामीन मिळाला. 

परतवाडा येथे २३ एप्रिल २०१६ रोजी बसस्थानक परिसरात तैनात वाहतूक पोलीस शिपाई इंद्रजित चौधरी यांच्याशी याच परिसरातून जात असलेले आ. बच्चू कडू (४५, रा. बेलोरा), मंगेश बबनराव देशमुख (४५, रा. वणी बेलखेडा), अंकुश जनार्दन जवंजाळ (२७, रा. ब्राम्हणवाडा कॉलनी, परतवाडा) व धीरज काशीनाथ निकम (४१, रा. सर्फापूर कल्होडी, ह.मु. देवमाळी) यांनी वाहतूक व्यवस्थेवरून वाद घालीत शिवीगाळ, मारहाण व शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची फिर्याद परतवाडा पोलिसांत दाखल झाली होती. त्यावरून पोलिसांनी भादंविच्या कलम ३५३, ३३२, २९४, १८६, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला. ठाणेदार किरण वानखडे यांनी तपास केला.

अचलपूर येथील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी डी.बी. पतंगे यांच्या न्यायालयापुढे बुधवारी या प्रकरणावर निकाल देण्यात आला. आमदारांसह चौघांना भादंविच्या ३५३ कलम अन्वये प्रत्येकी सहा महिने व एक हजार रुपये रोख, तर भादंविच्या १८६ कलम अन्वये प्रत्येकी एक महिना शिक्षा व दोनशे रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षातर्फे सरकारी अधिवक्ता मंजूषा सावरकर, अनिल धवस, तर आ. कडू यांच्यातर्फे महेश देशमुख यांनी बाजू मांडली. पैरवी अधिकारी पुरुषोत्तम यावले होते. न्यायालयाने शिक्षा सुनावताच आ. बच्चू कडू व सहकाºयांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. प्रत्येकी सात हजारांच्या मुचलक्यावर चौघांचा जामीन मंजूर करण्यात आला. भादंविचे ३५३ व १८६ हे कलम भ्रष्ट अधिका-यांसाठी कवच झाले आहे. याविरोधात आमदारांना एकत्र करण्याचा प्रयत्न करून विधानसभेत हा मुद्दा मांडणार असल्याचे यावेळी बच्चू यांनी जाहीर केले.एसपी कार्यालयात पत्रपरिषद-आ. बच्चू कडू यांच्यासह अंकुश जवंजाळ, मंगेश देशमुख, धीरज निकम यांना न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर अमरावती येथे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पत्रपरिषद बोलावली होती. आजपर्यंत अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपींना शिक्षा मिळाली आहे; मग आताच पत्रपरिषद का घेतली, असा सवाल पत्रकारांनी अधीक्षकांच्यावतीने उपस्थित असलेले अपर पोलीस अधीक्षक एम.एम. मकानदार यांना  केला. हे प्रकरण वाहतूक पोलीस कर्मचा-याशी संबंधित आहे. अशाप्रकारे शिक्षा क्वचितच ठोठावली जाते. त्या दृष्टीने ही पत्रपरिषद आयोजित केल्याचे मकानदार यांनी पत्रकारांना सांगितले. यावेळी परतवाड्याचे तत्कालीन ठाणेदार किरण वानखडे उपस्थित होते. राहुटीत परतले आमदार कडू-जामिनावर सुटका होताच न्यायालयातून बाहेर पडताच नेहमीप्रमाणे नागरिक त्यांच्या भोवती गोळा झाले. काहींनी निवेदने दिलीत, तर काहींनी आपल्या समस्या मांडल्या. पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असलेल्या राहुटी उपक्रमात आमदार बच्चू कडू परतले. शासकीय यंत्रणाच्या उपस्थितीत नागरिकांच्या तक्रारी ऐकून समस्या सोडविण्यावर 'राहुटी'मध्ये भर दिला जातो.न्यायालयाचा आदर करतो. शिक्षेला वरिष्ठ न्यायालयात आव्हान देऊ. जनतेसाठी अशा कितीही शिक्षा झाल्या तरी चालतील. परतवाडा शहरातील अपघातात चौघांचा मृत्यू झाला होता. वैयक्तिक कामासाठी आम्हाला शिक्षा झाली नाही. लोकांसाठी माझा लढा सतत सुरू राहील. एका महिन्याचा अवधी मिळाला असून उच्च न्यायालयात दाद मागणार आहे.- बच्चू कडू, आमदार, अचलपूर मतदारसंघ 

टॅग्स :Bachhu Kaduबच्चू कडूAmravatiअमरावतीtraffic policeवाहतूक पोलीस