शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

मीरा भाईंदर भाजपाची हसत खेळत, फोटोसेशन करत दुःखात असणाऱ्या पुरग्रस्तांसाठी मदतफेऱ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2021 12:59 IST

मीरा भाईंदर भाजपाने पुरग्रस्तांच्या मदतीसाठी साहित्य निधी जमवताना पुरग्रस्तांच्या अश्रूंचा विचार न करता हसत हसत फोटोसेशन केल्याची अनेक छायाचित्रे समाज माध्यमांवर आल्याने नाराजी व्यक्त होत आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क

मीरारोड: कोकण व पश्चिम महाराष्ट्रात पुराच्या थैमानाने लाखो लोकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परंतु मीरा भाईंदर भाजपाने पुरग्रस्तांच्या मदतीसाठी साहित्य निधी जमवताना पुरग्रस्तांच्या अश्रूंचा विचार न करता हसत हसत फोटोसेशन केल्याची अनेक छायाचित्रे समाज माध्यमांवर आल्याने नाराजी व्यक्त होत आहे. 

निसर्गाने धारण केलेल्या रौद्र रूपाने कोकणातील रायगड, रत्नागिरी आदी जिल्ह्यात तर पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली आदी जिल्ह्यात पुराने होत्याचे नव्हते करून टाकले आहे. पुरग्रस्तांचे अश्रूं पुसण्यासाठी विविध स्तरातून मदतीचे हात पुढे आले आहेत. 

मीरा भाईंदर मधील अनेक भाजपा नगरसेवक व कार्यकर्त्यांनी सुद्धा आपापल्या प्रभागात कोकणातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी साहित्य व निधी जमवण्यासाठी पदफेऱ्या काढल्या. व्यावसायिक व नागरिकांना आवाहन करत भांडी, कपडे, धान्य, खाद्यपदार्थ, पाणी आदी साहित्यासह निधी गोळा केला.  

परंतु पुरग्रस्तांच्या दुःखावर फुंकर घालण्यासाठी काढलेल्या ह्या मदतफेऱ्यांत परिस्थितीचे भान राखण्या ऐवजी हसत हसत फोटोसेशन करतानाच अनेकांनी तर चक्क पोझ देत फोटोंची हौस भागवून घेतली. मदतीचा चांगला उपक्रम असताना निव्वळ राजकीय प्रसिद्धीचा फायदा न घेता परिस्थितीचे गांभीर्य राजकारण्यांनी राखले पाहिजे असा सूर नागरिकां मधून व्यक्त होत आहे.  

टॅग्स :floodपूरMira Bhayanderमीरा-भाईंदरBJPभाजपा