शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

अल्पसंख्याकांवरील हल्ले पूर्वनियोजित

By admin | Updated: June 19, 2014 03:03 IST

धरा दिवसांपूर्वी राज्यात ठिकठिकाणी विशिष्ट समाजांवर झालेले हल्ले हे विशिष्ट हेतूने आणि पूर्वनियोजित होते, या निष्कर्षापर्यंत राज्य अल्पसंख्याक आयोग

कोल्हापूर : पंधरा दिवसांपूर्वी राज्यात ठिकठिकाणी विशिष्ट समाजांवर झालेले हल्ले हे विशिष्ट हेतूने आणि पूर्वनियोजित होते, या निष्कर्षापर्यंत राज्य अल्पसंख्याक आयोग पोहोचला असून, या हल्ल्याचा वस्तुनिष्ठ अहवाल राज्य सरकारला लवकरच देण्यात येईल, अशी माहिती आयोगाचे अध्यक्ष मुनाफ हकीम यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. राज्यात ज्या जिल्ह्यात विशिष्ट समाजावर हल्ले झाले त्या त्या जिल्ह्यांत जाऊन आयोगाने माहिती घेतली. आज मुनाफ हकीम यांच्यासह आयोगाचे सचिव हुसेन मुजावर, डॉ. दत्तात्रय गायकवाड (पुणे), डॉ. मुमताज सय्यद (मुंबई), सुरजितसिंग खुंगर (औरंगाबाद) या सदस्यांनी कोल्हापुरातील दुर्घटनाग्रस्त भागात पाहणी केली. त्यांनतर आयोगाच्या सदस्यांनी श्रीमंत शाहू महाराज, प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांची भेट घेतली व त्यांच्याकडून माहिती घेतली. पोलीस अधीक्षक मनोजकुमार शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार यांच्याशी चर्चा करून घटनेची माहिती घेतली. हकीम म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांच्या विटंबनेनंतर राज्यात अनेक ठिकाणी दगडफेक, लूटमार, जाळपोळ अशा घटना घडल्या आहेत. राज्यात जेथे अशा घटना घडल्या, त्या पाहिल्या असता या घटना पूर्वनियोजित होत्या. कारण या घटनांमध्ये विशिष्ट समाजालाच टार्गेट करण्यात आले आहे. सर्वत्र एकाच पद्धतीने हल्ले झाले आहेत. राज्यात यापूर्वी प्रार्थनास्थळावर कधीही हल्ले झाले नव्हते; परंतु १६ ते २१ वयोगटांतील तरुणांना संघटित करून त्यांना विघातक मार्गाकडे वळविण्यात आले. जर अशा वयोगटांतील तरुणांची नावे पोलीस दफ्तरी नोंद झाली तर त्यांच्या रोजगाराचा, नोकरीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. एक पिढी उद्ध्वस्त करण्याचा हा डाव आहे की काय, अशी शंका येते. राज्यात जरी शांतता असली तरी अल्पसंख्याक समाज आजही दहशतीखाली आहे. (प्रतिनिधी)