शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
2
ब्राझीलमध्ये रेड कमांडोविरोधात युद्ध सुरु; रिओमध्ये मोठ्या अड्ड्यावर हेलिकॉप्टरद्वारे हल्ला, माफियांकडून ड्रोन हल्ल्याने प्रत्यूत्तर
3
भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक
4
बदल्याची आग! मोबाईल डेटा, हार्ड ड्राइव्ह, अश्लील...; २० वर्षीय मुलीने का केली पार्टनरची हत्या?
5
आजचे राशीभविष्य, २९ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ, पण गुंतवणूक करताना सावधान; शुभ दिवस
6
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
7
शोधत होते दारू, सापडले एक कोटी रुपये; तपासणी नाक्यावर खाजगी बसमध्ये आढळली अवैध रक्कम
8
शेतकऱ्यांसाठी आणखी ११ हजार कोटी रुपये; मदत वाटपात विलंबावरून मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी
9
निवडणुकीत उद्धवसेनेचे ७०% नवे चेहरे दिसणार; मनसेसोबत प्रचारात एकत्र, घरोघरी पोहोचण्याची योजना
10
छत्रपती संभाजीनगरमधून अमेरिकन नागरिकांना गंडा; अवैध आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरमधून ११६ आरोपींना अटक
11
खासदार, आमदार हत्येचा कट; आरोपीचा जामीन फेटाळला, सिम कार्ड, सेल फोनचे केले होते तुकडे
12
तिच्या चारित्र्यावर शिंतोंडे का उडवताय? रूपाली चाकणकरांकडून मृत डॉक्टरची बदनामी; सुषमा अंधारेंचा आरोप
13
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
14
फेसलेस लर्निंग लायसन्स प्रणाली हॅक; नेपाळसह परदेशी नागरिकांना परवाने, एजंटकडून यंत्रणेचा गैरवापर
15
आठव्या वेतन आयोगाला केंद्राची मान्यता; ५० लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार, निवृत्त कर्मचाऱ्यांनाही लाभ
16
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
17
अल्पवयीनाने मैत्रिणीला पेट्राेल टाकून पेटवले; मुलीची मृत्युशी झुंज, दोघांमध्ये प्रेमसंबंधाचा अंदाज
18
मुंबईत १० नोव्हेंबरपासून जनगणना पूर्वचाचणीला सुरुवात; नागरिकांना योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन
19
काेर्टाच्या निर्देशानंतरच कबुतरखान्यांवर निर्णय; आयुक्त गगराणी यांची शिष्टमंडळाला माहिती
20
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान

मंत्र्यांची अनास्था, अधिकारी विचारेनात, पतच घसरली; विधानसभेत सत्ताधारी, विरोधी सदस्यांनी व्यक्त केली तीव्र चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 07:58 IST

अर्थसंकल्पातील अनुदानावरील चर्चेत सहभागी होत असताना उद्धव सेनेचे ज्येष्ठ सदस्य भास्कर जाधव यांनी हा मुद्दा मांडला. ते म्हणाले की, मंत्र्यांना सभागृहाच्या कामकाजाचे गांभीर्य राहिलेले नाही...

मुंबई : विधानसभेत मंत्री हजर नाहीत म्हणून प्रश्न पुढे ढकलावे लागतात, लक्षवेधी सूचना मागे-पुढे कराव्या लागतात. मंत्र्यांची अशी अनास्था, तर आहेच, पण संबंधित खात्याचे अधिकारी हे अदृश्य गॅलरीत बसून पूर्वी मुद्दे लिहून घेत असत, तेही हल्ली होत नाही, अशी खंत सत्तारुढ आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांनी बुधवारी सभागृहात व्यक्त केली. त्यावर, मुख्य सचिवांना सरकारने आदेश द्यावेत, असे निर्देश तालिका अध्यक्ष दिलीप बनकर यांनी दिले.

अर्थसंकल्पातील अनुदानावरील चर्चेत सहभागी होत असताना उद्धव सेनेचे ज्येष्ठ सदस्य भास्कर जाधव यांनी हा मुद्दा मांडला. ते म्हणाले की, मंत्र्यांना सभागृहाच्या कामकाजाचे गांभीर्य राहिलेले नाही. मंत्री सभागृहात बसत नाहीत. विधान परिषदेत कामकाज आहे, असे सांगून निघून जातात. पूर्वी गृह खात्यावर चर्चा सभागृहात व्हायची तेव्हा लॉबीमध्ये पोलिस महासंचालक, पोलिस आयुक्तांपासून बडे अधिकारी बसून मुद्दे लिहून घेत असत.  पूर्वीसारखे आज तेथे सचिव वा त्यावरील दर्जाचे अधिकारी न बसता मंत्र्यांचे पीए, पीएस बसलेले असतात. सभागृहात मंत्री नाहीत, गॅलरीत अधिकारी नाहीत असेच चालले तर मग सभागृहातील सदस्यांच्या भावना सरकारच्या कानावर कशा जाणार, अशी चर्चा तर वांझोटीच ठरेल, असा हल्लाबोल जाधव यांनी केला. एखादी दुर्घटना घडली की, मंत्री पोहोचतात, पण सचिव कधीही जात नाहीत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

मुख्य सचिवांना आपबिती सांगासभागृहात मंत्री नसल्याने, अधिकारी दिसत नसल्याने आम्ही कसे हतबल आहोत, हे सर्वपक्षीय सदस्य पोटतिडकीने मांडत होते. सर्वांचा जास्त रोख होता तो वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेच. त्याची दखल घेत तालिका अध्यक्षांनी याबाबत सरकारने मुख्य सचिवांनी योग्य ते आदेश द्यावेत, असे निर्देश दिले.

मंत्री झटकतात जबाबदारीशरद पवार गटाचे ज्येष्ठ सदस्य जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली की, ज्यांच्या खात्यावर चर्चा सुरू आहे, ते मंत्री सभागृहात हजर नसतात. वेगळेच मंत्री मुद्दे लिहून घेत असल्याचे सांगतात. सरकारची ही सामूहिक जबाबदारी असल्याचे कारण देत मूळ मंत्री जबाबदारी झटकतात, हा या सर्वोच्च सभागृहाचा अपमान आहे. 

भाजपचे सुरेश धस म्हणाले, सहा वर्षे विधान परिषदेचा सदस्य होतो. तेव्हा विधान परिषदेची पत ठेवली जात नाही, अशी खंत व्यक्त करायचो, आता विधानसभेत आहे तर इथेही तीच स्थिती आहे, हे थांबले पाहिजे. ज्येष्ठ सदस्य जयंत पाटील यांनीही नाराजी बोलून दाखविली.

ज्येष्ठ मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही सदस्यांच्या भावना लक्षात घेत मंत्री वरच्या सभागृहात असले तरी संबंधित सचिवांनी गॅलरीत बसून नोंदी घेतल्या पाहिजेत आणि तसे निर्देश अध्यक्षांनी द्यावेत, अशी विनंती केली. 

टॅग्स :Vidhan Bhavanविधान भवनvidhan sabhaविधानसभाPoliticsराजकारण