शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
4
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
5
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
6
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
7
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
8
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
9
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
10
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
11
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
12
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
13
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
14
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
15
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
16
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
17
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
18
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
19
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
20
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

"टोकदार कुंचला, अणकुचीदार लेखणी आन् मुलुखमैदानी तोफ म्हणावे असे वक्तृत्व, म्हणजे बाळासाहेब ठाकरे"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2021 08:17 IST

महाराष्ट्रातील कोणतीही व्यक्ती स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे व्यक्तित्त्व, कर्तृत्व आणि नेतृत्व कधीही विसरू शकत नाही. बाळासाहेब एक  स्टेट्समन होते. तसेच ते अतिशय विशाल हृदयी नेते होते.

नितीन गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री -

महाराष्ट्रातील कोणतीही व्यक्ती स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे व्यक्तित्त्व, कर्तृत्व आणि नेतृत्व कधीही विसरू शकत नाही. बाळासाहेब एक  स्टेट्समन होते. तसेच ते अतिशय विशाल हृदयी नेते होते. मुंबईमध्ये सुरुवातीच्या काळात मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी त्यांनी शिवसेनेची स्थापना केली. त्यानंतर याच संघटनेच्या माध्यमातून हिंदुत्वाचा विचार संपूर्ण महाराष्ट्रात रुजवण्याचा, जागवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. टोकदार कुंचला, अणकुचीदार लेखणी आणि मुलुखमैदानी तोफ म्हणावे असे वक्तृत्व बाळासाहेबांना लाभले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिवसेना युतीचे सरकार महाराष्ट्रात आले. युतीच्या सरकारचे खरे शिल्पकार बाळासाहेब ठाकरे हेच होते. त्या काळात त्यांनी मराठी माणूस, मराठी संस्कृती यांना कसा वाव मिळेल, महाराष्ट्राचा विकास कसा होईल यासाठी मनापासून प्रयत्न केले. मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना ते अनेक विषयांवर मार्गदर्शन करीत. बाळासाहेबांनी शिवसैनिकांमध्ये जाज्वल्य देशाभिमान निर्माण केला. शिवाय, मराठी संस्कृती, मराठी इतिहासाबद्दलची कटिबद्धताही निर्माण केली. बाळासाहेबांचे आणि माझे व्यक्तिगत संबंध अतिशय जवळचे होते. माझ्या आयुष्यावर ज्यांचा फार मोठा प्रभाव पडला, त्यात बाळासाहेब आणि अटलजी ही दोन नावे आवर्जून घ्यावी लागतील. भाजप-शिवसेना युतीच्या सरकारच्या काळात अनेक प्रकारचे ताण-तणाव निर्माण झाले. पण, बाळासाहेबांशी माझे व्यक्तिगत संबंध नेहमीच चांगले राहिले. आमच्यात अंतराय आला नाही. त्यांनी पक्षाच्या पलीकडे जाऊन माझ्यावर पुत्रवत प्रेम केले. मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे, मुंबई शहरातील उड्डाणपूल, वरळी-बांद्रा सी-लिंक या सगळ्या प्रकल्पांच्या मागे बाळासाहेब उभे राहिले. मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेचे भूमिपूजन बाळासाहेबांच्या हस्ते झाले. पंचावन्न उड्डाणपुलांच्या कामाचे आणि सी- लिंकच्या कामाचे भूमिपूजनही त्यांनी केले. या सगळ्या कामांबद्दल त्यांना आस्था होती आणि अभिमान होता. त्यांचा ते सातत्याने गौरवाने उल्लेख करायचे. मुंबई आणि महाराष्ट्राच्या भविष्यासाठी हे प्रकल्प अत्यंत महत्त्वाचे आहेत, असे ते नेहमी म्हणायचे आणि त्यासाठी मी व माझे सहकारी करीत असलेल्या धडपडीबद्दल आमचे कौतुक करायचे. सरकार गेल्यानंतर त्यांच्या जीवनावर एक पुस्तक काढण्याचा प्रस्ताव आला तेव्हा त्यात काही छायाचित्रे हवी होती. त्यांनी राज ठाकरेंना सांगितले की, `मला फ्लायओव्हरवर फोटो काढायचा आहे, पण मी एकटा नाही काढणार फोटो. नितीनला बोलाव...’… आणि माझ्यासोबत त्यांनी तो फोटो काढला. संपर्कात आलेल्या प्रत्येक माणसाचा, कार्यकर्त्याचा त्यांनी नेहमी सन्मान केला आणि प्रेम केले. आपल्या कार्यकर्त्यांबद्दल त्यांना अपार आपुलकी होती. संकटात असलेला कार्यकर्ता असो वा आंदोलनामुळे तुरुंगात असलेला, त्यांच्या प्रति त्यांच्या हृदयात एका बापाचे प्रेम होते. ते कार्यकर्त्यांची आणि कुटुंबीयांचीही काळजी घेत. बाळासाहेब फार संवेदनशील होते. आमच्या संवादादरम्यानची आणि इतर ठिकाणची त्यांची अनेक वाक्ये मला सुभाषितांसारखी आठवतात. सार्वजनिक ठिकाणचे एकीकडे धाडसी आणि दुसरीकडे हळवे असे वर्तनही आठवते. विशेषतः माँसाहेबांचे निधन झाल्यानंतरचा प्रसंग माझ्या मनःपटलावर कायम कोरला गेला आहे. बाळासाहेब दादर स्मशानभूमीच्या बाहेर आले आणि त्यांनी ट्रकवर चढून भोवतालच्या अफाट जनसमुदायाला खाली वाकून अभिवादन केले आणि आभार मानले. एवढ्या मोठ्या नेत्याचे हे हळवेपण, हे माणूसपण, जनतेप्रति एवढी आपुलकी ही माझ्यासाठी अपूर्वाई होती. प्रसंग कोणताही असो, बाळासाहेब एकदा उभे राहिले, की संपूर्ण वातावरणावर जणू गारूड व्हायचे. सभागृह असो वा जाहीरसभा, सगळे लोक रोमांचित व्हायचे. त्यांच्या खुसखुशीत आणि तेवढ्याच खरमरीत वक्तृत्वाने उभ्या महाराष्ट्राला वेड लावले होते. खऱ्या अर्थाने त्यांनी जनमानसावर राज्य केले. त्याचबरोबर जनतेच्या मनात प्रेम निर्माण केले. ते `यारों के यार’ होते. ज्याच्याशी त्यांनी दोस्ती केली, ज्याच्यावर त्यांनी प्रेम केले, तो पक्षातला आहे की बाहेरचा याचा त्यांनी कधीही विचार केला नाही. त्यामुळेच पक्षाबाहेरच्या लोकांशीसुद्धा त्यांचे संबंध अतिशय जिव्हाळ्याचे होते. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा नेहमीच पूजनीय -व्यक्तिगत आयुष्यात मी बाळासाहेबांना कधीही विसरू शकत नाही. त्यांनी दिलेले प्रेम, त्यांचे मार्गदर्शन माझ्यासाठी नेहमीच अमूल्य राहिले आणि राहणार आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मला मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. त्यांच्या सहवासामुळे, मार्गदर्शनामुळे आपण गौरवान्वित झालो आहोत, अशी भावना माझ्या मनात आहे. त्यांच्याबद्दल माझ्या मनात कायमस्वरूपी आदर आणि श्रद्धा आहे. ज्या-ज्या नेत्यांनी मला शिकवले-घडवले, त्या लोकविलक्षण माणसांच्या नक्षत्रमालेत बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा माझ्यासाठी नेहमीच पूजनीय असेल. 

टॅग्स :Balasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेNitin Gadkariनितीन गडकरीShiv Senaशिवसेना