शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांनी मौन सोडले पण कारवाईवर भाष्य टाळलं; "मारहाणीची घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी..."
2
ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... 
3
७/११तील सर्व दोषी निर्दोष, सरकारसमोर कोणते पर्याय; पुढे काय होणार? कायदेतज्ज्ञ म्हणतात...
4
अजित पवारांविरोधात छावा संघटना आक्रमक; NCP कार्यालयावर दगडफेक, जाळण्याचाही प्रयत्न
5
ट्रम्प यांच्या धोरणाचा आता 'नासा'लाही फटका; 'या' कारणांमुळे उपग्रह काढले विक्रीला, तेही डिस्काउंटमध्ये?
6
IND vs PAK : या भारतीय क्रिकेटरचं नाव घेत शाहिद आफ्रिदीनं केला मोठा दावा, म्हणाला...
7
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
8
मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला
9
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
10
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
11
आता ATM मधून पैसे काढायला कार्डची गरज नाही! 'या' सोप्या पद्धतीने UPI द्वारे काढा कॅश
12
झोपेच्या गोळ्या, शॉक दिला... बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा, कुटुंबाने केली 'ही' मागणी
13
नेपोकिड्सचा दाईजान! 'सैय्यारा'चं कौतुक केल्यावर करण जोहर झाला ट्रोल, उत्तर देत म्हणाला...
14
पहिल्या तिमाहीचे निकाल, बोनस आणि डिविडेंडची घोषणा; 'या' बँकेचा शेअर चमकला, तुमच्याकडे आहे?
15
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
16
अमेरिका-भारत व्यापार कराराकडे बाजाराचे लक्ष; तिमाही निकाल आणि परकीय गुंतवणुकीचा कस
17
IND vs ENG : टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; या पठ्ठ्यानं एका डावात अख्खा संघ केला होता गारद
18
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
19
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
20
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल

“संजय राऊतांची बडबड सुरू राहिली तर उरलेली शिवसेना संपेल, उद्धव ठाकरेंनी...”; भाजपाचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 16:35 IST

BJP Girish Mahajan News: संजय राऊतांनी केलेल्या टीकेला भाजपाकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

BJP Girish Mahajan News: बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेचे काय केले ते पाहा, शिवसेना संपवली. संजय राऊतांनी जे उद्धव ठाकरेंना शरद पवार आणि काँग्रेसच्या मांडीवर बसवले ही दलाली पाहा. संजय राऊतांची बडबड अशीच सुरू राहिली तर उरलेली शिवसेनाही संपेल. उद्धव ठाकरे यांना विनती आहे थोडीफार राहिलेली शिवसेना वाचवा. ३५ वर्षे झाली, सात वेळा भाजपामधून निवडून आलो, आम्हाला कुठेही जायची गरज नाही. मी माझ्या विचारांपासून दूर गेलेलो नाही. पक्ष कोणाच्या दावणीला बाधायचे काम मी करत नाही. तुम्ही शिवसेना संपवली. उद्धव ठाकरेंना राजकारणातून संपवले. गोरेगाव पत्राचाळीत काय केले हे मला बोलायला लावू नका, या शब्दांत भाजपा नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी पलटवार केला. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला गिरीश महाजन यांनी उत्तर दिले.

गिरीश महाजन जे बोलतात, ती भाषाच त्यांना, पक्षाला घेऊन बुडणार. पक्ष फोडण्यासाठी भाजपने जे दलाल नेमले आहेत त्यातील पहिले गिरीश महाजन आहेत. ज्या दिवशी आमच्याकडे सत्ता असेल त्या दिवशी पक्ष बदलणार पहिला माणूस म्हणजे गिरीश महाजन असेल. मविआ सरकार असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना, यांच्या आर्थिक घोटाळ्याची चौकशी सुरू झाली, त्यावेळी ते पक्ष बदलायला तयार होते, असा मोठा दावा करतानाच, राजकारणातून बाहेर पडतो, शांत बसतो, असे निरोप तेच पाठवत होते. हे एक नंबरचे डरपोक लोक आहेत, अशी टीका राऊतांनी केली होती.

उद्धव ठाकरेंनी धारावीसाठी काही केले नाही

धारावी पुनर्वसनाची सर्व माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती आहे, नियमबाह्य काम केले जाणार नाही. जागा कमी पडत असेल तर शासन देईल. धारावी पुनर्वसनासाठी उद्धव ठाकरेंनी काही केले नाही. आता विरोधक टीका करत आहेत, असे सांगत गिरीश महाजन यांनी निशाणा साधला. तसेच २६०० सरकारी महिला यांनी जे लाडक्या बहिणीच्या योजनेचे पैसे घेतले ते समोर आले हे योग्य नाही. ज्या महिला परत पैसे करतील त्यांच्यावर नाही पण ज्या महिला पैसे परत करणार नाही त्यांच्यावर काहीतरी निर्णय घेऊ शकतो, असे स्पष्ट संकेत महाजन यांनी दिले. 

दरम्यान, शिवसेना ही संपण्यासाठी निर्माण झालेली नाही. आत्तापर्यंत अनेकजण या पक्षात आले, बाहेर पडले. त्यांनी शिवसेना संपवण्याची भाषा केली. अमित शाह यांनीही शिवसेना संपवण्यासाठी जंग पछाडले. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जमीनदोस्त करण्याची भाषा तुम्ही आज वापरत आहात, याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे. तुम्ही राजकारणात कोण होतात? तुमच्या १० पिढ्या आल्या तरी शिवसेना संपणार नाही. नाचेगिरी करणे म्हणजे राजकारण नाही, या शब्दांत संजय राऊतांनी निशाणा साधला.

 

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजनSanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाBJPभाजपा