शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

“संजय राऊतांची बडबड सुरू राहिली तर उरलेली शिवसेना संपेल, उद्धव ठाकरेंनी...”; भाजपाचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 16:35 IST

BJP Girish Mahajan News: संजय राऊतांनी केलेल्या टीकेला भाजपाकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

BJP Girish Mahajan News: बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेचे काय केले ते पाहा, शिवसेना संपवली. संजय राऊतांनी जे उद्धव ठाकरेंना शरद पवार आणि काँग्रेसच्या मांडीवर बसवले ही दलाली पाहा. संजय राऊतांची बडबड अशीच सुरू राहिली तर उरलेली शिवसेनाही संपेल. उद्धव ठाकरे यांना विनती आहे थोडीफार राहिलेली शिवसेना वाचवा. ३५ वर्षे झाली, सात वेळा भाजपामधून निवडून आलो, आम्हाला कुठेही जायची गरज नाही. मी माझ्या विचारांपासून दूर गेलेलो नाही. पक्ष कोणाच्या दावणीला बाधायचे काम मी करत नाही. तुम्ही शिवसेना संपवली. उद्धव ठाकरेंना राजकारणातून संपवले. गोरेगाव पत्राचाळीत काय केले हे मला बोलायला लावू नका, या शब्दांत भाजपा नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी पलटवार केला. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला गिरीश महाजन यांनी उत्तर दिले.

गिरीश महाजन जे बोलतात, ती भाषाच त्यांना, पक्षाला घेऊन बुडणार. पक्ष फोडण्यासाठी भाजपने जे दलाल नेमले आहेत त्यातील पहिले गिरीश महाजन आहेत. ज्या दिवशी आमच्याकडे सत्ता असेल त्या दिवशी पक्ष बदलणार पहिला माणूस म्हणजे गिरीश महाजन असेल. मविआ सरकार असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना, यांच्या आर्थिक घोटाळ्याची चौकशी सुरू झाली, त्यावेळी ते पक्ष बदलायला तयार होते, असा मोठा दावा करतानाच, राजकारणातून बाहेर पडतो, शांत बसतो, असे निरोप तेच पाठवत होते. हे एक नंबरचे डरपोक लोक आहेत, अशी टीका राऊतांनी केली होती.

उद्धव ठाकरेंनी धारावीसाठी काही केले नाही

धारावी पुनर्वसनाची सर्व माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती आहे, नियमबाह्य काम केले जाणार नाही. जागा कमी पडत असेल तर शासन देईल. धारावी पुनर्वसनासाठी उद्धव ठाकरेंनी काही केले नाही. आता विरोधक टीका करत आहेत, असे सांगत गिरीश महाजन यांनी निशाणा साधला. तसेच २६०० सरकारी महिला यांनी जे लाडक्या बहिणीच्या योजनेचे पैसे घेतले ते समोर आले हे योग्य नाही. ज्या महिला परत पैसे करतील त्यांच्यावर नाही पण ज्या महिला पैसे परत करणार नाही त्यांच्यावर काहीतरी निर्णय घेऊ शकतो, असे स्पष्ट संकेत महाजन यांनी दिले. 

दरम्यान, शिवसेना ही संपण्यासाठी निर्माण झालेली नाही. आत्तापर्यंत अनेकजण या पक्षात आले, बाहेर पडले. त्यांनी शिवसेना संपवण्याची भाषा केली. अमित शाह यांनीही शिवसेना संपवण्यासाठी जंग पछाडले. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जमीनदोस्त करण्याची भाषा तुम्ही आज वापरत आहात, याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे. तुम्ही राजकारणात कोण होतात? तुमच्या १० पिढ्या आल्या तरी शिवसेना संपणार नाही. नाचेगिरी करणे म्हणजे राजकारण नाही, या शब्दांत संजय राऊतांनी निशाणा साधला.

 

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजनSanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाBJPभाजपा