शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

“संजय राऊतांची बडबड सुरू राहिली तर उरलेली शिवसेना संपेल, उद्धव ठाकरेंनी...”; भाजपाचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 16:35 IST

BJP Girish Mahajan News: संजय राऊतांनी केलेल्या टीकेला भाजपाकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

BJP Girish Mahajan News: बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेचे काय केले ते पाहा, शिवसेना संपवली. संजय राऊतांनी जे उद्धव ठाकरेंना शरद पवार आणि काँग्रेसच्या मांडीवर बसवले ही दलाली पाहा. संजय राऊतांची बडबड अशीच सुरू राहिली तर उरलेली शिवसेनाही संपेल. उद्धव ठाकरे यांना विनती आहे थोडीफार राहिलेली शिवसेना वाचवा. ३५ वर्षे झाली, सात वेळा भाजपामधून निवडून आलो, आम्हाला कुठेही जायची गरज नाही. मी माझ्या विचारांपासून दूर गेलेलो नाही. पक्ष कोणाच्या दावणीला बाधायचे काम मी करत नाही. तुम्ही शिवसेना संपवली. उद्धव ठाकरेंना राजकारणातून संपवले. गोरेगाव पत्राचाळीत काय केले हे मला बोलायला लावू नका, या शब्दांत भाजपा नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी पलटवार केला. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला गिरीश महाजन यांनी उत्तर दिले.

गिरीश महाजन जे बोलतात, ती भाषाच त्यांना, पक्षाला घेऊन बुडणार. पक्ष फोडण्यासाठी भाजपने जे दलाल नेमले आहेत त्यातील पहिले गिरीश महाजन आहेत. ज्या दिवशी आमच्याकडे सत्ता असेल त्या दिवशी पक्ष बदलणार पहिला माणूस म्हणजे गिरीश महाजन असेल. मविआ सरकार असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना, यांच्या आर्थिक घोटाळ्याची चौकशी सुरू झाली, त्यावेळी ते पक्ष बदलायला तयार होते, असा मोठा दावा करतानाच, राजकारणातून बाहेर पडतो, शांत बसतो, असे निरोप तेच पाठवत होते. हे एक नंबरचे डरपोक लोक आहेत, अशी टीका राऊतांनी केली होती.

उद्धव ठाकरेंनी धारावीसाठी काही केले नाही

धारावी पुनर्वसनाची सर्व माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती आहे, नियमबाह्य काम केले जाणार नाही. जागा कमी पडत असेल तर शासन देईल. धारावी पुनर्वसनासाठी उद्धव ठाकरेंनी काही केले नाही. आता विरोधक टीका करत आहेत, असे सांगत गिरीश महाजन यांनी निशाणा साधला. तसेच २६०० सरकारी महिला यांनी जे लाडक्या बहिणीच्या योजनेचे पैसे घेतले ते समोर आले हे योग्य नाही. ज्या महिला परत पैसे करतील त्यांच्यावर नाही पण ज्या महिला पैसे परत करणार नाही त्यांच्यावर काहीतरी निर्णय घेऊ शकतो, असे स्पष्ट संकेत महाजन यांनी दिले. 

दरम्यान, शिवसेना ही संपण्यासाठी निर्माण झालेली नाही. आत्तापर्यंत अनेकजण या पक्षात आले, बाहेर पडले. त्यांनी शिवसेना संपवण्याची भाषा केली. अमित शाह यांनीही शिवसेना संपवण्यासाठी जंग पछाडले. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जमीनदोस्त करण्याची भाषा तुम्ही आज वापरत आहात, याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे. तुम्ही राजकारणात कोण होतात? तुमच्या १० पिढ्या आल्या तरी शिवसेना संपणार नाही. नाचेगिरी करणे म्हणजे राजकारण नाही, या शब्दांत संजय राऊतांनी निशाणा साधला.

 

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजनSanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाBJPभाजपा