शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मिलिंद परत आलाय; मुख्यमंत्री ठाकरेंसोबत पुन्हा दिसू लागलाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2021 06:24 IST

उद्धव यांच्या निकटच्या वर्तुळात अनेक आले-गेले; पण मिलिंद चिरंजीव आहेत.

महाभारतामधील चिरंजीव अश्वत्थामा आपणाला ठावुक आहे. तसे शिवसेनेत चिरंजीव मिलिंद नार्वेकर आहेत. उद्धव यांच्या निकटच्या वर्तुळात अनेक आले-गेले; पण मिलिंद चिरंजीव आहेत. उद्धव ठाकरे जोपर्यंत पक्षप्रमुख होेते, तोपर्यंत मिलिंद हे त्यांची सावली होते. उद्धव मुख्यमंत्री झाल्यावर त्यांना वेगवेगळ्या कामांकरिता शासकीय मिलिंद लाभले. म्हणजे अजोय मेहतांपासून सीताराम कुंटेंपर्यंत सारेच दिमतीला असल्याने मिलिंद बाजूला पडल्याची कुजबुज सुरू झाली. अनिल परब यांचे वर्चस्व वाढल्यामुळे तर मिलिंद यांचे सेनेतील अस्तित्व शून्य सावली दिवसासारखे भासू लागले. परब यांच्यावर आरोप झाले व आता ईडीची पिडा त्यांच्या मागे लागल्याने परब यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांनी वरचेवर दिसू नये, असा सल्ला दिला गेल्याने पटकन मिलिंद यांनी उद्धव यांची पुन्हा पाठ धरली. नक्षलवादाच्या समस्येवर दिल्लीत बैठक झाली त्याला मुख्यमंत्री, मुख्य सचिव, पोलीस महासंचालक यांच्यासोबत हजर होते ते मिलिंद नार्वेकर. ब्लेझर परिधान केलेले, फायलींचा गठ्ठा सोबत बाळगलेले मिलिंद नजरेत भरले आणि चर्चा सुरू झाली. मिलिंद परत आलाय... मिलिंद यांची श्रीमंत तिरुपती बालाजी देवस्थानाच्या विश्वस्तपदी नियुक्ती करण्याकरिता उद्धव यांनी जगनमोहन रेड्डी यांना फोन लावला होता. तिरुपती बालाजी मिलिंद यांना पावला, अशी चर्चा लोक करीत आहेत. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMilind Narvekarमिलिंद नार्वेकरAnil Parabअनिल परब