शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मिलिंद परत आलाय; मुख्यमंत्री ठाकरेंसोबत पुन्हा दिसू लागलाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2021 06:24 IST

उद्धव यांच्या निकटच्या वर्तुळात अनेक आले-गेले; पण मिलिंद चिरंजीव आहेत.

महाभारतामधील चिरंजीव अश्वत्थामा आपणाला ठावुक आहे. तसे शिवसेनेत चिरंजीव मिलिंद नार्वेकर आहेत. उद्धव यांच्या निकटच्या वर्तुळात अनेक आले-गेले; पण मिलिंद चिरंजीव आहेत. उद्धव ठाकरे जोपर्यंत पक्षप्रमुख होेते, तोपर्यंत मिलिंद हे त्यांची सावली होते. उद्धव मुख्यमंत्री झाल्यावर त्यांना वेगवेगळ्या कामांकरिता शासकीय मिलिंद लाभले. म्हणजे अजोय मेहतांपासून सीताराम कुंटेंपर्यंत सारेच दिमतीला असल्याने मिलिंद बाजूला पडल्याची कुजबुज सुरू झाली. अनिल परब यांचे वर्चस्व वाढल्यामुळे तर मिलिंद यांचे सेनेतील अस्तित्व शून्य सावली दिवसासारखे भासू लागले. परब यांच्यावर आरोप झाले व आता ईडीची पिडा त्यांच्या मागे लागल्याने परब यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांनी वरचेवर दिसू नये, असा सल्ला दिला गेल्याने पटकन मिलिंद यांनी उद्धव यांची पुन्हा पाठ धरली. नक्षलवादाच्या समस्येवर दिल्लीत बैठक झाली त्याला मुख्यमंत्री, मुख्य सचिव, पोलीस महासंचालक यांच्यासोबत हजर होते ते मिलिंद नार्वेकर. ब्लेझर परिधान केलेले, फायलींचा गठ्ठा सोबत बाळगलेले मिलिंद नजरेत भरले आणि चर्चा सुरू झाली. मिलिंद परत आलाय... मिलिंद यांची श्रीमंत तिरुपती बालाजी देवस्थानाच्या विश्वस्तपदी नियुक्ती करण्याकरिता उद्धव यांनी जगनमोहन रेड्डी यांना फोन लावला होता. तिरुपती बालाजी मिलिंद यांना पावला, अशी चर्चा लोक करीत आहेत. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMilind Narvekarमिलिंद नार्वेकरAnil Parabअनिल परब