शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

'मग बेळगाव महाराष्ट्रात विलीन करुन दाखवा'; संजय राऊत यांचे भाजपला थेट आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 14:37 IST

Belgaum Municipal Election: 'बेळगाव महापालिकेच्या निकालात भाजपला बहुमत मिळालं, त्यानंतर संजय राऊत यांनी भाजपने मराठी माणसालाच पाडल्याची टीका केली.'

मुंबई: नुकतंच बेळगाव महापालिकेचा निकाल लागला. त्यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं, तर शिवसेनेचा पाठिंबा असलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावं लागलं. त्या निकालानंतर संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. 'बेळगाव महापालिकेवर भगवा फडकला आहे ना, मग मग बेळगाव महाराष्ट्रात विलीन करण्याचा ठराव पालिकेच्या पहिल्याच सभेत पारित करा', असं आव्हानच संजय राऊत यांनी भाजपला दिलं आहे.

बेळगाव महापालिकेच्या निकालात भाजपला बहुमत मिळालं, त्यानंतर संजय राऊत यांनी भाजपने मराठी माणसालाच पाडल्याची टीका केली. त्यानंतर भाजपनेही पलटवार करत निवडून आलेले निम्म्याहून अधिक उमेदवार मराठी असल्याचं सांगितलं. तसेच, बेळगाव पालिकेवर भगवा फडकला असल्याची प्रतिक्रिया दिली. त्यानंतर राऊत यांनी ट्विट करुन भाजपला बेळगाव महाराष्ट्र विलीन करण्याचं आव्हान दिलं आहे.

राऊत यांचे ट्विट...

संजय राऊत आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ''बेळगावात एकीकरण समितीचा पराभव घडवून आणला. भाजपाचे महाराष्ट्रातील पुढारी म्हणतात आमचा भगवा बेळगावर फडकला, मग एक करा. पालिकेच्या पहिल्या सभेत बेळगाव महाराष्ट्रात विलीन करण्याचा ठराव मंजूर करा. महाराष्ट्रात पेढे वाटून आनंद व्यक्त करणाऱ्या भाजपने लगेच ही मागणी करावी. तरच तुमचा भगवा खरा!'', असं आव्हान राऊत यांनी दिलं आहे.

पडळकरांचा राऊतांवर हल्लाबोल बेळगाव महापालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्याचे पडसाद मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात उमटू लागले आहेत. भाजपाचे विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर संजय राऊत यांच्यावर टीका करताना बेळगावमध्ये निवडूण आलेले संतोष पेडणेकर, जयंत जाधव, सविता कांबळे, रवी धोत्रे, रेशमा पाटील असे नगरसेवक मराठी माणसं वाटत नाहीयेत का? शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले नाहीत म्हणून ते मराठीच राहिले नाहीत का? असा सवाल केला.

महाराष्ट्राच्या मतदारने युतीला बहुमत दिलं, पण नंतर तुम्ही मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला. पाकिस्तानचे व कलम 370 चे गोडवे गाणाऱ्यांसोबत सत्तेचा मेवा तुम्ही खाताय. हे बेळगावलाच नाही तर अखंड हिंदूस्थानाला समजले आहे. दिल्लीतल्या मॅडमला व युवराजांना सत्तेसाठी खुष करण्यासाठी तुम्ही वारकऱ्यांना गुन्हेगार ठरवून मराठी जणांचा सन्मान असलेल्या वारीवर दंडुक़ेशाहीचा वापर केला. वारकऱ्यांच्या खांद्यावरून भगवा पताका उतरवला. त्यांचाच शाप व तळतळाट तुम्हाला आता इथून पुढेही भोगावा लागणार आहे, असा इशारा पडळकरांनी राऊत आणि शिवसेनेला दिला आहे. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतbelgaonबेळगावGopichand Padalkarगोपीचंद पडळकरBJPभाजपाShiv Senaशिवसेना