शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

मराठी साहित्य संमेलनाची रूपरेषा लवकरच ठरणार? 3 जानेवारीला औरंगाबादमध्ये बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2020 14:05 IST

कोरोनाचे सावट असल्यामुळे संमेलनाबाबत अद्यापही नाही ठोस निर्णय..

ठळक मुद्देशासनाकडून संमेलनासाठी मिळणारे ५० लाख रुपयांचे अनुदान देखील अद्याप नाही

पुणे : यंदाच्या साहित्य संमेलनावर कोरोनाचे सावट असल्यामुळे आगामी वर्षातील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबाबत अद्यापही कोणताच ठोस निर्णय साहित्य महामंडळाकडून घेण्यात आलेला नाही. मात्र आता त्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. साहित्य महामंडळाने सर्व घटक, संलग्न व समाविष्ट संस्थांची येत्या 3 जानेवारीला औरंगाबाद येथे बैठक बोलावली आहे. सर्व सदस्यांनी संमेलन आयोजनासाठी होकार दर्शविल्यानंतर स्थळ निवड समिती, संमेलन नियोजन समितीची नियुक्ती करण्याची प्रक्रिया केली जाणार आहे. बदललेल्या परिस्थितीत आयोजनाची तयारी कशी असेल, यावर निर्णय ठरेल. 

साहित्य महामंडळाकडे आगामी संमेलनासाठी नाशिक, अंमळनेर आणि पुण्यातील सरहद संस्थेचे दिल्लीकरिता अशा तीन ठिकाणांहून संमेलनासाठी निमंत्रणे आली आहेत. वर्धा येथून निमंत्रण येण्याची शक्यता आहे. एप्रिल २०१५ मध्ये पंजाबमधील घुमान येथे संमेलन आयोजित करण्याचा मान सरहद संस्थेला देण्यात आला होता.  जानेवारीमध्ये उस्मानाबाद येथे झालेल्या साहित्य संमेलनावेळी नाशिक आणि अंमळनेर येथून पुढील संमेलनासाठी निमंत्रणे आली होती.त्या निमंत्रणावर बैठकीत चर्चा होणार आहे.  मात्र  करोनामुळे परिस्थिती बदलल्याने या दोन शहरातील संस्थांची आर्थिक तयारी आहे का, याचा विचार केला जाणार आहे. याउलट सरहदने ऐन करोनाकाळात महामंडळाला प्रस्ताव पाठवून आगामी संमेलन दिल्लीत घेण्याची विनंती केली आहे. मात्र महामंडळाने अद्याप सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. करोनामुळे हे वर्ष आर्थिक संकटातून जात असताना संमेलनासाठी निमंत्रण देणार्‍या संस्था आयोजनाबाबत पुर्नविचार करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान, स्थळ निश्चित नसल्याने महामंडळाला शासनाकडून संमेलनासाठी मिळणारे ५० लाख रुपयांचे अनुदान देखील अद्याप मिळू शकलेले नाही. शासनाकडून महामंडळाला सातत्याने विचारणा होत आहे. मात्र महामंडळाने अद्याप शासनाला संमेलनाबाबत ठोस कोणताही निर्णय कळविलेला नाही. त्यामुळे या बैठकीकडे  मराठी बांधवांचे लक्ष लागले आहे.....संमेलनासंदर्भातील बैठकीसाठी सदस्यांना पत्र पाठविण्यात आली आहेत. संस्था आयोजनाला तयार आहेत का? संमेलन कशा पद्धतीने करायचे? निधी उपलब्ध होईल का? असे सगळे प्रश्न आहेत. संमेलनाच्या संदर्भात ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्याचा विचार केला जाईल- -प्रा. कौतिकराव ठाले-पाटील, अध्यक्ष साहित्य महामंडळ.....

टॅग्स :Puneपुणेakhil bharatiya marathi sahitya mahamandalअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळmarathiमराठीcorona virusकोरोना वायरस बातम्या