शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

मविआने आवळली वज्रमूठ, कर्नाटक निकालाने बळ; जागावाटपाची चर्चा लवकरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2023 06:06 IST

उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन स्थगित करण्यात आलेली वज्रमूठ सभा पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.

मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या घवघवीत यशानंतर राज्यातील महाविकास आघाडीतही उत्साहाचे वातावरण आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक रविवारी मुंबईत शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी झाली. 

उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन स्थगित करण्यात आलेली वज्रमूठ सभा पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी तीनही पक्षाचे प्रमुख आणि इतर घटक पक्ष बसून जागा वाटपाबाबत चर्चा करण्याचा निर्णयही या बैठकीत झाला. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा झालेला एकहाती विजय आणि राज्याच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावरही बैठकीत चर्चा झाली. 

महाराष्ट्रातही एक ठाम राजकीय  पर्याय देण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीचा असणार आहे, यावर या बैठकीत एकमत झाल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावेळी  सांगितले.

कोण कोण होते उपस्थित : राष्ट्रवादीकडून स्वतः शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, शिवसेनेकडून उद्धव ठाकरे, संजय राऊत, तर काँग्रेसकडून नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, भाई जगताप, नसीम खान हे नेते बैठकीला उपस्थित होते.

कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातही जनतेच्या विश्वासाला पात्र ठरून अधिक मोठ्या संख्येने आणि ताकदीने महाविकास आघाडी पुढच्या काळात काम करेल, असा विश्वास महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बैठकीनंतर व्यक्त केला. 

आघाडीत नाराजी नाहीमहाविकास आघाडीत कुठेही नाराजी नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी स्पष्ट केले. ‘वज्रमूठ’ची एक मोठी सभा पुण्यात करून त्यात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्याबाबत चर्चा झाल्याचेही पटोले यांनी सांगितले.

कर्नाटकच्या विजयाने पूर्ण देशाला एक ऊर्जा मिळाली आहे. असंवैधानिक पद्धतीने राज्यातील ठाकरे सरकार पाडले गेले, ते सर्वोच्च न्यायालयाने समोर आणले आहे. याबाबत आम्ही लोकांपर्यंत निकालाची माहिती पोहोचवणार असल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले.   

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीMaharashtraमहाराष्ट्रNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाKarnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूक