शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

लग्न करताय?... थांबा! प्रिमॅरिटल काउन्सेलिंग जरूर करा!

By admin | Published: March 14, 2016 1:29 AM

दोघांनी एकमेकांना पसंत केलं... दोघांनाही आपण ‘मेड फॉर इच अदर’ असल्यासारखं फिलिंग आलं... बघता बघता साखरपुडाही झाला... आणि अचानक दोघांना एकमेकांमध्ये काहीतरी हरवल्यासारखं

नम्रता फडणीस/सायली जोशी, पुणेदोघांनी एकमेकांना पसंत केलं... दोघांनाही आपण ‘मेड फॉर इच अदर’ असल्यासारखं फिलिंग आलं... बघता बघता साखरपुडाही झाला... आणि अचानक दोघांना एकमेकांमध्ये काहीतरी हरवल्यासारखं जाणवायला लागलं... आपण थोडं थांबून जरा विचार करू या... लग्नाची घाई नको करायला, असं दोघांनीही वाटलं... आणि दोघांचं लग्न तुटलं... हे काहीसं प्रातिनिधिक उदाहरण असलं तरी आज अनेक जोडपी आहेत; ज्यांची साखरपुडा झाल्यानंतर, लग्न झाल्यानंतर आणि अगदी एक किंवा दोन मुले झाल्यावरही आपण राहू शकत नाही अशी भावना मनात आल्यामुळे लग्नाचे बंध तुटले आहेत. मात्र वेळ निघून गेल्याचे जाणवते.समाजात हे प्रमाण दिवसागणिक वाढत चालले आहे. दोघांना असे का वाटले? जोडीदारामध्ये त्या नक्की काय शोधत आहेत, एकमेकांकडून त्यांच्या अपेक्षा कोणत्या आहेत? का फक्त शारीरिक आकर्षण आहे? या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्नच जोडप्यांकडून केला जात नाही. त्यामुळे समाजात लग्न तुटणे, घटस्फोट होणे यांसारख्या माध्यमातून नाती दुरावत असल्याचे आपल्यासमोर येते. परंतु या नवरा-बायकोच्या नात्यांचा प्रवास समजावून घेण्यासाठी ‘प्रिमॅरेटिअल काउन्सेलिंग’ होणे आवश्यक असल्याचे समुपदेशकांचे म्हणणे आहे. लग्न म्हणजे खेळ नसतो, तो दोन जिवांचा मेळ असतो. दुकानामधून एखादी गोष्ट विकत घेण्यापूर्वी आपण किती बारीकसारीक गोष्टींचा विचार करतो, मग प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात आनंदी क्षण ठरणाऱ्या लग्नाबद्दल जोडप्यांकडून एकमेकांचा स्वभाव, व्यक्तिमत्त्व, स्त्री-पुरुष म्हणून एकमेकांकडून असणाऱ्या अपेक्षा यांचा का विचार केला जात नाही? तो केला असता तर लग्न तुटणे, घटस्फोटासारख्या परिणामांना सामोरे जाण्याची वेळ आलीच नसती. आज कितीतरी जोडपी अशी आहेत, ज्यांना निवडलेल्या जोडीदाराबरोबर लग्न करण्याचा पश्चाताप होत आहे. विसंवादामुळे कितीतरी जोडप्यांची लग्ने मूल झाल्यावरही संपुष्टात आली असल्याचे दिसते. परंतु, ही वेळ येऊच नये यासाठी जोडप्यांचे ‘प्रिमॅरेटिअल काउन्सेलिंग’ होणे ही काळाची गरज बनली आहे. लग्नापूर्वी समुपदेशन करणारे समुपदेशकच याची समाजातील आवश्यकता अधोरेखित करतात. काही स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून ‘प्रिमॅरेटिअल काउन्सेलिंग’चे अभ्यासक्रमही राबविले जात आहेत, हे त्यातील विशेष!> प्रिमॅरेटिअल काउन्सेलिंगचे अनेक फायदेस्त्री व पुरुष किंवा व्यक्तिमत्त्व म्हणजे काय, हे कळते.नवरा कसा आहे - आक्रमक की मृदू? अथवा बायको कशी आहे हळवी की रोमॅन्टिक? त्या दोघांच्या स्वभावाचे गुणधर्म काय, हे समजायला मदत होते.तिच्या किंवा त्याच्या कोणत्या स्वभावाशी मी तडजोड करू शकतो? हे आधीच ठरवता येऊ शकते.लग्नानंतर वादाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता निर्माण होते. विवाहसंस्था टिकण्यास हातभार लागू शकतो. > प्रिमँरेटिअल काउन्सिलिंगची गरज का? लग्न या संकल्पनेबाबत योग्य ते ज्ञान मिळावेनातेसंबंधांबाबत पुरेसे मार्गदर्शन व्हावेसहनशक्ती आणि एकमेकांबद्दल आदर निर्माण व्हावाभविष्यात आपल्याला काही तडजोडी करायच्या आहेत याची जाणीव व्हावीएकमेकांची कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक परिस्थिती समजावीस्वभाव समजून घेऊन त्यानुसार कृतिशीलतेकडे पाऊल पडावेभविष्यात आपल्यापुढे असणारी कौटुंबिक आव्हाने अवगत व्हावीत