शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

Maharashtra Cabinet Expansion : ठाकरे सरकारमध्ये मराठवाड्याला मिळाले सात मंत्रिपदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2019 17:52 IST

Maharashtra Cabinet Expansion : मराठवाड्याचा पारड्यात एकाचवेळी 7 मंत्रिपदे पडली असल्याने याचा फायदा मराठवाड्याला होणार असल्याचे बोलले जात आहे.

मुंबई: उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर तब्बल 34 दिवसांनंतर ठाकरे सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार सोहळा आज पार पडला. विधानभवन परिसरात महाविकास आघाडीचे 36 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. तर उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात मराठवाड्याला सात मंत्रिपदे मिळाली आहेत.

मराठवाड्यातील सात जणांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातून संदीपान भुमरे यांची कॅबिनेट मंत्रिपदी तर अब्दुल सत्तार यांची राज्यमंत्रीपदी वर्णी लागली आहे. तर नांदेडमधून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना सुद्धा कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले आहे. तसेच लातूर जिल्ह्यातून अमित देशमुख यांच्याकडे कॅबिनेट मंत्रिपदाची तर उदगीर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार संजय बनसोडे यांची राज्यमंत्री पदावर वर्णी लागली आहे.

त्याचप्रमाणे बीडमधून धनंजय मुंडे यांना सुद्धा कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले आहे. तर जालन्यातून राजेश टोपे यांनी सुद्धा कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यामुळे भविष्यात मराठवाड्याचा विकासात भर पडणार असल्याचे बोलले जात आहे.

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे, काँग्रेसच्या दिवंगत नेते विलासराव देशमुख आणि शिवाजीराव निलेंगेकर या नेत्यांनी सत्तेत असो किंवा विरोधात, नेहमीच मराठवाड्याचा विकासासाठी आवाज उठवला असल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र त्यांनतर मराठवाड्यात अशोक चव्हाण आणि पंकजा मुंडे या दोन नेत्यांवेतिरिक्त सक्षम असा मंत्रीपदाचा चेहरा पाहायला मिळाला नाही. मात्र आता पुन्हा मराठवाड्याचा पारड्यात एकाचवेळी 7 मंत्रिपदे पडली असल्याने याचा फायदा मराठवाड्याला होणार असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीministerमंत्रीMarathwadaमराठवाडाPoliticsराजकारणCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तार