शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

कर्नाटकच्या गृहमंत्र्यांच्या 'त्या' विधानानं बेळगावातील मराठी भाषिक संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2019 6:16 PM

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या भूमिकेकडे लक्ष

बेळगाव: महाराष्ट्र एकीकरण समिती कर्नाटक राज्योत्सवदिनी काळा दिन पाळते, ही मोठी चूक आहे असे वक्तव्य कर्नाटकचे गृहमंत्री बसवराज बोम्माई यांनी सांबरा विमानतळावर पत्रकारांशी बोलताना केले. बोम्मई यांच्या वक्तव्याने मराठी भाषिक जनतेत संतापाची लाट उसळली आहे. आता समिती याला काय प्रत्त्युत्तर देणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.ज्या राज्यात राहतात तेथेच काळा दिन पाळायचे हे काही बरोबर नाही. अधिकाऱ्याकडून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या काळ्या दिनाबाबत माहिती मागवली आहे. यापूर्वी देखील बेळगाव जिल्ह्याचा पालकमंत्री असतानादेखील समितीच्या काळ्या दिनाबाबत जी काही कारवाई करायची ती केलेली आहे. आताही पोलीस अधिकाऱ्यांकडून अहवाल आल्यावर लगेच योग्य ती कारवाई करणार आहे. कायदा सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी योग्य ती पावले उचलली जातील, असे बोम्माई म्हणाले.महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील पाण्याच्या वादावर तोडगा निघत आहे. मुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री याबाबत महाराष्ट्राशी बोलणी करून योग्य निर्णय घेणार आहेत असे बोम्माई यांनी सांगितले. 

टॅग्स :maharashtra ekikaran samiteeमहाराष्ट्र एकीकरण समितीbelgaonबेळगाव