शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 07:19 IST

Toll Collection: महाराष्ट्रासह देशभरातील टोल टॅक्सवरील वसुलीचा आकडा वर्षाकाठी पाचशे ते हजार कोटींनी वाढत चालला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. टोल वसुलीच्या बाबतीत उत्तर प्रदेश पहिल्या, तर महाराष्ट्र चौथ्या स्थानी आहे.

- चंद्रशेखर बर्वेनवी दिल्ली : महाराष्ट्रासह देशभरातील टोल टॅक्सवरील वसुलीचा आकडा वर्षाकाठी पाचशे ते हजार कोटींनी वाढत चालला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. टोल वसुलीच्या बाबतीत उत्तर प्रदेश पहिल्या, तर महाराष्ट्र चौथ्या स्थानी आहे.

केंद्रीय रस्ते, परिवहन आणि महामार्ग मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्ग बांधण्यावर आलेला खर्च वसूल झाल्यानंतर टोल टॅक्स घेता येणार नाही असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट  केले आहे. यानंतरही टोल टॅक्स वसुलीची रक्कम दरवर्षी पाचशे ते हजार कोटींनी वाढत आहे. २०२०-२१ ते २०२४-२५ (फेब्रुवारी २५ पर्यंत) या मागील पाच वर्षांत देशात २ लाख २० हजार ५९० कोटी रुपयांचा टोल वसूल करण्यात आला. यात सर्वाधिक उत्तर प्रदेशातून २७ हजार १४ कोटी रुपयांचा टोल वसूल केला गेला. यानंतर राजस्थानमधून २४,२०९ कोटी, महाराष्ट्रातून २१,१०५ कोटी आणि गुजरातमधून २०,६०७ कोटींची टोल वसुली झाली.

वसुलीची रक्कम वाढतीचटोल वसुलीची रक्कम दरवर्षी वाढत आहे. २०२०-२१ मध्ये टोल नाक्याचे उत्पन्न २७,९२६ कोटी रुपये होते. २०२१-२२ मध्ये यात ६००२ कोटी, २०२२-२३ मध्ये १४,१०४ कोटी आणि २०२३-२४ मध्ये ७८५० कोटी रुपयांचा टोल वसूल केला. २०२४-२५ फे. पर्यंत ५४,८२० कोटींचा एकूण टोल वसूल केला गेला.

महाराष्ट्रात किती टोल नाकेमहाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्गावर ७५ पेक्षा जास्त टोल नाके आहेत. मागील पाच वर्षांत मराठी माणसाने २१,१०५ कोटी १८ लाख रुपयांचा टोल दिला आहे. 

महाराष्ट्रात टोल वसुली२०२०-२१    २५९०.८५२०२१-२२    ३३८६.२१२०२२-२३    ४६६०.२१२०२३-२४    ५३५२.५३२०२४-२५    ५११५.३८रक्कम कोटीत/(फेब्रुवारीपर्यंत)

टॅग्स :tollplazaटोलनाकाMaharashtraमहाराष्ट्र