शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

'मुख्यमंत्री झाले; तरीही मराठा समाज मागासच'; हायकोर्टात महाधिवक्त्यांचा युक्तिवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 05:58 IST

आरक्षणासंबंधी आधी व आताच्या कायद्यात काय फरक आहे? असा प्रश्न मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय, न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. फिरदोश पुनीवाला यांच्या पूर्णपीठाने केला.

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देण्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकांमध्ये मंगळवारपासून राज्य सरकारने आपली बाजू मांडण्यास सुरुवात केली. राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी सरकारची बाजू उच्च न्यायालयात मांडली. एखाद्या समाजाचे मुख्यमंत्री झाले म्हणून तो संपूर्ण समाज मागास नाही, असे म्हणू शकत नाही. काळानुरूप मराठा समाज मागे राहिला आणि लोकांची आर्थिक स्थिती खालावली. त्यामुळे या समाजाला आरक्षण देण्याचा सरकारचा निर्णय योग्य आहे, असे सराफ यांनी न्यायालयाला सांगितले.

आरक्षणासंबंधी आधी व आताच्या कायद्यात काय फरक आहे? आधीचा कायदा रद्द केल्यानंतर अशी कोणती असामान्य परिस्थिती निर्माण झाली की, त्यामुळे नवा कायदा करण्यात आला? असा प्रश्न मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय, न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. फिरदोश पुनीवाला यांच्या पूर्णपीठाने केला. सराफ यांचा युक्तिवाद संपलेला नसून आता ५ डिसेंबर रोजी पुढील सुनावणी होईल.

युद्धानंतर समाज मागास होत गेला! 

कायदा जरी सारखाच असला तरी आधीचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नव्हता. आता तपशिलात माहिती घेऊन सर्व निकषांचे पालन करून मराठा समाजाला आरक्षण देण्यासंबंधी कायदा केला आहे, अशी माहिती सराफ यांनी न्यायालयाला दिली. 

शुक्रे आयोगाने तपशिलात अभ्यास करून मराठा समाजाला आरक्षण देण्याची शिफारस केली आहे. मराठे लढवय्ये होते. युद्ध बंद झाल्यानंतर मराठा समाजाकडे जमीन राहिली नाही. त्यामुळे ते कष्टकरी झाले. 

त्यांनी मिळेल ती कामे स्वीकारली. त्यांची आर्थिक स्थिती अधिक खालावली. त्यामुळे ते सामाजिक व आर्थिकरीत्या मागास झाले, असेही सराफ यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणmarathaमराठाHigh Courtउच्च न्यायालयMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार