शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
2
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
3
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
4
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
5
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
6
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
7
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
8
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
9
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
10
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
11
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
12
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
13
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
14
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
15
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
16
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
17
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
18
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
19
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
20
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...

'मुख्यमंत्री झाले; तरीही मराठा समाज मागासच'; हायकोर्टात महाधिवक्त्यांचा युक्तिवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 05:58 IST

आरक्षणासंबंधी आधी व आताच्या कायद्यात काय फरक आहे? असा प्रश्न मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय, न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. फिरदोश पुनीवाला यांच्या पूर्णपीठाने केला.

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देण्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकांमध्ये मंगळवारपासून राज्य सरकारने आपली बाजू मांडण्यास सुरुवात केली. राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी सरकारची बाजू उच्च न्यायालयात मांडली. एखाद्या समाजाचे मुख्यमंत्री झाले म्हणून तो संपूर्ण समाज मागास नाही, असे म्हणू शकत नाही. काळानुरूप मराठा समाज मागे राहिला आणि लोकांची आर्थिक स्थिती खालावली. त्यामुळे या समाजाला आरक्षण देण्याचा सरकारचा निर्णय योग्य आहे, असे सराफ यांनी न्यायालयाला सांगितले.

आरक्षणासंबंधी आधी व आताच्या कायद्यात काय फरक आहे? आधीचा कायदा रद्द केल्यानंतर अशी कोणती असामान्य परिस्थिती निर्माण झाली की, त्यामुळे नवा कायदा करण्यात आला? असा प्रश्न मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय, न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. फिरदोश पुनीवाला यांच्या पूर्णपीठाने केला. सराफ यांचा युक्तिवाद संपलेला नसून आता ५ डिसेंबर रोजी पुढील सुनावणी होईल.

युद्धानंतर समाज मागास होत गेला! 

कायदा जरी सारखाच असला तरी आधीचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नव्हता. आता तपशिलात माहिती घेऊन सर्व निकषांचे पालन करून मराठा समाजाला आरक्षण देण्यासंबंधी कायदा केला आहे, अशी माहिती सराफ यांनी न्यायालयाला दिली. 

शुक्रे आयोगाने तपशिलात अभ्यास करून मराठा समाजाला आरक्षण देण्याची शिफारस केली आहे. मराठे लढवय्ये होते. युद्ध बंद झाल्यानंतर मराठा समाजाकडे जमीन राहिली नाही. त्यामुळे ते कष्टकरी झाले. 

त्यांनी मिळेल ती कामे स्वीकारली. त्यांची आर्थिक स्थिती अधिक खालावली. त्यामुळे ते सामाजिक व आर्थिकरीत्या मागास झाले, असेही सराफ यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणmarathaमराठाHigh Courtउच्च न्यायालयMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार