शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation News : आता सरकारनं गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही; मनोज जरांगे पाटलांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2023 13:31 IST

Maratha Reservation: will not back down even if they shoot; Manoj Jarange Patal's warning to government अंतरवालीसारखा प्रयोग करण्याचा प्रयत्न करू नका. कोट्यवधी मराठा एकत्र आलाय त्यामुळे ते सरकारला जड जाईल असा इशारा जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. 

छत्रपती संभाजीनगर - Manoj Jarange Patil on Maratha Reservation ( Marathi News ) सरकारच्या डोक्यात जे आहे, ते सरकार करतंय. जनतेच्या मनातलं सरकार करत नाही. मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण मिळवून देण्याची आमची भूमिका आहे. मराठा आणि कुणबी एकच आहे असे लाखो पुरावे आहेत. मग कशाला आम्हाला फुफाट्यात ढकलताय? मराठा समाज ओबीसीमध्ये आहे. महाराष्ट्रातल्या सरसकट समाजाला ओबीसीतील हक्काचे आमचे आरक्षण द्यावे. सरकार धरसोड करतंय. सरकार आरक्षण देईल वाटत नसल्याने आम्ही मुंबईला चाललोय. आम्हाला मुंबईला जाण्याची हौस नाही. मराठा समाज इतका घरातून बाहेर पडणार आहे की, गोळ्या घातल्या तरी आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. 

छत्रपती संभाजीनगर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत जरांगे म्हणाले की, मुंबईला गेल्यावर आता माघारी नाही. मी जे जे बोललो ते केले आहे. मी माझ्या समाजासाठी पूर्ण ताकद पणाला लावायची माझी तयारी आहे.वेळेप्रसंगी जीव गेला तरी चालेल. जर ही संधी गेली तर मराठा पोरांचे खूप हाल होणार आहेत. आरक्षण मिळाले नाही तर भविष्यात खूप नुकसान होणार आहे. मराठ्यांनी सावध व्हा, सर्वांनी घरे सोडा. आज केले नाही तर कधीच होणार नाही. नाईलाज असल्याने आम्हाला मुंबईला यावे लागणार आहे. मराठ्यांनो घरी बसू नका. आपल्या लेकरांसाठी आरक्षण घ्यायचे आहे. २० तारखेपासून अंतरवालीतून पायी निघायचे आणि आरक्षण घेतल्याशिवाय माघारी परतायचे नाही असं आवाहन त्यांनी केले. 

त्याचसोबत प्रकाश शेंडगे ज्येष्ठ नेते त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही. आम्ही आमच्या हक्काचे आरक्षण मागतोय. शेंडगेंनी गोरगरीब धनगरांना आरक्षण मिळावे यासाठी शक्ती पणाला लावावी. मराठा समाजही त्यांच्यासोबत आहे. विनाकारण त्यांनी शक्ती वाया घालवू नये. ते चळवळीतून आलेले नेते आहेत. त्यांच्याविषयी आणखी काय बोलणार नाही अशी प्रतिक्रिया जरांगे पाटलांनी दिली आहे. 

गृहमंत्री फडणवीसांना इशारा

मराठा समाजाने ठरवलंय, आपण आहोत तोपर्यंत लेकरांना आरक्षण मिळवून द्यायचे. सरकारला काय करायचे ते करावे. गुन्हे दाखल करून सरकारला नरेंद्र मोदींकडून पाठ थोपटून घ्यायची असेल. येडपाटाचे ऐकायचे म्हणून सरकार हे करतंय. सरकारनं शहाणे व्हावे. मराठ्यांशिवाय काही होऊ शकत नाही हे सरकारनं समजून घ्यावे. जर खोटे गुन्हे दाखल करून मराठा समाज दबला असता तर बीडमध्ये लाखोंचा जनसागर उसळला नसता. विनाकारण खोटे गुन्हे दाखल करून मराठा समाजाची नाराजी देवेंद्र फडणवीसांनी ओढावून घेऊ नका. कोणतेही ट्रॅक्टर रोखू नका. अंतरवालीसारखा प्रयोग करण्याचा प्रयत्न करू नका. कोट्यवधी मराठा एकत्र आलाय त्यामुळे ते सरकारला जड जाईल असा इशारा जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. 

दरम्यान, मी पण हिंदू आहेच. मराठा आरक्षण हा सामाजिक प्रश्न आहे. राम मंदिराचे उद्घाटन त्यावेळी आहे. हा प्रत्येकाच्या आनंदाचा सोहळा आहे. १८ तारखेपर्यंत मुंबईत १४४ लागू आहे त्यामुळे २० जानेवारीला मुंबईत जाणार हे घोषित केले. २० तारीख केवळ सरकार ५ महिने आरक्षण लांबवत आहे म्हणून धरली आहे असं जरांगे पाटलांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील