शहरं
Join us  
Trending Stories
1
'पीएम मोदी गोष्टी लपवतात; ट्रम्प त्या उघड करतात', रशियन तेल खरेदीवरुन काँग्रेसचे टीकास्त्र
2
कोट्यवधींचं घबाड! १ कोटी कॅश, लाखोंचे दागिने, ८५ ATM; चहावाल्याचा पर्दाफाश, पोलीस हैराण
3
फ्लॅटमध्ये लिव्ह-इनमध्ये राहत होतं जोडपं, दिवाळीच्या दिवशी दुर्गंधी आल्यानं उघडला तर...; दृश्य पाहून सगळेच हादरले
4
भारताच्या 'या' स्कीममुळे शेजारी चीनला लागली मिरची; तक्रार घेऊन पोहोचला WTO च्या दरबारी
5
बदल्याची आग! "माझ्यासोबत तुझी बहीण पळून..."; टोमण्यांना कंटाळला, घेतला तरुणाचा जीव
6
VIRAL VIDEO : महिलेच्या केसांत अडकला हेअर कर्लर अन् पुढे जे झालं ते बघून तुम्हीही व्हाल हैराण!
7
महिला वर्ल्डकपमध्ये आता सेमीफायनलच्या एका जागेसाठी ३ संघांमध्ये चुरस, भारतासाठी असं आहे समीकरण
8
"सांसें उधार हैं... दिल तो महाकाल का है"; भस्म आरतीआधी भक्ताला हार्ट अटॅक, स्टेटसची चर्चा
9
जो जीव तोडून मेहनत घेतोय त्याला BCCI नं येड्यात काढलं? मुंबईकरासाठी बड्या राजकीय नेत्याची बॅटिंग
10
सलग ८८ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ₹१ लाखाचे झाले ₹२,६०,०००; तुमच्याकडे आहे का हा स्टॉक?
11
७ राशींवर कायम लक्ष्मी-कुबेर कृपा, पैसे कमीच पडत नाही; शुभ तेच घडते, तुमची रास आहे का यात?
12
समोश्यावरून वाद सुरू झाला अन् तलवारीच बाहेर निघाल्या! शेतकऱ्याच्या मृत्यूने परिसर हादरला
13
"समजलं तर ठीक, नाही तर...!", कॅनाडामध्ये पंजाबी सिंगर तेजी कहलोंवर गोळीबार; रोहित गोदारा गँगनं घेतली जबाबदारी
14
चित्रांगदा सिंह रुग्णालयात दाखल, ऐन दिवाळीत अभिनेत्रीची तब्येत बिघडली; नक्की झालं तरी काय?
15
प्रायव्हसी धोक्यात? 'Apple Maps' गुपचूप ट्रॅक करतंय तुमची प्रत्येक लोकेशन! लगेच बंद करा 'ही' सेटिंग
16
IND vs AUS : 'मी सचिनपेक्षाही अधिक धावा केल्या असत्या!' पण… ऑस्ट्रेलियन क्रिकेटरचा मोठा दावा
17
Happy Bhaubeej 2025 Wishes: भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी ग्रीटिंग्स, Images, Facebook, Whatsapp Status द्वारा द्या प्रेमळ नात्याच्या लडिवाळ शुभेच्छा!
18
लेडी सिंघम! १४ व्या वर्षी लग्न, १८ व्या वर्षी २ मुलांची आई; स्वप्न केलं साकार, झाली IPS ऑफिसर
19
PPF vs FD: पीपीएफ की एफडी, कुठे गुंतवणूक केल्यावर मिळेल मोठा फायदा? कोणता पर्याय करुन देऊ शकते तुफान कमाई
20
Ladki Bahin Yojana : खूशखबर! भाऊबीजेआधी लाडक्या बहि‍णींसाठी खास ओवाळणी; ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार?

सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 20:20 IST

अखेर आज, जरांगे यांच्या मराठा आरक्षणासंदर्भातील मागण्यांवर सरकारने जीआर काढला आणि जरांगे यांनी पाच दिवसांपासून सुरू असलेले आपले उपोषण सोडले. यानंतर आता, यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसले होते. या आंदोलनासाठी राज्यातील शेकडो मराठा बांधव मुंबईत आले होते. अखेर आज, जरांगे यांच्या मराठा आरक्षणासंदर्भातील मागण्यांवर सरकारने जीआर काढला आणि जरांगे यांनी पाच दिवसांपासून सुरू असलेले आपले उपोषण सोडले. यानंतर आता, यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री? -मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "सर्वप्रथम मला राधाकृष्ण विखे पाटील जे या मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष होते आणि मंत्रीमंडळ उपसमितीतील सर्व प्रमुख नेत्यांचे तसेच आमच्या मंत्र्यांचे अतिशय मनापासून अभिनंदन करायचे आहे. त्यांनी सातत्याने बसून एकेका गोष्टीचा अभ्यास करून मोठ्या प्रमाणावर चर्चा  करून, हा मार्ग काढला. आता हा मार्ग निघाल्याने, जे मराठवाड्यात राहणारे आमचे मराठा समाजाचे लोक आहेत, कधी काळी त्यांच्या रक्त नात्यातील कुणाचाही कुणबी म्हणून उल्लेख झाला असेल, तर त्यांना आपल्या नियमाने ते प्रमाणपत्र (कुणबी प्रमाणपत्र) देता येते. तसेच, हैदराबाद गॅझिटियरमुळे अशा प्रकारच्या नोंदी शोधणे सोपे होणार आहे. त्यातून फॅमिली ट्री तयार करून, अशा प्रकारचे आरक्षण देता येणार आहे. म्हणजेच, ज्यांना अशा प्रकरारचा पुरावा मिळेल, त्या सर्वांना हे आरक्षण मिळेल." 

...अशा मराठा समाजाच्या लोकांनाच मिळणार फायदा -याच बरोबर, "औबीसी समाजात जी भीती होती की, सरसकट सर्वच अशा प्रकारचे आरक्षण घेतील आणि ज्यांच्याकडे पुरावा नाही, तेही आरक्षण घेतील आणि इतरही समाजाचे त्यात शिरण्याचा प्रयत्न करतील. तर तशा प्रकारे आता याठिकाणी होणार नाही. ज्यांचा खरा क्लेम आहे. पण कागदपत्रांच्या आभावी, त्यांना तो क्लेम मिळत नव्हता. अशा मराठा समाजाच्या लोकांना याचा फायदा मिळणार आहे. यामुळे मला असे वाटते की, मराठा समाजासाठी अतिशय चांगला निर्णय आणि विशेषतः हा संपूर्ण प्रश्न सर्वाधिक मराठवाड्यात होता. कारण मराठवाड्यात नोंदी नाहीत. म्हणून मराठवाड्यासाठी हा प्रश्न अत्यंत महत्वाचा होता आणि मराठवाड्यातून इतरही भागात राहण्यासाठी गेलेल्या लोकांसाठीही हा प्रश्न महत्वाचा होता," असे फडणवीस म्हणाले. 

मला असे वाटते की, त्यावर आम्ही संवैधानिक तोडगा काढू शकलो आहोत. एक असा तोडगा काढू शकलो आहोत की जो, न्यायालयातही टिकेल आणि त्यातून लोकाना फायदा होईल. म्हणून मी स्वतः देखील मंत्रिमंडळ उपसमितीच्या कामावर समाधानी आहे. त्यांनी उत्तम काम केले आहे. मी त्यांचे अभिनंदन करतो. या दरम्यान मुंबईकरांनाही थोडा त्रास सहन करावा लागला. त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो. पण मला वाटते की आपण एक चांगला निर्णय या ठिकाणी घेतला आहे," असेही फडणवीस म्हणाले.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण