शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
3
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
4
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
5
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
6
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
7
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
8
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
9
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
10
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
11
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
12
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
13
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
14
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
15
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
16
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
17
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
18
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
19
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
20
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation: 'पंतप्रधानांना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2018 19:57 IST

मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करा अन्यथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा अखिल भारतीय छावा संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला. 

लातूर : मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करा अन्यथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा अखिल भारतीय छावा संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला.  जावळे पाटील म्हणाले, छावाचे संस्थापक अण्णासाहेब जावळे यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न प्राधान्याने मांडला. गेली २५ वर्षे छावाचा लढा सुरू होता. त्यासाठी संघटनेने ५८ मोर्चे काढले. आज सकल मराठा समाज, क्रांती मोर्चाच्या माध्यमातून समाज एकवटला आहे. शांततेने मोर्चे काढले. आता ठोक मोर्चांनी सरकारची झोप उडविली आहे. वारंवार फसव्या घोषणा आणि सत्ताधा-यांच्या वादग्रस्त विधानांमुळे आंदोलन पेटले. त्यामुळे सरकारच्या पायाखालची वाळू सरकल्याने शासनकर्ते काही जणांना हाताशी धरून हे आंदोलन स्थगित करण्याच्या व दडपण्याच्या तयारीला लागले आहेत. परंतु जोपर्यंत आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आंदोलनाची धग शासनाला सोसावी लागेल. कुठेही स्थगिती होणार नाही की आंदोलन थांबणार नाही. स्वत:च्या खुर्च्या टिकविण्यासाठी जे लोक काही जणांना हाताशी धरून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करतील त्यांच्याशी छावा दोन हात करेल. शासन सवलतीच्या घोषणा करीत असले तरी कुठलाही अध्यादेश काढत नाही, शैक्षणिक सवलती मिळत नाहीत, असेही नानासाहेब जावळे पाटील म्हणाले. यावेळी विजयकुमार घाडगे पाटील, भगवान माकणे, राजाभाऊ गुंजरगे आदींची उपस्थिती होती.पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांचे सोहळे उधळणारमराठा आरक्षणाची अंमलबजावणी होईपर्यंत पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी जाहीर सोहळ्यांना हजेरी लावली तर सभा असो की कार्यक्रम तो उधळून लावू, असा इशाराही पत्रकार परिषदेत नानासाहेब जावळे यांनी दिला. मुख्यमंत्र्यांनी अगोदर निर्णय घ्यावा आणि नंतर चर्चेला बोलवावे. केंद्र सरकार आर्थिक निकषावर आरक्षण देण्याचा विचार करीत असले, तरी ती निव्वळ चालढकल आहे, असा आरोपही जावळे यांनी केला. आमदारांनी स्टंटबाजी करू नयेआमदारांनी राजीनामा देऊन स्टंटबाजी करण्यापेक्षा विधिमंडळात आरक्षणाचा मुद्दा प्रखरपणे मांडावा. याउलट खासदारांनी राजीनामे दिले तर केंद्रावर दबाव निर्माण होईल, असेही यावेळी जावळे म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMaratha Reservationमराठा आरक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा