शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
2
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
3
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
4
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
5
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
6
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सादर होतील हजारो कोटींच्या पुरवणी मागण्या; ८ डिसेंबरपासून अधिवेशनाला सुरवात
7
अरे बापरे! Grok वापरणाऱ्यांनो सावधान; लोकांच्या घराचे पत्ते, पर्सनल माहिती लीक, प्रायव्हसी धोक्यात
8
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
9
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
10
GenZमध्ये महाराष्ट्र सरकारची कार्यशैली लोकप्रिय; ६७% तरुणाईला देवेंद्र फडणवीसांवर 'विश्वास'
11
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
12
'बिनशर्त माफी मागा, अन्यथा पाच कोटींचा दावा ठोकणार' महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माजी मंत्री सुलेखा कुंभारे यांना नोटीस
13
Aaditya Thackeray : "साधुग्राम, तपोवन हवा पण भाजपाच्या बिल्डर मित्रांची दादागिरी नाही", आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
14
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
15
महामानवाला अभिवादन! CM फडणवीसांनी केली सरणत्तयं प्रार्थना; PM मोदींनीही वाहिली आदरांजली
16
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
17
America Visa : सोशल मीडियावर एक चूक कराल, तर तुमच्यासाठी बंद होतील अमेरिकेचे दरवाजे! काय आहे नियम?
18
२०२५ ची शेवटची संकष्ट चतुर्थी: ५ उपाय अवश्य करा, चिंतामुक्त व्हा; बाप्पाची अपार कृपा लाभेल!
19
Video - "मी नवरदेव आहे, पण स्वतःच्या लग्नालाच..."; इंडिगोमुळे अडकले प्रवासी, मांडली व्यथा
20
"आमच्या बॅगा कुठायत? घराची चावी त्यात आहे, भिकारी वाटलो का..."; मुंबई एअरपोर्टवर तुफान राडा
Daily Top 2Weekly Top 5

'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 17:16 IST

'मराठा आणि कुणबी एक आहेत' या संदर्भातील जीआर काढण्यासंदर्भात सरकारच्या शिष्टमंडळाचे काय म्हणणे आहे? यासंदर्भात खुद्द जरांगे पाटील यांनीच, मराठा बांधवांना माहीत दिली आहे...

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत. या आंदोलनासाठी राज्यातील शेकडो मराठा बांधव मुंबईत आले आहेत. आज जरांगे यांच्या उपोषणाचा ५ वा दिवस आहे. आज त्यांच्या मागण्यांसंदर्भात अंतिम मसुदा घेऊन उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांची भेट घेतली. दरम्यान, 'मराठा आणि कुणबी एक आहेत' या संदर्भातील जीआर काढण्यासंदर्भात सरकारच्या शिष्टमंडळाचे काय म्हणणे आहे? यासंदर्भात खुद्द जरांगे पाटील यांनीच, मराठा बांधवांना माहीत दिली आहे.

जरांगे म्हणाले, "आपण त्यांना (सरकारला) म्हणालो होतो, मराठा आणि कुणबी एक आहेत हा 58 लाख नोंदणीचा जीआर काढा. त्यांचे म्हणणे आहे की, प्रक्रिया थोडी किचकट आहे, महिनाभराचा वेळ द्या. तुमच्या सर्वांच्या म्हणण्यानुसार, मराठा आणि कुणबी एक आहे, हा जीआर काढण्यासाठी, मी म्हणालो, एक नाही दीड महिना घ्या, पण जीआर काढा. पुढे जरांगे म्हणाले, विखे साहेब बरोबर ना? विखे साहेबांचा हात जरा जड दिसतोय ते म्हणाले दोन महिने म्हणा दोन महिने. बरं दोन महिने. चला त्यांच्या म्हणण्या प्रमाणे. कारण शिंदे समितीने आपल्याला विखे साहेबांचे नाव सांगितले आहे."  

"रीहिला विषय 'सगेसोयरे'चा, त्यावर आलेल्या हरकतींच्या छाननीसाठी थोडा वेळ लागणार आहे. आठ लाख आणखी हरकती आल्या आहेत, असे त्यांचे (शिष्टमंडळाचे) म्हणणे आहे, असेही जरांगे म्हणाले. 

"खाताना मराठ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराप्रमाणे चालायचे" -जरांगे पुढे म्हणाले, "पोरांनो तुम्हाला इमानदारीने सांगतो. जोवर मी आहे, तोवर तुम्हाला डंख नाही. तुम्ही पोरं समजून घ्या, खाताना मराठ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराप्रमाणे चालायचे. तुम्ही थोडा घास खाल्ला, तर पोट भरचालेल आणि तुम्ही एकदमच जर ओंजलभर खाल्ला तर नरड्यात गुंतण्याची दाट शक्यता असते. छत्रपती शिवरायांनी आपल्याला त्या प्रकारचं स्वराज्य दिलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी पुढच्याला कळू तर दिले नाही, पण कापून तर माघारी आले, बिना कापल्याचं माघारी आले नाही." 

"थोडंसं डोक्या डोक्याने चालू, या न होणाऱ्या गोष्टी व्हायला लागल्यात. दोन गॅझिटियरची ते आंमल बजावणी करून, ते इतर सहा मागण्याची अंमल बजावणी  करत आहेत. सर्वांचा जीआर काढून." असे जरांगे यांनी सांगिलते. यावेळी त्यांनी विखेंना विचाले, विखे साहेब, सर्वांचा जीआर काढत आहात ना? यावर विखे यांनी होकार दर्शवला. 

काय म्हणाले विखे पाटील -यावर राधाकृष्ण विखे म्हणाले, "मी जरांगे पाटील यांच्या माध्यमातून एवढे सांगतो की, हे तर आम्ही करतच आहोत. पण जे लोकांची मागणी कधीही पूर्ण झाली नसती, गेले 50 वर्ष मराठवाडा स्वतंत्र झाल्यानंतर, मी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मागे लागून, त्यांनीही याला होकार दिला. आपण त्या मदतमाश-खिदमतमाशच्या जवळ-जवळ दीड लाख हेक्टर जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर परत करून दिल्या आहेत गेल्या काही महिन्यात. धारशिव शहर संपूर्ण क्लास टूवर होतं. ते आता क्लास वनवर आलं. यामुळे धाराशिव, नांदेड, बीड, जिल्ह्यातील लोकांना याचा फार उपयोग झाला. म्हणजे आपली भूमिका अगदी सकारात्मक आहे. पण आपण ज्या भूमिका मांडत आहात. याची जाणीव आम्हाला आहे ना. यामुळेच आम्ही चार पाच दिवस कायद्याच्या सर्व बाबी तपासूनच आपल्याकडे आलो आहोत." 

यावर, "हे झालंय, आता समाजाचा आपमाण होऊ देऊ नका. तसेच यात कुणी आडवं आलं तरी, हे टिकवण्याची जबाबदारी आपण सर्वांनी घ्यावी," असे जरांगे म्हणाले. 

 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील