शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
2
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
3
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
4
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
5
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
6
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
7
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
8
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
9
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
10
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
11
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
12
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
13
दही की ताक... आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय? फायदे समजल्यावर व्हाल चकित
14
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
15
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
16
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
17
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
18
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
19
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
20
रेल्वेत सेक्शन कंट्रोलर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया!

जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 15:38 IST

जरांगेंच्या प्रत्येक भाषणात हिंसक गोष्टींचा उल्लेख होतो. मुंबईत अघटित घटना घडवण्याचा त्यांचा हेतू होता असा आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी केला.

मुंबई - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी चलो मुंबईची हाक दिली आहे. येत्या २७ ते २९ ऑगस्ट या काळात मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनाला बसणार असा पवित्रा जरांगे यांनी घेतला आहे. मात्र मुंबई हायकोर्टाने मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्यास मनाई केली आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी केलेल्या याचिकेवर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. यावेळी मुंबईतील मराठा आंदोलनाला हायकोर्टाकडून निर्बंध घालण्यात आले आहेत. 

याबाबत गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, मुंबईकरांनी सुटकेचा नि:श्वास घेता येणार आहे. हायकोर्टाच्या निर्णयानंतर सामान्यांना वेठीस धरणाऱ्यांना धक्का दिला आहे. जरांगेंना मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करता येणार नाही. जरांगेंचे आंदोलन राजकीय आहे. त्यांचे आंदोलन मराठा समाजाची दिशाभूल करणारे आहे. आझाद मैदानातील आंदोलनाच्या संहिता सगळ्यांना लागू आहे. जरांगेंच्या प्रत्येक भाषणात हिंसक गोष्टींचा उल्लेख होतो. मुंबईत अघटित घटना घडवण्याचा त्यांचा हेतू होता. न्यायालयापेक्षा कुणी मोठे नाही. जर न्यायालयाचा अवमान केला तर ६ महिने जेलमध्ये राहावे लागेल असं त्यांनी सांगितले.

मी मुंबईला जाणारच...

आम्ही न्यायदेवतेचा सन्मान करणारे लोक आहोत, आम्ही रितसरपणे संविधानाच्या आणि कायद्याच्या नियमात राहून आंदोलनासाठी अर्ज केला आहे. न्यायदेवता आम्हाला न्याय देईल. कायदा जनतेसाठी आहे. जनतेचे गाऱ्हाणे ऐकून घेणे कायद्याचे आणि सरकारचे काम आहे. आम्हीही हायकोर्टात आमची बाजू मांडू. लोकशाहीप्रमाणे करणारे आंदोलन रोखता येणार नाही. सत्ताधाऱ्यांनी गोर गरिबांच्या भावनेशी इतके खेळू नये. मराठ्यांचा संयम देवेंद्र फडणवीस यांनी बघू नये. आम्हाला आंदोलन का नाकारले जातेय त्याचे कारण तरी कळू द्या असं मनोज जरांगे पाटील यांनी हायकोर्टाच्या निर्णयावर म्हटलं. 

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी शिंदे समितीला ६ महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे अशी माहिती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. मराठा आरक्षणासाठी उपसमितीची आज बैठक पार पडली. त्या बैठकीत मराठा आरक्षणावर चर्चा करण्यात आली. जरांगेंच्या मागण्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत. जरांगेंशी सरकारसोबत बोलण्याची तयारी आहे का हा प्रश्न आहे. हैदराबाद गॅझेटचा आढावा आजच्या बैठकीत घेतला. जरांगे पाटलांनी काय बोलावे, आरोप करावे हा त्यांचा अधिकार आहे. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी १६ टक्के आरक्षण मराठा समाजाला दिले मात्र मविआ सरकारने हे आरक्षण घालवले. मराठा आरक्षणावर शरद पवार, उद्धव ठाकरे भूमिका घ्यायला तयार नाहीत. आरक्षणासाठी काय केले हे त्यांनी जनतेला सांगावे असं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं. 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलGunratna Sadavarteगुणरत्न सदावर्तेRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील