शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
2
"राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र
3
नेपाळचे माजी पंतप्रधान ओली यांना काठमांडू सोडण्यास मनाई, पासपोर्ट निलंबित, देखरेखीखाली ठेवले
4
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
5
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
6
या नालायकांबरोबर युती करणार नाही; शिंदेसेनेच्या आमदाराची अजितदादांच्या राष्ट्रवादीवर बोचरी टीका
7
शेअर बाजाराची मजबूत सुरुवात: सेन्सेक्स १३६ अंकांनी वधारला, निफ्टी २४,७०० च्या जवळ; हे स्टॉक्स तेजीत
8
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
9
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
10
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
11
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
12
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
13
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
14
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
15
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
16
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
17
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
18
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
19
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
20
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान

"तुमच्याकडं हुशारी हाय ना, मग..."; टीका करणाऱ्यांवर मनोज जरांगे पाटील संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 13:25 IST

तुमचे ज्ञान तिकडे वापरा. सगेसोयरा हा शब्द पक्का आहे. समाजाच्या बाजूने तुम्ही लिहा असंही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. 

रायगड - गोरगरीब मराठ्यांसाठी ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्यांच्यासाठी हा कायदा खूप महत्त्वाचा आहे. परंतु जे अभ्यासक, वकील, घटनातज्ज्ञ, कायदेशीर अभ्यास असणाऱ्यांनी आता ताकदीनं तुमचं म्हणणं मांडा. सगेसोयरे हा शब्द आता फिक्स झालाय. ते फायनल आहे. आता हा कायदा मजबूत कसा करता येईल ते मांडा. सोशल मीडियावर चर्चा करून कशाला दुही दाखवता? गैरसमज पसरवता..तुमच्याकडे हुशारी आहे ना, ती समाजाने मान्य केली. मग समाजासाठी तुमची हुशारी दाखवा. सोशल मीडियावर लिहायला लागले. आम्हाला काही कळत नाही वाटतं का तुम्हाला अशा शब्दात टीका करणाऱ्यांवर मनोज जरांगे पाटील संतापले. 

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, १५ दिवसांच्या हरकती मागितल्या आहेत. त्यात आपले म्हणणं मांडा. त्यामुळे ताकदीने लढता येईल. मी एकाकी लढण्यापेक्षा तुम्हीही पाठिंबा द्या ना..सोशल मीडियावर कशाला लिहिता?, लाख कोटी मराठे गेले, तुम्ही आम्हाला येडं समजता का? मराठवाड्यातील मराठ्यांना विनंती आहे की सगेसोयरे या शब्दामुळे एकही मराठा आरक्षणापासून वंचित राहणार नाही हा माझा शब्द आहे. १९८४ च्या गॅझेटनुसार मराठवाड्यातील सगळा मराठा हा कुणबी आहे. तुम्ही धीर धरा. मराठवाड्यातील मराठ्यांनी टेन्शन घेऊ नका. फक्त एकजूट राहा. मराठवाड्यातील मराठा हा कुणबीत जाणार आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच या कायद्यामुळे मराठवाड्यासह महाराष्ट्रातील एकही मराठा आरक्षणापासून वंचित राहणार नाही. ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांनी तातडीने नातेवाईकांनाही अर्ज करायला सांगा. पटापट कुणबी प्रमाणपत्रे काढून घ्या. जितका विरोध होईल तितका हा कायदा मजबूत आहे समजून घ्या. नोंद नसलेल्या मराठ्यांसाठी हा कायदा आहे. ज्याची नोंद मिळाली तो तुमचा सोयरा आहे का हे बघा, लगेच नोंद करून घ्या. २-४ लोक काय बोलले म्हणून कोट्यवधी मराठे बोलतायेत असं नाही. हा कायदा पक्का आहे. सोशल मीडिया, मोबाईलवर लिहेपर्यंत हरकतीवर म्हणणं मांडा. तुमचे ज्ञान तिकडे वापरा. सगेसोयरा हा शब्द पक्का आहे. समाजाच्या बाजूने तुम्ही लिहा असंही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. 

रायगडला शिवरायांच्या दर्शनासाठी जाणार विश्वाची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन घेण्यासाठी आपण जाणार आहोत. २९ जानेवारी रोजी अंतरवाली सराटी येथून निघणार असून, ३० जानेवारी रोजी रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेणार आहोत. ३१ जानेवारी रोजी आपण घरी जाणार असल्याचेही जरांगे यांनी सांगितले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण