शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

"तुमच्याकडं हुशारी हाय ना, मग..."; टीका करणाऱ्यांवर मनोज जरांगे पाटील संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 13:25 IST

तुमचे ज्ञान तिकडे वापरा. सगेसोयरा हा शब्द पक्का आहे. समाजाच्या बाजूने तुम्ही लिहा असंही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. 

रायगड - गोरगरीब मराठ्यांसाठी ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्यांच्यासाठी हा कायदा खूप महत्त्वाचा आहे. परंतु जे अभ्यासक, वकील, घटनातज्ज्ञ, कायदेशीर अभ्यास असणाऱ्यांनी आता ताकदीनं तुमचं म्हणणं मांडा. सगेसोयरे हा शब्द आता फिक्स झालाय. ते फायनल आहे. आता हा कायदा मजबूत कसा करता येईल ते मांडा. सोशल मीडियावर चर्चा करून कशाला दुही दाखवता? गैरसमज पसरवता..तुमच्याकडे हुशारी आहे ना, ती समाजाने मान्य केली. मग समाजासाठी तुमची हुशारी दाखवा. सोशल मीडियावर लिहायला लागले. आम्हाला काही कळत नाही वाटतं का तुम्हाला अशा शब्दात टीका करणाऱ्यांवर मनोज जरांगे पाटील संतापले. 

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, १५ दिवसांच्या हरकती मागितल्या आहेत. त्यात आपले म्हणणं मांडा. त्यामुळे ताकदीने लढता येईल. मी एकाकी लढण्यापेक्षा तुम्हीही पाठिंबा द्या ना..सोशल मीडियावर कशाला लिहिता?, लाख कोटी मराठे गेले, तुम्ही आम्हाला येडं समजता का? मराठवाड्यातील मराठ्यांना विनंती आहे की सगेसोयरे या शब्दामुळे एकही मराठा आरक्षणापासून वंचित राहणार नाही हा माझा शब्द आहे. १९८४ च्या गॅझेटनुसार मराठवाड्यातील सगळा मराठा हा कुणबी आहे. तुम्ही धीर धरा. मराठवाड्यातील मराठ्यांनी टेन्शन घेऊ नका. फक्त एकजूट राहा. मराठवाड्यातील मराठा हा कुणबीत जाणार आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच या कायद्यामुळे मराठवाड्यासह महाराष्ट्रातील एकही मराठा आरक्षणापासून वंचित राहणार नाही. ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांनी तातडीने नातेवाईकांनाही अर्ज करायला सांगा. पटापट कुणबी प्रमाणपत्रे काढून घ्या. जितका विरोध होईल तितका हा कायदा मजबूत आहे समजून घ्या. नोंद नसलेल्या मराठ्यांसाठी हा कायदा आहे. ज्याची नोंद मिळाली तो तुमचा सोयरा आहे का हे बघा, लगेच नोंद करून घ्या. २-४ लोक काय बोलले म्हणून कोट्यवधी मराठे बोलतायेत असं नाही. हा कायदा पक्का आहे. सोशल मीडिया, मोबाईलवर लिहेपर्यंत हरकतीवर म्हणणं मांडा. तुमचे ज्ञान तिकडे वापरा. सगेसोयरा हा शब्द पक्का आहे. समाजाच्या बाजूने तुम्ही लिहा असंही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. 

रायगडला शिवरायांच्या दर्शनासाठी जाणार विश्वाची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन घेण्यासाठी आपण जाणार आहोत. २९ जानेवारी रोजी अंतरवाली सराटी येथून निघणार असून, ३० जानेवारी रोजी रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेणार आहोत. ३१ जानेवारी रोजी आपण घरी जाणार असल्याचेही जरांगे यांनी सांगितले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण