शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Maratha Reservation: मराठा आरक्षणावर चर्चाच चर्चा; जाळपोळीवरून हायकोर्ट संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2018 05:31 IST

मराठा समाजास आरक्षण देणारच, असे ठामपणे सांगणाऱ्या सरकारला प्रत्यक्ष हे आरक्षण कसे द्यावे, याचा मार्ग अद्याप सापडलेला नाही. तो सापडेपर्यंत संयम आणि शांतता राखण्यासाठी मुख्यमंत्री बैठका घेत आहेत.

मुंबई : मराठा समाजास आरक्षण देणारच, असे ठामपणे सांगणाऱ्या सरकारला प्रत्यक्ष हे आरक्षण कसे द्यावे, याचा मार्ग अद्याप सापडलेला नाही. तो सापडेपर्यंत संयम आणि शांतता राखण्यासाठी मुख्यमंत्री बैठका घेत आहेत. परंतु आंदोलकांचा धीर संपला असून ७ आॅगस्टपर्यंत निर्णय न झाल्यास ९ आॅगस्टच्या क्रांती दिनापासून राज्यभर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. दुसरीकडे या आरक्षणासाठी आणखी दोन आत्महत्या झाल्याने हिंसाचार थांबला असला तरी धग कायम राहिली.आंदोलन आणखी चिघळू नये यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दोन बैठका घेतल्या. पहिल्या बैठकीत त्यांनी मराठा समाजातील मान्यवरांना निमंत्रित करून सरकारची भूमिका स्पष्ट केली. बैठकीनंतर शांतता व सौहार्दाचे आवाहन संयुक्त निवेदनात करण्यात आले. दुसºया बैठकीत मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नावर भाजपा आमदारांची मते जाणून घेतली. विषय आणखी भडकेल असे उक्ती वा कृतीने काहीही करण्याचे टाळा, संयम पाळा आणि मराठा समाजाच्या कल्याणासाठी सर्वात जास्त योजना आपल्याच सरकारने आणल्याचे जनतेत जाऊन सांगा, असे त्यांनी मंत्री व आमदारांना सांगितले.चर्चेसाठी बोलावूनही न जाणाºया मराठा क्रांती मोर्चाच्या मंडळींनी विविध जिल्ह्यांच्या ठिकाणी बैठका घेऊन सरकारला पुन्हा एकदा अल्टिमेटम दिला.या आंदोलनात मराठवाड्यातील आत्महत्या आठवर पोहोचल्या. औरंगाबादमध्ये चौधरी कॉलनीत राहणाºया उमेश आसाराम एंडाईत (२२) या तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. २९ जुलै रोजी विषप्राशन केलेल्या तृष्णा तानाजी शिंदे या तरुणीचे गुरुवारी निधन झाले. मराठा आरक्षण मिळत नसल्याने शिकून काही उपयोग नाही, अशा निराशेच्या चिठ्ठ्या लिहून या दोघांनी आत्महत्या केल्या. संजय कदम या युवकाने अमरावतीमध्ये जिल्हाधिकारी कक्षासमोर अंगावर रॉकेल ओतून तर जालना जिल्ह्यात भायगव्हाण येथील नामदेव गरड (वय ३०) याने मराठा आरक्षणासाठी विषारी द्रव्य घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.न्यायालयाचे सवाल?राज्याची सद्य:स्थिती विदारक आहे. जमाव रस्त्यावर उतरून बसेसची जाळपोळ करतो, दगडफेक करतो आणि पोलिसांना मारण्यातही येत आहे. राज्यात सरकार नावाची गोष्ट अस्तित्वात आहे की नाही?लोक सार्वजनिकरीत्या त्यांची मते, विचार निर्भयपणे मांडू शकत नाहीत. मोकळेपणाने वावरण्यासाठी व मते मांडण्यासाठी लोकांना पोलीस संरक्षण द्यावे लागेल, असाही दिवस आता आपण पाहणार आहोत का?आरक्षणासाठी आतातरुणीची आत्महत्याआरक्षणासाठी मराठा तरूण जीव देत असताना आता तरूणीनेही याच कारणाने आत्महत्या केल्याची घटना घडली. तृष्णा तानाजी माने असे या तरूणीचे नाव आहे. ती १९ वर्षांची होती. तरूणीने आत्महत्या केल्याची राज्यातील ही पहिलीच घटना आहे.निश्चित वेळेत आरक्षण देणार - मुख्यमंत्रीराज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यास कटिबद्ध आहे. त्याची कायदेशीर प्रक्रिया आम्ही वेगाने पूर्ण करीत आहोत. कालबद्ध आणि निश्चित वेळेत आम्ही आरक्षण देऊ, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.मागासवर्गीय आयोगाने मराठा समाजाला आरक्षण देणे अमान्य केले तर सरकारकडे प्लॅन बी आहे का?- पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणHigh Courtउच्च न्यायालयDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणmarathaमराठाMaharashtraमहाराष्ट्रCourtन्यायालय