शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

Maratha Reservation: सर्वपक्षीय मोर्चामध्ये काँग्रेसचा सहभाग नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2018 02:16 IST

आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या कार्यालयावर काढण्यात येणा-या सर्वपक्षीय मोर्चात काँग्रेस पक्षाचा सहभाग असणार नाही, असे वसई विरार शहर जिल्हाध्यक्ष डॉमाणिक डिमेलो यांनी स्पष्ट केले आहे.

पारोळ : वसई तालुक्यात ९ जुलै ते ११ जुलै दरम्यान झालेल्या अभूतपूर्व पावसामुळे वसईत निर्माण झालेल्या भयाण पूरस्थितीला जबाबदार असलेल्या वसई तालुक्यातील सत्ताधाऱ्यांना त्याचा जाब विचारण्यासाठी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या कार्यालयावर काढण्यात येणा-या सर्वपक्षीय मोर्चात काँग्रेस पक्षाचा सहभाग असणार नाही, असे वसई विरार शहर जिल्हाध्यक्ष डॉमाणिक डिमेलो यांनी स्पष्ट केले आहे.आगामी काळात होणाºया लोकसभा - विधानसभा निवडणुकांवर नजर ठेवून गेली ४ वर्ष वसईकर जनतेच्या सुखदु:खांशी सोयरेसुतक नसलेले काही नेते आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न या सर्वपक्षीय मोर्चाच्या माध्यमातून करीत असून काँग्रेसची भूमिका नेहमी स्वतंत्र व कुणाच्या मागे फरफटत जाणारी नाही . निवडणूक डोळ्यासमोर ठेवून स्टंटबाजी करण्यापेक्षा काँग्रेसने मागील काळात इंधन दरवाढ, जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ, शेतकरी नुकसान भरपाई, महानगर पालिका आरोग्य केंद्रातील औषध तुटवडा, महावितरण कार्यालयावरील हल्लाबोल, जिल्हा परिषद शाळांची दुरावस्था, तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी सत्कार, कुलभूषण जाधव च्या सुटकेसाठी स्वाक्षरी मोहीम, अनेक अनाथ आश्रम, शैक्षणिक संस्थाना मदत आदी अनेक उपक्र मातून नेहमी आपला स्वतंत्र ठसा उमटवला आहे. देशातील सत्ताधाºयांच्या बेताल वर्तनाने लोकशाही धोक्यात आली असतांना लोकशाही वाचविण्याचे मोठे काम काँग्रेस करीत आहे. वसई तालुक्यात निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीची कारणमीमांसा करण्यासाठी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने महानगरपालिकेचे आयुक्त सतीश लोखंडे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली असून आम्ही विचारलेल्या प्रश्नांना आयुक्तांनी समाधानकारक उत्तरे दिली आहेत. आणि त्यानंतर पूरपरिस्थिती निर्माण होण्यासाठीची कारणे आण ित्यावरील उपाययोजना करण्यासाठी महानगरपालिकेने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत त्यामुळे कोणा एकाला जबाबदार धरून मोर्चे काढण्यात अर्थ नाही असे काँग्रेसने म्हटले आहे.>प्रशासनाला सहकार्य कराअशा प्रकारचे राजकीय तुंबडी भरू मोर्चे काढण्यापेक्षा या पक्षांनी भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्या परीने प्रशासनास सहकार्य करण्याची भूमिका ठेवावी असे आवाहन कॉग्रेस केले आहे.

टॅग्स :marathaमराठाMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaratha Reservationमराठा आरक्षण