शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

छगन भुजबळांचा राजीनामा स्वीकारू नये, अन्यथा... ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2024 12:58 IST

छगन भुजबळ यांना सरकारची भूमिका मान्य नसेल तर त्यांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडावं, अशी मागणी विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील काही आमदारांकडून केली जात होती.

NCP Chhagan Bhujbal ( Marathi News ) : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला विरोध करत राज्यभर रान पेटवलं आहे.  भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी एल्गार मेळाव्यांचं आयोजन केलं जात असून या मेळाव्यांतून मनोज जरांगे पाटील यांच्यासह त्यांच्या मागण्या मान्य करणाऱ्या राज्य सरकारविरोधातही हल्लाबोल केला जात आहे. त्यामुळे भुजबळ यांना सरकारची भूमिका मान्य नसेल तर त्यांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडावं अशी मागणी विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील काही आमदारांकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी अहमदनगर इथं  नुकत्याच झालेल्या मेळाव्यात गौप्यस्फोट करत मी नोव्हेंबर महिन्यातच माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे, असं सांगितलं. मात्र तो राजीनामा मुख्यमंत्र्यांनी अद्याप स्वीकारलेला नाही. भुजबळांच्या राजीनाम्यावरून आता राष्ट्रीय ओबीसी महासंघाने आक्रमक भूमिका घेतली असून भुजबळ यांचा राजीनामा स्वीकारू नये, अन्यथा ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल, असा इशारा महासंघाचे नेते बबनराव तायवाडे यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांना इशारा देत बबनराव तायवाडे म्हणाले की, "मेळाव्यातून ओबीसी समाजाची सत्य बाजू मांडताना टीका होऊ नये, म्हणून छगन भुजबळ यांनी राजीनामा दिला होता. त्यांनी मराठा समाजाविरोधात कधीही भूमिका घेतली नाही. मात्र ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, ही मागणी भुजबळ यांनी लावून धरली आहे. स्वतःच्या समाजाच्या रक्षणासाठी काम करताना कोणी टीका करत असेल तर, त्याला उत्तर द्यावंच लागेल. छगन भुजबळ यांचा राजीनामा सरकारने स्वीकारला तर, ओबीसी समाज एकत्र होऊन त्यांचे रक्षण करण्यासाठी रस्त्यावर उतरेल," असं तायवाडे यांनी म्हटलं आहे.

भर मेळाव्यात भुजबळांनी कोणता गौप्यस्फोट केला?

छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच अहमदनगर जिल्ह्यात ओबीसी एल्गार मेळावा पार पडला. या मेळाव्यातून भुजबळांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं, यासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांचा खरपूस समाचार घेतला. तसंच त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्यांना प्रत्युत्तर देत खळबळजनक गौप्यस्फोट केला. भुजबळ म्हणाले की, "सरकारमधील आणि विरोधी पक्षातील सगळे बोलतात की, तुम्ही राजीनामा द्या, हिंमत असेल तर राजीनामा द्या. माझ्या सरकारमधीलही नेते बोलतात. काल-परवा एकजण बडबडला. या भुजबळाला कमरेत लाथ घालून मंत्रिमंडळाला बाहेर हाकला, असं म्हणाला. मला त्या सर्वांना विरोधी पक्ष, स्वपक्षातील, सरकारमधील सर्वांना सांगायचे आहे. १७ नोव्हेंबरला जालनातील अंबडला सभा झाली. मात्र १६ नोव्हेंबरलाच मी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. त्यानंतर अंबडच्या सभेला रवाना झालो. मला लाथ मारण्याची गरज नाही. अडीच महिने मी शांत राहिलो, याची वाच्यता नको असं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. लाथ मारायची गरज नाही. मी शेवटपर्यंत ओबीसीसाठी लढणार आहे," असा हल्लाबोल छगन भुजबळ यांनी केला. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेChhagan Bhujbalछगन भुजबळNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaratha Reservationमराठा आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षण