शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

अकरावी प्रवेशात ठाकरे सरकार 12 टक्के मराठा आरक्षण देणार, तर दिव्यांगांना 4 टक्के मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 5:26 AM

आरक्षण उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे १२% करण्यात आले आहे, तर अपंग आणि दिव्यांगांसाठी असलेले ३% आरक्षण हे ४ % करण्यात आले आहे.

मुंबई : दहावीचा निकाल जुलै अखेरीस लागणार असल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाकडून जाहीर केल्यानंतर लगेचच अकरावी प्रवेश प्रक्रियेस शिक्षण विभागाकडून सुरुवात करण्यात आली आहे. यंदाच्या अकरावी प्रवेश प्रक्रियेत सुसुत्रता आणण्यासाठी शिक्षण विभागाकडून आरक्षण आणि प्रवेश प्रक्रियेतील तरतुदींमध्ये बदल केले आहेत. यातील मोठा बदल म्हणजे एसईबीसीसाठी (सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग) असलेले आरक्षण उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे १२% करण्यात आले आहे, तर अपंग आणि दिव्यांगांसाठी असलेले ३% आरक्षण हे ४ % करण्यात आले आहे.मुंबई आणि पुण्यातील महापालिका चालविण्यात येणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयांतील ५० टक्के जागा या त्या त्या महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांसाठी इनहाऊस कोटा म्हणून राखीव ठेवण्यात याव्यात असे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे पालिका शाळांतून उत्तीर्ण होणाºया दहावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल.मराठा व अपंग / दिव्यांग याव्यतिरिक्त असणारे संविधानिक आरक्षण अल्पसंख्याकासाठी राखीव कोटा, व्यवस्थापन कोटा इत्यादीसाठीच्या राखीव जागांचे प्रमाण सध्या असलेल्या प्रक्रियेप्रमाणेच राहणार आहे. आरक्षणाप्रमाणे प्रवेश प्रक्रियेच्याही काही तरतुदींमध्ये यंदा बदल करण्यात येणार आहे. दरवर्षी बायफोकल अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश ही अकरावीच्या प्रवेशाच्या शून्य फेरीमध्येच करून घेतले जातात. मात्र यंदा ते शून्य फेरीमध्ये आयोजित न करता नियमित फेरीत समांतर प्रवेश प्रक्रिया म्हणून आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सोबतच विशेष फेऱ्यांनंतर राबविण्यात येणाºया एफसीएफएस (प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य) फेºया ही यंदा रद्द करण्यात येणार आहेत. त्याऐवजी आवश्यकता असल्यास अतिरिक्त विशेष फेरी राबविण्यात यावी जेथे सर्व रिक्त जागा या सर्वसाधारण जागांमध्ये रूपांतरित करण्यात येतील आणि आरक्षणाऐवजी गुणवत्ता यादीतील गुणांवर आधारित जागा देण्यात येतील.प्रथम पसंतीक्रम मिळूनही प्रवेश न घेतलेले विद्यार्थी विशेष अतिरिक्त फेरीमध्ये प्रवेश घेऊ शकतील. घेतलेले प्रवेश रद्द केलेले तसेच शाखा व महाविद्यालय बदल करू इच्छिणारे विद्यार्थी आधीचे प्रवेश रद्द करून विशेष फेरी १ आणि त्यानंतरच्या विशेष फेºयांमध्ये सहभागी होऊ शकतील.>गरजेनुसार विशेष फेरीचे आयोजनकोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्सिंग नियमांचे पालन व्हावे याकरिता सर्व प्रक्रिया जास्तीत जास्त डिजिटली करण्याचा प्रयत्न शिक्षण विभाग करत आहे. विद्यार्थ्यांना प्रक्रिया शुल्क केवळ आॅनलाइन पद्धतीने भरण्याबाबत मान्यता देण्यात यावी असे नवीन तरतुदीत नमूद आहे. विद्यार्थ्यांनीही फिजिकल डिस्टन्सिंगसह सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. गरज भासल्यास अतिरिक्त विशेष फेºयांचे आयोजन करता येईल.>विशेष फेरीचे आयोजननियमित फेरी संपल्यानंतर एका विशेष फेरीचे आयोजन करण्यात यावे. त्यानंतर आवश्यकता असल्यास अतिरिक्त विशेष फेºयांचे आयोजन करण्यात येईल. बारावीच्या प्रवेशासाठी स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येणार आहेत.