शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
4
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
5
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
6
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
7
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
8
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
9
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
10
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
11
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
12
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
13
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
14
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
15
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
16
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
17
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
18
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
19
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
20
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी

संभाजीराजे, तुम्ही एका समाजाची बाजू घेऊन कसं बोलता?: छगन भुजबळांनी दिला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2023 16:33 IST

प्रकाश आंबेडकरांनीही आम्हाला सहकार्य केले पाहिजे. आम्हाला सांगा, आमचे कुठे चुकले? असंही भुजबळांनी म्हटलं.

नाशिक - संभाजीराजे म्हणाले, भुजबळ दोन समाजात वितुष्ट आणतायेत, त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाका. संभाजीराजे, आम्ही तुमचा आदर सन्मान करतो, आमच्या हृदयात असलेले छत्रपती शाहू महाराज हे मागासवर्गीयांना वर आणण्यासाठी लढत होते. शाहू महाराज यांच्या गादीवर तुम्ही बसलेले आहात. तुम्ही एका समाजाचे नाही तर राज्यातील सर्व समाजाचे आहात. तुम्ही एका समाजाची बाजू घेऊन कसं बोलता? तुम्ही यात पडायला नको होतं, जर आरक्षणाच्या लढाईत आला तर सगळ्यांचे अधिकार शाबूत ठेवा, कुणावरही अन्याय करू नका ही अपेक्षा संभाजीराजेंकडून आम्हाला आहे अशी प्रतिक्रिया छगन भुजबळांनी संभाजीराजे छत्रपती यांच्या मागणीवर दिली आहे.

छगन भुजबळ म्हणाले की, घरेदारे कुणी जाळली? राज्यात २ महिने सुरू होतं, मी काही बोललो नाही. संभाजीराजे तुमचे काम होतं, हे असं करू नका. तुम्ही स्वत: बीडला जायला हवं होते. ज्यांची घरे, दुकाने जाळण्यात आली. पेट्रॉल बॉम्ब टाकले. महाराज तुम्ही त्यांचे अश्रू पुसायला हवे होते. पण तुम्ही माझ्यावर आरोप करता, एक लक्षात घ्या, छगन भुजबळांना मंत्री, आमदारकीची पर्वा नाही. मी गोरगरिबांसाठी लढेल. पण तुम्ही राज्यात महाराज आहात ना...छत्रपती शाहूंच्या गादीवर तुम्ही बसता, तर महाराज सगळ्यांना न्याय द्या, कुणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घ्या असा सल्ला त्यांनी संभाजीराजेंना दिला.

तसेच प्रकाश आंबेडकरांनीही आम्हाला सहकार्य केले पाहिजे. आम्हाला सांगा, आमचे कुठे चुकले? आम्ही तुमच्याकडून सहकार्याची अपेक्षा करतो, राज्यात जे जे समजदार आहेत, वेगवेगळे पक्ष असतील त्यांनी आमचा आक्रोश काय आहे हे समजून घ्यावे. आम्हाला कुणालाही नाही म्हणतोय. आम्ही जायचं कुठे? तुम्ही समजदार असाल आमचे चुकले कुठे हे सांगा. बाकीचे चुकत असेल तर त्यांनाही सांगा. सगळ्यांना बरोबर घेऊन जा, आजपर्यंत अनेक मराठा मुख्यमंत्री झाले, सगळ्यांना बरोबर घेऊन गेले असंही भुजबळ म्हणाले.

आज भुजबळ वाईट झाला

महिला आयोगाच्या चेअरमन, विधान परिषदेच्या उपसभापती असतील त्यांनी जालनात महिला पोलिसांसोबत काय झाले हे विचारा. मग रिपोर्ट करा. मी खोटे बोलत असेन तर महाराष्ट्राची क्षमा मागेन. एका नाही तर ५० लोकांची चौकशी केली. हे तुम्ही करा, शांततेने जे काही मागायचे ते मागा. मी नाशिकचा पालकमंत्री होतो, कधीही मराठा बिगर मराठा वाद आणला नाही. अनेकांना याठिकाणी निवडणुकीत उभे केले निवडून आणले. कधीही जात पाहिली नाही. आता छगन भुजबळ वाईट झाला, तुम्हाला तुमचा समाज दिसतो, मीदेखील ३७४ जातींचे प्रतिनिधीत्व करतो. त्यात भटके विमुक्त सगळेच येतात. ओबीसीत ३७४ जाती आहेत. ते पुढे जातायेत. मग कशासाठी हे सगळे चाललंय असा सवाल भुजबळांनी केला आहे.

अभ्यास असणाऱ्यांनी पुढे यावे

जात जनगणना करा, जे नक्कीच कुणबी आहे त्यांना प्रमाणपत्र देण्यास हरकत नाही. परंतु काही ठिकाणी शाही खोडून पेनाने कुणबी,कुणबी लिहिलं जातंय, हे लक्षात येतंय. तुम्ही वेगळे आरक्षण घ्या, अगोदर जे ओबीसीत आहेत त्यांनाच आरक्षण पुरत नाही. राज्यात जिल्ह्यात अनेक मराठा कार्यकर्ते आहेत. ज्यांना आरक्षणाचा अभ्यास आहे. त्यांना जरांगेंची मागणी चुकीचे असल्याचे लक्षात येत नाही? साताऱ्यात आमची भगिनी चव्हाण म्हणून तिने स्पष्ट सांगितले, आम्हाला द्यायचे असेल तर मराठा आरक्षण द्या, कुणबी म्हणून नको असं सांगणारेही मराठा बंधू भगिनी राज्यात आहेत. पण तुम्ही लोकांची घरे जाळून अशाप्रकारे मागणी करताय त्याला आमचा विरोध आहे असं भुजबळांनी स्पष्ट सांगितले.

 अन्याय सहन करणार नाही

१९६० मध्ये मुंबई महाराष्ट्राला मिळाली तेव्हा एका पत्रकाराने यशवंतराव चव्हाण यांना विचारले, साहेब हे राज्य मराठींचे होणार की मराठ्यांचे होणार? तेव्हा चव्हाण म्हणाले, मराठ्यांचा नाही तर मराठीचा महाराष्ट्र होणार. मग आता राज्यात काय चाललं आहे. सगळ्यांना सोबत घेऊन जायचंय, जो तो येतो, म्हणतो, याला मंत्रिपदावरून काढा, आयुष्यात आमदार, मंत्री होणे हेच सर्वस्व आहे का? आमदारकी, मंत्रीपेक्षा मला ३७४ जातीतील ८ कोटी लोकांच्या भवितव्यासाठी ३५ वर्ष लढला आणि यापुढेही लढणार. आमच्यात नको, वेगळे आरक्षण घ्या असं बोललो म्हणून एवढे. अन्याय सहन करणार नाही असं भुजबळांनी म्हटलं.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलChhagan Bhujbalछगन भुजबळSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती