शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
3
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
4
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
5
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
6
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
7
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
8
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
9
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
10
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
11
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
12
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
13
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
14
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
15
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
16
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
17
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
18
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
19
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
20
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...

पुन्हा एल्गार! मराठा क्रांती मोर्चा आंदोलन करणार; सरकारनं फसवणूक केल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2019 20:50 IST

उपोषणासह कमळावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय

- चेतन ननावरेमुंबई : राज्य सरकारने मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोप करत मराठा क्रांती मोर्चाने पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. सरकारने मान्य केलेल्या मागण्यांवर अंमलबजावणीच होत नसल्याचा आरोप करत एका गटाने २६ फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषणाची हाक दिली आहे. तर दुसऱ्या गटाने लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागण्यापूर्वी अंमलबजावणी झाली नाही, तर भाजपाच्या कमळ चिन्हावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पोखरकर म्हणाले की, सरकारने आरक्षणाची घोषणा केली असली, तरी न्यायालयात प्रकरण गेल्याने त्याचा प्रत्यक्ष लाभ मराठा समाजाला अद्याप तरी मिळालेला नाही. कोपर्डी घटनेतील आरोपी प्रत्यक्ष शिक्षेपासून दूर आहेत. अ‍ॅट्रोसिटी कायद्यात शिथिलता आणण्याचे आश्वासनही हवेतच विरल्याचे दिसते. महत्त्वाची बाब म्हणजे मराठा समाजासाठी सुरू केलेल्या सारथी संस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटन झाले, मात्र त्याला निधीची तरतूद केली नसल्याने ते नावापुरतेच आहे. शिवस्मारकाबाबत सरकार उंची कमी-जास्त करणे आणि विविध पूजा करण्यातच अधिक व्यस्त आहे. कर्जमाफीसह स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीवर सरकार एक शब्दही काढत नाही. चार जिल्ह्यांतील भाडेतत्त्वावर असलेल्या वसतिगृहांचा अपवाद वगळता एकही कायमस्वरूपी वसतिगृह मराठा विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात आलेले नाही. त्यामुळे निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी सरकारने या मान्य केलेल्या मागण्यांवर ठोस अंमलबजावणी केली नाही, तर लोकसभा निवडणुकीत मराठा समाज कमळावर बहिष्कार टाकेल, असा निर्णय पंढरपूर येथे झालेल्या राज्यव्यापी बैठकीत झाल्याचे पोखरकर यांनी सांगितले.मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रवींद्र काळे-पाटील म्हणाले की, याआधी आरक्षणासाठी केलेल्या आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या कार्यकर्त्यांना शासनाकडून मदत मिळालेली नाही. याउलट आंदोलनात सामील झालेल्या कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी पूर्ण केले नाही. सरकारने केलेल्या या फसवणुकीविरोधात मराठा समाज २६ फेब्रुवारीपासून आझाद मैदानात बेमुदत उपोषणास बसेल. 

कर्ज वितरणातही गाजरअण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाअंतर्गत मालमत्ता तारण नसलेल्या मराठा तरुणांना कर्ज मिळत नसल्याचे समोर आले आहे. मुळात ज्या तरुणांना कोणत्याही बँकेकडे मालमत्ता तारण ठेवून कर्ज मिळू शकते, अशाच तरुणांना महामंडळ कर्ज देत आहे. त्यामुळे खऱ्या गरजू तरुणांना कर्जापासून वंचित ठेवत सरकारने मराठा समाजाला पुन्हा एकदा गाजर दाखवल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाने केला आहे.

...तर कमळावर बहिष्कारनिवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी सरकारने मान्य केलेल्या मागण्यांवर ठोस अंमलबजावणी न केल्यास लोकसभा निवडणुकीत मराठा समाज कमळावर बहिष्कार टाकेल, असे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पोखरकर यांनी सांगितले. 

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाagitationआंदोलनreservationआरक्षण