शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मराठा समाजाचा OBC मध्ये समावेश होणार नाही, कारण...; भाजपा आमदार परिणय फुकेंची जरांगेंवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 15:13 IST

मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन हा संविधानिक विषय आहे. कोणतेही सरकार आले तरी संविधानाबाहेर कुणीच निर्णय घेऊ शकत नाहीत असं फुके यांनी सांगितले.

नागपूर - मराठा समाजाला कुठेही ओबीसी आरक्षणात समाविष्ट करून घेणार नाही याबाबत आश्वासित करण्यासाठी मी राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून पुकारण्यात आलेल्या आंदोलनस्थळी जाणार असल्याचं भाजपा आमदार परिणय फुके यांनी म्हटलं. ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही, हा सरकारने दिलेला शब्द आहे अशी आठवण फुके यांनी करून दिली. 

भाजपा आमदार परिणय फुके म्हणाले की, मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर राज्यात ओबीसी समाजाचे मोठे आंदोलन झाले होते. त्यात मी मध्यस्थाची भूमिका घेतली होती. ओबीसी समाजाच्या शिष्टमंडळाशी सरकारसोबत बैठक झाली होती. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार सगळेच उपस्थित होते. तेव्हाच या नेत्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितले होते, ते कुठेही ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाहीत. आजही ते या शब्दाला कायम आहेत. हेच सांगण्यासाठी मी साखळी उपोषणास्थळी जाणार आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही यावर आजही सगळे नेते आणि सरकार ठाम आहे. लेखी आश्वासनाची गरज असली तर तीही देऊ असं त्यांनी सांगितले. 

तसेच मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन हा संविधानिक विषय आहे. कोणतेही सरकार आले तरी संविधानाबाहेर कुणीच निर्णय घेऊ शकत नाहीत. संविधानाच्या चौकटीत वागावे लागेल. जरांगे पाटलांची मागणी असंविधानिक आहे. त्यामुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. मात्र जरांगेंच्या आंदोलनामुळे ओबीसी समाजात भीतीचं वातावरण आहे. मात्र ओबीसी समाजाला आरक्षण संविधानाने दिले आहे. त्यामुळे या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही त्यामुळे ओबीसी समाजाने चिंता करू नये असंही आमदार परिणय फुके यांनी म्हटलं. 

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी आधी संविधानाचा अभ्यास केला पाहिजे. संविधानात काय तरतुदी आहेत ते समजून घेतल्या पाहिजेत. आरक्षण देताना काय काय बाबींचा विचार त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केला होता, कोणत्या समाजाला आरक्षण दिले पाहिजे, कुणाला नाही याचा अभ्यास करून तेव्हाच्या संविधान सभेने संविधानाची रचना केली होती. वेगवेगळ्या जातींना ओबीसीत समाविष्ट केले होते. ज्या प्रमाणे जरांगे पाटील आर्थिक निकषावर आरक्षण मागत आहेत हे चुकीचे आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला EWS मधून आरक्षण दिले आहे. १० टक्के आरक्षण मराठा समाजाला मिळाले आहे. EWS चे आरक्षण मराठा समाजासाठी फायदेशीर आहे. २० टक्के मराठा समाजाला १० टक्के आरक्षण मिळणे हा त्यांचा विजय तसाही झाला आहे. ओबीसीत आधीच ३५० जाती आहेत, आरक्षणात अनेक जिल्ह्यात १९ टक्के आरक्षण मिळत नाही. त्यात ३५० जाती आहेत. त्यात आणखी एक ३५१ जात समाविष्ट झाली तर मराठा समाजाला न्याय मिळणार नाही. त्यांनी EWS आरक्षणाचा लाभ घ्यावा असं भाजपा आमदार परिणय फुके यांनी सांगितले. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणParinay Fukeपरिणय फुकेOBCअन्य मागासवर्गीय जातीBJPभाजपा