शहरं
Join us  
Trending Stories
1
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
2
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
3
इंडिगो विमान संकट, रेल्वेने मोर्चा सांभाळला, ३७ ट्रेनमध्ये वाढवले ११६ डबे, या दोन स्टेशनदरम्यान धावणार विशेष ट्रेन
4
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
5
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
6
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
7
अजबच! अचानक खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?   
8
आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांप्रति अनाथ कृतज्ञ होतात तेव्हा...; वर्षा निवासस्थानी पार पडला भावुक सोहळा
9
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
10
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
11
मध्य रेल्वे मनी लाँड्रिंग: ‘क्लोजर रिपोर्ट’ विशेष न्यायालयाने स्वीकारला, आठ अधिकाऱ्यांचे प्रकरण काय?
12
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
13
पुतीन परतले, पुढे...?
14
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
15
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
16
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
17
कामगार युनियनवरून ठाकरेंची शिवसेना-भाजपमध्ये राडा, वरळीत तणाव; पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
18
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
19
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
20
सेवा-समर्पणाच्या वाटेवरच्या ध्येयनिष्ठ प्रवाशाची कहाणी
Daily Top 2Weekly Top 5

"मराठा जातीने मागास नाहीत, न्यायालयात अडकवायचं आहे का?"; पाटलांनी सांगितला ओबीसी आरक्षण देण्यातील अडथळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 14:40 IST

Maratha Resrvation Latest Update: सर्व मराठा समाजाला कुणबी ठरवून ओबीसी आरक्षण देण्याच्या मागणीवर मनोज जरांगे ठाम आहेत. पण, असे आरक्षण देता येऊ शकत नाही, अशी भूमिका कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडली.

Manoj Jarange Maratha Reservation Latest news: सर्व मराठा समाजाला कुणबी करणे कायद्यात बसत नाही. मराठा समाज हात जातीने मागास नाहीये. त्यांना दलितांसारखी वागणूक मिळालेली नाही. त्यांना गावाबाहेर रहा, स्पर्श करू नको, अशी वागणूक मिळालेली नाही. त्यामुळे त्यांना सामाजिक आरक्षण देता येत नाही. आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपणाचं आरक्षणच देता येऊ शकते, अशी भूमिका कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मनोज जरांगे पाटलांच्या मागण्यांवर मांडली. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

मनोज जरांगे यांनी मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरू केले आहे. २९ ऑगस्टपासून हे उपोषण सुरू असून, सरकार आणि जरांगे पाटील यांच्यात चर्चा सुरू आहे. दुसऱ्या दिवशी कोणताही तोडगा निघू शकला नाही. दरम्यान, मनोज जरांगे यांच्या मागण्यांवर आता चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले. 

मराठा मागास नाहीत, ते गरीब आहेत -चंद्रकांत पाटील

माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, "मराठे हे जातीने मागास नाहीत. ते त्यांच्या संपत्तीचे, शेतीचे तुकडे झाले. दोन गुंठ्यावाले झाले. गरीब झाले. पोरांना शाळेत पाठवता येईना, कॉलेजमध्ये पाठवता येईना, डॉक्टर करता येईना म्हणून आरक्षण पाहिजेत. दलितांसारखी त्यांना अस्पृश्यतेची वागणूक मिळाली नाही. गावाबाहेर रहा, शिवू नको, असे नाही झाले. 

"ते सामाजिक आरक्षण नाहीये. ते आर्थिक आणि शैक्षणिक मागासांचं आरक्षण असल्यामुळे ते देताना आपल्याला ५० टक्क्यांची मर्यादा पार करता येत नाही. फक्त ज्याचा फायदा मराठ्यांना खूप झाला. उद्याही होईल, ते आर्थिक मागासाचं आरक्षण आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केला आहे", अशी भूमिका चंद्रकांत पाटलांनी मांडली.  

'सगेसोयरेची शंभर टक्के अंमलबजावणी झालीये, पण पितृसत्ताक...'

ओबीसी नोंद सापडलेल्या व्यक्तीच्या सगेसोयऱ्यांनाही ते आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगेंनी केलेली आहे. त्याबद्दल चंद्रकांत पाटील म्हणाले, "सगेसोयरे वडिलांकडून असा शब्द आहे. हा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आहे. आपला देश हा पितृसत्ताक आहे. फक्त पूर्वेकडील दोन राज्ये मातृसत्ताक आहेत. तिथे लग्न झाल्यानंतर मुलगा बायकोकडे राहायला जातो. आपल्याकडे बायको मुलाकडे येते. पितृसत्ताकप्रमाणे सगेसोयऱ्याची शंभर टक्के अंमलबजावणी झाली आहे."

पुराव्याशिवाय कुणबी करता येऊ शकत नाही -पाटील 

सर्व मराठ्यांना कुणबी ठरवण्याच्या मागणीबद्दल चंद्रकांत पाटील म्हणाले, "यांची कोणती मागणी आहे की, सर्व मराठ्यांना कुणबी करा. असं कायद्याने करता येत नाही. असं करता येईल की, कुणबी नोंद सापडली आणि केलं. ९९ टक्के मराठे कुणबी झाले, असे होऊ शकते. पण, एकही मराठा नोंदीशिवाय, पुराव्याशिवाय कुणबी करता येणार नाही. न्यायालयात अडकवायचं आहे का?", असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी मनोज जरांगे यांना केला. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलchandrakant patilचंद्रकांत पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारOBC Reservationओबीसी आरक्षण