शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
3
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
4
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
5
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
6
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
7
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
8
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
9
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
10
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
11
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
12
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
13
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
14
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
15
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
16
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
17
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
18
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
19
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
20
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?

मराठा समाजाकडून राज्य सरकारला आव्हान; 24 तासांत निर्णय घ्या अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 09:17 IST

मेडिकल प्रवेशात मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. या निर्णयामुळे मराठा समाजातील ज्या वैद्यकीय पदव्युत्तर विद्यार्थ्यांचं नुकसान झालं आहे त्यांच्यासाठी राज्य सरकारने 24 तासात सकारात्मक निर्णय घ्यावा

मुंबई - पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशांना मराठा आरक्षण नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला होता. या निर्णयाविरोधात आर.आर.पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर राज्य सरकारने सर्वोच न्यायालयात याचिका दाखल केली होती, मात्र सर्वोच्च न्यायालयानेराज्य सरकारला दणका दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारची याचिका फेटाळली आहे. त्यामुळे मेडिकल प्रवेशात मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. या निर्णयामुळे मराठा समाजातील ज्या वैद्यकीय पदव्युत्तर विद्यार्थ्यांचं नुकसान झालं आहे त्यांच्यासाठी राज्य सरकारने 24 तासात सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी विनोद पाटील यांनी केली आहे. 

विनोद पाटील यांच्यावतीने जेष्ठ विधिज्ञ पटवालिया आणि अँड.संदीप देशमुख यांनी बाजू मांडली. न्यायालयाने निर्णय देताना सरकारी वकिलांना स्पष्ट केले की, याला सर्वस्वी तुम्ही जबाबदार आहेत असे सांगत राज्य सरकारला धारेवर धरले. आरक्षणासाठी आमचे 50 तरुण बळी गेले, आम्ही वारंवार सरकारला सांगत होतो की, कायद्याच्या चौकटीत टिकणार आरक्षण द्यावं. मात्र शासनाने दिलेलं आरक्षण न्यायालयात टिकलं नाही आणि आज आमच्या अनेक विद्यार्थ्यांचं नुकसान झालं असल्याचं विनोद पाटील यांनी सांगितले.  

मराठा समाजाने लोकसभा निवडणुकीत कसलीही भूमिका घेतली नव्हती, वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या हिताचा आरक्षण संदर्भात योग्य निर्णय घ्यावा अन्यथा आम्ही विधानसभा निवडणुकीत तुमच्या विरुद्ध निर्णय घेऊ असे खुले आव्हान राज्य सरकारला विनोद पाटील यांनी केले. दरम्यान राज्य सरकारकडून केंद्राला वैद्यकीय प्रवेशासाठी अधिक जागांची मागणी केली जाईल अशी माहिती महसुल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. 

सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला दणका, मराठा आरक्षणासंदर्भातील याचिका फेटाळली

वैद्यकीय आणि दंतवैद्यक पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेत मराठा समाजाला ‘एसईबीसी’ प्रवर्गातर्गत दिलेले आरक्षण रद्द करण्याच्या मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशास राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. नागपूर खंडपीठाचा निकाल रद्द ठरवून प्रवेश प्रक्रिया ठरल्याप्रमाणे सुरू ठेवण्याची परवानगी मिळावी, अशी विनंती याचिका राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. त्यावर गुरुवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. या सुनावणीत नागपूर खंडपीठाने दिलेला निर्णय कायम राखत राज्य सरकारची आव्हान याचिका फेटाळली. तसेच, सर्व प्रवेश प्रक्रिया नव्याने राबवण्याचे आणि आतापर्यंत मराठा अरक्षणाअंतर्गत झालेले प्रवेश शेवटी जागा उरल्यास त्या जागांवर सामावून घ्यावे, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.  

 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयMaratha Reservationमराठा आरक्षणmarathaमराठाState Governmentराज्य सरकार