शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

"अजित पवार त्यांचे आत्मचरित्र लिहितील तेव्हा अनेक गोष्टी बाहेर पडतील"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 22:17 IST

पहाटेच्या शपथविधीला ३ वर्ष होऊन गेली. त्यामुळे Chapter is close असं संजय राऊतांनी म्हटलं.

मुंबई - राज्यातील राजकारणात पहाटेचा शपथविधी मोठा गाजला होता. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी घेतलेल्या मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यानं राज्याच्या राजकारणात भूकंप आला. मात्र ही राष्टपती राजवट उठवण्याची खेळी होती असं विधान काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. त्यानंतर पुन्हा राजकीय वर्तुळात पहाटेच्या शपथविधीबाबत तर्क वितर्कांना उधाण आले. त्यात आता संजय राऊत यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत काही गोष्टी आता जाहीर करण्याची वेळ आली नाही असं सांगितल्यानं चर्चांना उधाण आले आहे. 

संजय राऊत म्हणाले की, पहाटेच्या शपथविधीला ३ वर्ष होऊन गेली. त्यामुळे Chapter is close. जेव्हा अजित पवार त्यांचे आत्मचरित्र लिहितील त्यात अनेक गोष्टी येतील. तसेच ही वेळ सगळं सांगण्याची नाही. शरद पवारांनी जे सांगितले ते पुरेसे आहे. या घटनेला ३ वर्ष झालीत त्यामुळे पुन्हा तो मुद्दा चर्चेत घेण्याची गरज नाही. 

जयंत पाटलांनी केला होता गौप्यस्फोटराजभवनात पहाटे पाच वाजता झालेल्या शपथविधी सोहळ्याची त्या दिवशी महाराष्ट्रात आणि देशात एकच चर्चा झाली. आजही ती घटना अनेकदा लोकांसाठी चर्चेचा विषय राहिला आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केला होता. जयंत पाटील म्हणाले होते की, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी तीन वर्षांपूर्वी राजभवनात झाला होता. शरद पवारांचाही तो खेळ असू शकतो. त्यावेळी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. पहाटेचा शपथविधीची खेळी जाणीवपूर्वक कुणी केली असं म्हणता येणार नाही मात्र त्यामुळे राज्यात लागू असलेली राष्ट्रपती राजवट उठवण्यास मदत झाली. त्या घटनेनंतर राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणखी मजबूत झाली असा जयंत पाटील यांनी युक्तिवाद केला.

तर जयंत पाटलांच्या गौप्यस्फोटाला काही अर्थ नाही. तो गौप्यस्फोट त्यावेळी का केले नाहीत. मूळात उशिरा सूचलेल्या शहाणपणाला काहीच अर्थ नाही. संदर्भ नसलेल्या गोष्टी असतात. कुणी काय म्हणाले याला काही अर्थ नाही असं सांगत भाजपा नेते चंद्रकांत पाटलांनी प्रतिक्रिया दिली होती.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतAjit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस