शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

मोदींना घाबरून अनेकांचे राजीनामे : संबित पात्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2019 11:43 IST

देशाच्या इतिहासात पाश्चात्त्य संस्कृतीला स्थान दिले जाते, ही लाजिरवाणी गोष्ट आहे...

ठळक मुद्दे देवर्षी नारद पत्रकारितागौरव पुरस्कार

पुणे : नरेंद्र मोदींचे सरकार गरीब आणि वंचित लोकांच्या मदतीसाठी निर्माण झालेले सरकार आहे. आताच्या सत्तेत गरिबांना लुटून आपण श्रीमंत होणार नाही, अशी भीती राजकीय पक्षाला बसली असल्याने राजकारणात अनेक वर्षे टिकून राहिलेल्या पक्षातील लोक मोदी सरकारच्या काळात घाबरून राजीनामे देत आहेत. त्यामुळे हा राजकीय पक्ष आपली पिढी चालविण्यास असमर्थ ठरला आहे, असे मत भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी व्यक्त केले. विश्व संवाद केंद्र पश्चिम महाराष्ट्र पुणे आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने देवर्षी नारद पत्रकारितागौरव पुरस्कार समारंभ आयोजिण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. पात्रा यांच्या हस्ते आज का आनंद समूहचे संस्थापक-संपादक श्याम आगरवाल यांना ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार, दिव्य मराठी सोलापूरचे सिद्धाराम पाटील यांना युवा पत्रकार पुरस्कार, बारामतीचे शिवाजी गावडे यांना व्यंगचित्रकार पुरस्कार आणि हिंदुस्थान टाइम्स मराठीचे संपादक विश्वनाथ गरुड यांना सोशल मीडिया पुरस्कार असे चार पुरस्कार प्रदान करण्यात आले.  याप्रसंगी विश्व संवाद केंद्र पश्चिम महाराष्ट्रचे अध्यक्ष मनोहर कुलकर्णी, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष महेश आठवले, आदी उपस्थित होते. ........ * भारतात काळा पैसा बाहेर पडत आहे. आता गरिबांना न्याय मिळवून दिला जात आहे. भ्रष्टाचारी लोकांना भारतात जगणे अवघड झाले आहे. आताच्या सत्तेतून त्यांनी कसलीही अपेक्षा करू नये. आपल्या देशाची संस्कृती पाश्चात्त्य संस्कृतीपेक्षा वेगळी आहे. तरीही देशाच्या इतिहासात पाश्चात्त्य संस्कृतीला स्थान दिले जाते, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. इंग्रज दीडशे वर्षे राज्य करून गेले. पण त्यांचे व्यवस्थापन टिकून राहिले आहे. * भारतवर्षच्या पूर्वजांमध्ये आर्यभट्ट शंकराचार्य असे तज्ज्ञ होऊन गेले. त्यांचे ज्ञान आणि विचार आपण आत्मसात न करता पाश्चात्त्य लोकांच्या विचारांना प्राधान्य देत आहोत. देवर्षी नारद हे पहिले पत्रकार होते. तिन्ही लोकांत ते संचार करीत असत. आपण मदर्स डे, फादर्स डे, व्हॅलेंटाईन डे साजरे करतो. त्याप्रमाणे भारतीय संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी नारद जयंती साजरी केली पाहिजे, असे संबित पात्रा म्हणाले. देवर्षी नारद यांचा आद्य पत्रकार म्हणून उल्लेख केला जातो. ते संदेशवाहक आणि उत्तम संवादपटू होते. लोककल्याण आणि लोकसेवा हा त्यांचा हेतू होता. देवर्षी कर्माला महत्त्व न देता ज्ञानाला महत्त्व देत असत. पत्रकारानेसुद्धा जनतेशी जोडून राहावे. पत्रकारितेचे कार्य हे राष्ट्रहित आणि लोकहिताचे असावे.- मोहन कुलकर्णी 

..................

देश समस्यांनी वेढला आहे. प्रत्येक जण आपल्याच कामात व्यस्त आहे. सामान्य माणसावर अन्याय होत असेल, तर पेपर हे माध्यम त्या अन्यायावर आवाज उठवते. पत्रकारितेला सुरुवात केल्यावर एस. एम. जोशी, भाई वैद्य, मोहन धारिया यांची भाषणे ऐकत असे. त्यातूनच मला प्रेरणा मिळत गेली. त्यानंतर १९७१ मध्ये साप्ताहिक सुरू केले. - श्याम आगरवाल 

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाGovernmentसरकारResignationराजीनामा