शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

मोदींना घाबरून अनेकांचे राजीनामे : संबित पात्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2019 11:43 IST

देशाच्या इतिहासात पाश्चात्त्य संस्कृतीला स्थान दिले जाते, ही लाजिरवाणी गोष्ट आहे...

ठळक मुद्दे देवर्षी नारद पत्रकारितागौरव पुरस्कार

पुणे : नरेंद्र मोदींचे सरकार गरीब आणि वंचित लोकांच्या मदतीसाठी निर्माण झालेले सरकार आहे. आताच्या सत्तेत गरिबांना लुटून आपण श्रीमंत होणार नाही, अशी भीती राजकीय पक्षाला बसली असल्याने राजकारणात अनेक वर्षे टिकून राहिलेल्या पक्षातील लोक मोदी सरकारच्या काळात घाबरून राजीनामे देत आहेत. त्यामुळे हा राजकीय पक्ष आपली पिढी चालविण्यास असमर्थ ठरला आहे, असे मत भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी व्यक्त केले. विश्व संवाद केंद्र पश्चिम महाराष्ट्र पुणे आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने देवर्षी नारद पत्रकारितागौरव पुरस्कार समारंभ आयोजिण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. पात्रा यांच्या हस्ते आज का आनंद समूहचे संस्थापक-संपादक श्याम आगरवाल यांना ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार, दिव्य मराठी सोलापूरचे सिद्धाराम पाटील यांना युवा पत्रकार पुरस्कार, बारामतीचे शिवाजी गावडे यांना व्यंगचित्रकार पुरस्कार आणि हिंदुस्थान टाइम्स मराठीचे संपादक विश्वनाथ गरुड यांना सोशल मीडिया पुरस्कार असे चार पुरस्कार प्रदान करण्यात आले.  याप्रसंगी विश्व संवाद केंद्र पश्चिम महाराष्ट्रचे अध्यक्ष मनोहर कुलकर्णी, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष महेश आठवले, आदी उपस्थित होते. ........ * भारतात काळा पैसा बाहेर पडत आहे. आता गरिबांना न्याय मिळवून दिला जात आहे. भ्रष्टाचारी लोकांना भारतात जगणे अवघड झाले आहे. आताच्या सत्तेतून त्यांनी कसलीही अपेक्षा करू नये. आपल्या देशाची संस्कृती पाश्चात्त्य संस्कृतीपेक्षा वेगळी आहे. तरीही देशाच्या इतिहासात पाश्चात्त्य संस्कृतीला स्थान दिले जाते, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. इंग्रज दीडशे वर्षे राज्य करून गेले. पण त्यांचे व्यवस्थापन टिकून राहिले आहे. * भारतवर्षच्या पूर्वजांमध्ये आर्यभट्ट शंकराचार्य असे तज्ज्ञ होऊन गेले. त्यांचे ज्ञान आणि विचार आपण आत्मसात न करता पाश्चात्त्य लोकांच्या विचारांना प्राधान्य देत आहोत. देवर्षी नारद हे पहिले पत्रकार होते. तिन्ही लोकांत ते संचार करीत असत. आपण मदर्स डे, फादर्स डे, व्हॅलेंटाईन डे साजरे करतो. त्याप्रमाणे भारतीय संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी नारद जयंती साजरी केली पाहिजे, असे संबित पात्रा म्हणाले. देवर्षी नारद यांचा आद्य पत्रकार म्हणून उल्लेख केला जातो. ते संदेशवाहक आणि उत्तम संवादपटू होते. लोककल्याण आणि लोकसेवा हा त्यांचा हेतू होता. देवर्षी कर्माला महत्त्व न देता ज्ञानाला महत्त्व देत असत. पत्रकारानेसुद्धा जनतेशी जोडून राहावे. पत्रकारितेचे कार्य हे राष्ट्रहित आणि लोकहिताचे असावे.- मोहन कुलकर्णी 

..................

देश समस्यांनी वेढला आहे. प्रत्येक जण आपल्याच कामात व्यस्त आहे. सामान्य माणसावर अन्याय होत असेल, तर पेपर हे माध्यम त्या अन्यायावर आवाज उठवते. पत्रकारितेला सुरुवात केल्यावर एस. एम. जोशी, भाई वैद्य, मोहन धारिया यांची भाषणे ऐकत असे. त्यातूनच मला प्रेरणा मिळत गेली. त्यानंतर १९७१ मध्ये साप्ताहिक सुरू केले. - श्याम आगरवाल 

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाGovernmentसरकारResignationराजीनामा