शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बिजापूरमध्ये भीषण चकमक; 7 नक्षलवादी ठार, तर 2 जवान शहीद
2
हाहाकार! जमिनीतून अचानक विषारी गॅस बाहेर पडू लागला; धनबादमध्ये मुलाचा मृत्यू, शेकडो पक्षी दगावले
3
India's Squad For T20I vs SA: टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा! हार्दिक पांड्यासह गिलचं कमबॅक!
4
"भारताचे तुकडे झाले, तरच...!"; बांगलादेशच्या माजी लष्करी अधिकाऱ्याचे विषारी फुत्कार, कोण आहेत अब्दुल्लाहिल अमान आजमी?
5
Virat Kohli Century : किंग कोहलीचा 'शतकी रोमान्स'! रायपूरच्या मैदानातही विक्रमांची 'बरसात'
6
मोठी उलथापालथ! ओला इलेक्ट्रीक रसातळाला पोहोचली; नोव्हेंबरच्या रेसमध्ये बाहेर फेकली गेली 
7
कोहली-ऋतुराजचा शतकी धमाका; KL राहुलचं अर्धशतक! टीम इंडियानं द. आफ्रिकेसमोर ठेवलं ३५९ धावांचे लक्ष्य
8
मोठी बातमी! 26/11 हल्ल्यावेळी दहशतवाद्यांशी लढलेले IPS अधिकारी सदानंद दाते राज्याचे नवे पोलीस महासंचालक
9
मायेचं नातं! १२ वर्षांनंतर मुलीने पहिल्यांदाच ऐकला आईचा आवाज; डोळे पाणावणारा Video
10
तुमचे पैसे SBI, HDFC किंवा ICICI बँकेत असेल तर खुशखबर! RBI ने 'या' ३ बँकांसाठी केली मोठी घोषणा
11
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ‘असे’ करा पूजन; पाहा, शुभ मुहूर्त, सोपा विधी अन् काही मान्यता!
12
ॲपलचा विरोध, विरोधकांचाही विरोध! केंद्राचा  'संचार साथी' ॲपवर यू-टर्न, प्री-इंस्टॉल करण्याची अनिवार्यता मागे घेतली...
13
५ मुलांची आई भंगारवाल्याच्या प्रेमात पडली! वयाचाही विचार केला नाही; पतीसमोर बांधली दुसरी लग्नगाठ
14
Ruturaj Gaikwad Maiden Century : पुणेकरानं संधीचं सोनं करुन दाखवलं! या कारणामुळं ऋतुराजची पहिली सेंच्युरी ठरते खास
15
काय सांगता? फक्त स्वत:ला पाहण्यासाठी नाही तर 'या' कारणांसाठी लिफ्टमध्ये असतो आरसा
16
सांगलीतील आष्ट्यातील स्ट्राँगरुमबाहेर महाविकास आघाडीचा गदारोळ; मतांच्या आकडेवारीत तफावत, सुरक्षा नसल्याचाही दावा
17
अल-फलाहचा बनावट कारभार! रोज तयार व्हायची १००-१५० बोगस रुग्णांची यादी; विरोध केल्यास हिंदू कर्मचाऱ्यांचा पगार कापायचे
18
"कपडे घालून या नाहीतर गोळ्या घालू..."; जैन मुनींशी गावगुंडाचे असभ्य वर्तन, समाज संतप्त
19
श्रद्धा कपूरने बॉयफ्रेंड राहुल मोदीला हाताने भरवली 'जापानी डिश', व्हिडीओ व्हायरल
20
दिल्ली कार स्फोटातील मुख्य आरोपी जसीरच्या कोठडीत वाढ! NIA आणखी चौकशी करणार; नेमके आरोप काय? 
Daily Top 2Weekly Top 5

मोदींना घाबरून अनेकांचे राजीनामे : संबित पात्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2019 11:43 IST

देशाच्या इतिहासात पाश्चात्त्य संस्कृतीला स्थान दिले जाते, ही लाजिरवाणी गोष्ट आहे...

ठळक मुद्दे देवर्षी नारद पत्रकारितागौरव पुरस्कार

पुणे : नरेंद्र मोदींचे सरकार गरीब आणि वंचित लोकांच्या मदतीसाठी निर्माण झालेले सरकार आहे. आताच्या सत्तेत गरिबांना लुटून आपण श्रीमंत होणार नाही, अशी भीती राजकीय पक्षाला बसली असल्याने राजकारणात अनेक वर्षे टिकून राहिलेल्या पक्षातील लोक मोदी सरकारच्या काळात घाबरून राजीनामे देत आहेत. त्यामुळे हा राजकीय पक्ष आपली पिढी चालविण्यास असमर्थ ठरला आहे, असे मत भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी व्यक्त केले. विश्व संवाद केंद्र पश्चिम महाराष्ट्र पुणे आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने देवर्षी नारद पत्रकारितागौरव पुरस्कार समारंभ आयोजिण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. पात्रा यांच्या हस्ते आज का आनंद समूहचे संस्थापक-संपादक श्याम आगरवाल यांना ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार, दिव्य मराठी सोलापूरचे सिद्धाराम पाटील यांना युवा पत्रकार पुरस्कार, बारामतीचे शिवाजी गावडे यांना व्यंगचित्रकार पुरस्कार आणि हिंदुस्थान टाइम्स मराठीचे संपादक विश्वनाथ गरुड यांना सोशल मीडिया पुरस्कार असे चार पुरस्कार प्रदान करण्यात आले.  याप्रसंगी विश्व संवाद केंद्र पश्चिम महाराष्ट्रचे अध्यक्ष मनोहर कुलकर्णी, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष महेश आठवले, आदी उपस्थित होते. ........ * भारतात काळा पैसा बाहेर पडत आहे. आता गरिबांना न्याय मिळवून दिला जात आहे. भ्रष्टाचारी लोकांना भारतात जगणे अवघड झाले आहे. आताच्या सत्तेतून त्यांनी कसलीही अपेक्षा करू नये. आपल्या देशाची संस्कृती पाश्चात्त्य संस्कृतीपेक्षा वेगळी आहे. तरीही देशाच्या इतिहासात पाश्चात्त्य संस्कृतीला स्थान दिले जाते, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. इंग्रज दीडशे वर्षे राज्य करून गेले. पण त्यांचे व्यवस्थापन टिकून राहिले आहे. * भारतवर्षच्या पूर्वजांमध्ये आर्यभट्ट शंकराचार्य असे तज्ज्ञ होऊन गेले. त्यांचे ज्ञान आणि विचार आपण आत्मसात न करता पाश्चात्त्य लोकांच्या विचारांना प्राधान्य देत आहोत. देवर्षी नारद हे पहिले पत्रकार होते. तिन्ही लोकांत ते संचार करीत असत. आपण मदर्स डे, फादर्स डे, व्हॅलेंटाईन डे साजरे करतो. त्याप्रमाणे भारतीय संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी नारद जयंती साजरी केली पाहिजे, असे संबित पात्रा म्हणाले. देवर्षी नारद यांचा आद्य पत्रकार म्हणून उल्लेख केला जातो. ते संदेशवाहक आणि उत्तम संवादपटू होते. लोककल्याण आणि लोकसेवा हा त्यांचा हेतू होता. देवर्षी कर्माला महत्त्व न देता ज्ञानाला महत्त्व देत असत. पत्रकारानेसुद्धा जनतेशी जोडून राहावे. पत्रकारितेचे कार्य हे राष्ट्रहित आणि लोकहिताचे असावे.- मोहन कुलकर्णी 

..................

देश समस्यांनी वेढला आहे. प्रत्येक जण आपल्याच कामात व्यस्त आहे. सामान्य माणसावर अन्याय होत असेल, तर पेपर हे माध्यम त्या अन्यायावर आवाज उठवते. पत्रकारितेला सुरुवात केल्यावर एस. एम. जोशी, भाई वैद्य, मोहन धारिया यांची भाषणे ऐकत असे. त्यातूनच मला प्रेरणा मिळत गेली. त्यानंतर १९७१ मध्ये साप्ताहिक सुरू केले. - श्याम आगरवाल 

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाGovernmentसरकारResignationराजीनामा