शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मनोज जरांगे यांचे मुंबईकडे प्रस्थान; आपल्याविरुद्ध षडयंत्र रचल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2024 05:30 IST

थांबविण्यासाठी मराठा समाज बांधवांची कसरत

लोकमत न्यूज नेटवर्कजालना/वडीगोद्री : सलाईनमधून विषप्रयोग करणे, एन्काउंटर करण्यासह इतर मार्गांनी मला संपविण्याचा डाव आखला जात असल्याचा गंभीर आरोप करत मनोज जरांगे-पाटील यांनी बैठकीतूनच मुंबईतील सागर बंगल्याकडे कूच केली. जरांगे यांनी उपचार घ्यावेत आणि नंतर मुंबईकडे जावे, यासाठी त्यांची मनधरणी करताना समाजबांधवांना मोठी कसरत करावी लागली.

जरांगे यांनी रविवारी अंतरवाली सराटी येथे निर्णायक बैठक बोलाविली होती. बैठकीत ते म्हणाले, मी कोणत्याही पक्षाचा नाही. मी समाजाचा आहे. माझ्याविरोधात षडयंत्र रचले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या पाठबळामुळे काही जण समोर येऊन आरोप करीत आहेत. उपोषणात मरू द्यावे, सलाईनमधून विष द्यावे, एन्काउंटर करावे, ४२० दाखल करून जेलमध्ये घालावे, असे फडणवीस यांना वाटते, असा गंभीर आरोपही जरांगे यांनी केला.

...अन् जरांगे निघाले!काहींना पुढे करून पैसा पुरविला जात आहे. आजवर एकाही महिलेची तक्रार माझ्या विरोधात नाही. परंतु, गंभीर आरोप केले जात आहेत, असे जरांगे म्हणाले.माझा बळी घ्यायचा आहे तर मी सागर बंगल्यावर येतो. एक तर माझा बळी देतो किंवा सगेसोयऱ्यांचा कायदा घेऊन येतो, असे म्हणत जरांगे यांनी बैठकीतूनच फडणवीस यांच्या बंगल्याकडे प्रस्थान केले. समाजबांधवांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते कोणाचे ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते.

असा झाला प्रवासदुपारी १ वा. : बैठक सुरु,मनोज जरांगे-पाटील हे मुंबईतील सागर बंगल्यावर जात आहेत. ते अंतरवाली सराटीतून निघाले असून, समाज बांधवाच्या विनंतीनुसार भांबेरी गावात थांबले आहेत. तेथून पैठण, बिडकीन, गंगापूर, येवला, नाशिक, ठाणे आणि मुंबई येथील सागर बंगल्यावर जरांगे पाटील जाणार आहेत.

जरांगे यांना आली भोवळ, भांबेरीत चार तासांचा थांबामुंबईकडे जाण्यासाठी जरांगे-पाटील भांबेरी मार्गे निघाले. परंतु, १६ दिवसांपासून प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांनी मुंबईकडे जाऊ नये, यासाठी समाजबांधव विनवणी करीत होते. काहींनी रस्त्यावर झोपून त्यांना थांबविण्याचा प्रयल केला. परंतु, जरांगे ठाम होते. काही अंतर गेल्यानंतर त्यांना भोवळ आली. त्यानंतर एका वाहनात बसून ते मुंबईकडे निघाले.

या मार्गे जाणार जरांगे-पाटील मुंबईलाभांबेरी गावात जरांगे यांना समाजबांधव, महिलांनी थांबविले. नारायण गडचे महंत शिवाजी महाराज यांनी समाजाच्या विनंतीनुसार जरांगे यांनी जेवण करावे, असा आग्रह केला. त्यानुसार जरांगे यांनी भांबेरी येथे थांबण्यास सहमती दिली. परंतु, उपोषण सोडणार नसल्याचे सांगत चार तास थांबण्यासाठी तयारी दर्शविली. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaratha Reservationमराठा आरक्षण