शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

"मनोज जरांगेंनी सामंजस्याची भूमिका घ्यावी", शंभूराज देसाई यांचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2024 21:04 IST

Shambhuraj Desai : मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून आंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषण सुरु केलं आहे. त्यांच्या उपोषणावर राज्य उत्पादन शुक्ल मंत्री शंभूराज देसाई यांनी भाष्य केलं आहे.

मुंबई : सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसह विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला १३ जुलैपर्यंतचा वेळ दिला होता. मात्र, सरकारला त्यांच्या मागण्या पूर्ण करत आलेल्या नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा पावित्रा घेतला आहे. आजपासून त्यांनी पुन्हा एकदा आंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषण सुरु केलं आहे. त्यांच्या उपोषणावर आता राज्य उत्पादन शुक्ल मंत्री शंभूराज देसाई यांनी भाष्य केलं आहे. शनिवारी शंभूराज देसाई यांनी साताऱ्यात आज टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. 

आंदोलन दरम्यान जे गुन्हे दाखल आहेत. त्यासाठी एक समिती गठीत केली आहे. त्यामध्ये दोन लाखाच्या वर असणारे गुन्हे मागे घेता येत नाहीत. त्याबाबत ही कार्यवाही सुरू आहे. अधिवेशनामध्ये व्यस्त असल्यामुळे हे राहून गेलं आहे. तरीपण आम्ही कार्यरत आहोत, सरकार आपल्या मागण्यांच्या पासून बिलकुल मागे गेलेले नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी समंजस्याची भूमिका घ्यावी. सरकार बिलकुल चाल ढकल करत नाही. जरांगे पाटील यांनी कोणताही आंदोलनाचा मार्ग निवडू नये. आरक्षणाचा लाभ घेताना कोणत्याही एका प्रवर्गातून मिळतो. जे आपण धोरण ठेवले आहे, त्या धोरणाच्या बाहेर सरकार जाणार नाही, असे शंभूराज देसाई म्हणाले.

गेल्या महिन्यात मनोज जरांगे यांनी जे उपोषण केलं. तेव्हा मी त्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली होती. तेव्हा त्यांनी तीन मागण्या मांडल्या होत्या. त्यात सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी, हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्रांचे वाटप आणि मराठा आंदोलकांवरील केस मागे घेण्याच्या मागणीचा समावेश होता. त्यांची भेट घेतल्यानंतर मी स्वत: संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. तसंच सगेसोयऱ्यांच्या ड्राफ्टबाबत माहिती घेतली. त्याचं काम आजही सुरू आहे, हैदराबाद गॅझेटबाबत तेलंगणा सरकारकडे आम्ही कागद पत्रांची मागणी केली आहे. तसंच गुन्हे मागे घेण्याबाबतची कार्यवाही देखील सुरू आहे, त्यामुळे मनोज जरांगे यांच्या मागण्यावर सरकार काम करत आहेत, अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाई यांनी दिली.

याचबरोबर, मुलींच्या मोफत शिक्षणाबाबत आठ लाखाचं ज्या पालकांचे उत्पन्न आहे. त्यांना मोफत शिक्षणाचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामध्ये साडेतीनशेहून अधिक कोर्सेस आहेत, यामध्ये पावणे दोन हजार कोटी रुपयांची तरतूदही अर्थसंकल्पामध्ये केली आहे. मनोज जरांगे पाटील यांना काही स्पष्टता हवी असेल तर त्या जीआरनुसार करून दिली जाईल, असं शंभुराज देसाई म्हणाले. तसंच, मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर टीका केली होती. याबाबतही शंभूराज देसाई यांनी भाष्य केलं. लाडका भाऊ, लाडकी बहीण या योजनांबाबत मनोज जरांगे पाटील यांनी टीका करू नये. मनोज जरांगे पाटील मराठा समाजासाठी लढा उभा करता आहेत. त्यांच्यासोबत आम्ही आहोत. सरकार एवढं अनेक योजनांमधून चांगलं निर्णय घेतंय. सरकारने केवळ घोषणा केलेल्या नाहीत, त्यांची अंमलबजावणी देखील सुरु केली आहे, असं शंभुराज देसाई म्हणाले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलShambhuraj Desaiशंभूराज देसाईMaratha Reservationमराठा आरक्षणMaharashtraमहाराष्ट्र