शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

"मनोज जरांगेंनी सामंजस्याची भूमिका घ्यावी", शंभूराज देसाई यांचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2024 21:04 IST

Shambhuraj Desai : मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून आंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषण सुरु केलं आहे. त्यांच्या उपोषणावर राज्य उत्पादन शुक्ल मंत्री शंभूराज देसाई यांनी भाष्य केलं आहे.

मुंबई : सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसह विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला १३ जुलैपर्यंतचा वेळ दिला होता. मात्र, सरकारला त्यांच्या मागण्या पूर्ण करत आलेल्या नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा पावित्रा घेतला आहे. आजपासून त्यांनी पुन्हा एकदा आंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषण सुरु केलं आहे. त्यांच्या उपोषणावर आता राज्य उत्पादन शुक्ल मंत्री शंभूराज देसाई यांनी भाष्य केलं आहे. शनिवारी शंभूराज देसाई यांनी साताऱ्यात आज टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. 

आंदोलन दरम्यान जे गुन्हे दाखल आहेत. त्यासाठी एक समिती गठीत केली आहे. त्यामध्ये दोन लाखाच्या वर असणारे गुन्हे मागे घेता येत नाहीत. त्याबाबत ही कार्यवाही सुरू आहे. अधिवेशनामध्ये व्यस्त असल्यामुळे हे राहून गेलं आहे. तरीपण आम्ही कार्यरत आहोत, सरकार आपल्या मागण्यांच्या पासून बिलकुल मागे गेलेले नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी समंजस्याची भूमिका घ्यावी. सरकार बिलकुल चाल ढकल करत नाही. जरांगे पाटील यांनी कोणताही आंदोलनाचा मार्ग निवडू नये. आरक्षणाचा लाभ घेताना कोणत्याही एका प्रवर्गातून मिळतो. जे आपण धोरण ठेवले आहे, त्या धोरणाच्या बाहेर सरकार जाणार नाही, असे शंभूराज देसाई म्हणाले.

गेल्या महिन्यात मनोज जरांगे यांनी जे उपोषण केलं. तेव्हा मी त्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली होती. तेव्हा त्यांनी तीन मागण्या मांडल्या होत्या. त्यात सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी, हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्रांचे वाटप आणि मराठा आंदोलकांवरील केस मागे घेण्याच्या मागणीचा समावेश होता. त्यांची भेट घेतल्यानंतर मी स्वत: संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. तसंच सगेसोयऱ्यांच्या ड्राफ्टबाबत माहिती घेतली. त्याचं काम आजही सुरू आहे, हैदराबाद गॅझेटबाबत तेलंगणा सरकारकडे आम्ही कागद पत्रांची मागणी केली आहे. तसंच गुन्हे मागे घेण्याबाबतची कार्यवाही देखील सुरू आहे, त्यामुळे मनोज जरांगे यांच्या मागण्यावर सरकार काम करत आहेत, अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाई यांनी दिली.

याचबरोबर, मुलींच्या मोफत शिक्षणाबाबत आठ लाखाचं ज्या पालकांचे उत्पन्न आहे. त्यांना मोफत शिक्षणाचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामध्ये साडेतीनशेहून अधिक कोर्सेस आहेत, यामध्ये पावणे दोन हजार कोटी रुपयांची तरतूदही अर्थसंकल्पामध्ये केली आहे. मनोज जरांगे पाटील यांना काही स्पष्टता हवी असेल तर त्या जीआरनुसार करून दिली जाईल, असं शंभुराज देसाई म्हणाले. तसंच, मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर टीका केली होती. याबाबतही शंभूराज देसाई यांनी भाष्य केलं. लाडका भाऊ, लाडकी बहीण या योजनांबाबत मनोज जरांगे पाटील यांनी टीका करू नये. मनोज जरांगे पाटील मराठा समाजासाठी लढा उभा करता आहेत. त्यांच्यासोबत आम्ही आहोत. सरकार एवढं अनेक योजनांमधून चांगलं निर्णय घेतंय. सरकारने केवळ घोषणा केलेल्या नाहीत, त्यांची अंमलबजावणी देखील सुरु केली आहे, असं शंभुराज देसाई म्हणाले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलShambhuraj Desaiशंभूराज देसाईMaratha Reservationमराठा आरक्षणMaharashtraमहाराष्ट्र