शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

"कितीही जळाला तरी..."; फुलं उधळण्यावरून टीका करणाऱ्यांचा जरांगेंनी घेतला समाचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 12:11 IST

आज समाज ताकदीनं एकत्र येतोय, दुसरं काम सोडून मराठा समाज एकजूट दाखवतोय. त्याचा आनंद वाटतो असं जरांगे पाटील म्हणाले.

छत्रपती संभाजीनगर - गेली ७० वर्ष गोरगरिब मराठ्यांच्या लेकरांनी आरक्षणाची वाट पाहिली. आता कुठेतरी राज्यात ३२ लाख लोकांना आरक्षण मिळाले आहे. सातत्याने कुणबी नोंदी आढळतायेत. त्यामुळे मराठा समाजात आनंद आहे. मी समाजाला मायबाप मानलंय, त्यामुळे तेदेखील लेकरांप्रमाणे माझे स्वागत करतायेत. ज्याला वाटतंय त्याला आम्ही नाही म्हटलं तरी आमच्यावर फुले उधळतोय. हे आमच्यातले प्रेम आहे. ज्यांच्यावर फुले उधळली जात नाहीत तो कितीही जळाला तरी आमचा समाज एकमेकांवर माया लावतो.आम्ही एकमेकांच्या लेकरांसाठी लढतोय म्हणून समाज जीव लावतो. तुम्ही राजकीय फायद्यासाठी लढताय तुमच्यावर कोण फुले उधळतील असा टोला मनोज जरांगे पाटील यांनी टीकाकारांना लगावला आहे. 

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आज समाज ताकदीनं एकत्र येतोय, दुसरं काम सोडून मराठा समाज एकजूट दाखवतोय. त्याचा आनंद वाटतो. दौऱ्यावेळी मी वेळेत पोहचू शकत नाही, ज्या रस्त्याने जाणार त्या मार्गावरील गावातील लोकं स्वागतासाठी उभं राहतात. त्यांना भेटणे आवश्यक आहे. मराठा समाज एकजूट होणार नाही असं बोलले जात होते.परंतु आज समाज एकत्र आला. गोरगरिबांच्या लेकरांसाठी लढतोय त्यामुळे समाज एकत्र येतो. हॉस्पिटलमधून आज डिस्चार्ज मिळाला असून अंतरवाली सराटीला जाईन. उपचारानंतर तब्येत चांगली झालीय. त्यामुळे १ डिसेंबरपासून महाराष्ट्र दौरा सुरू होईल. १२ डिसेंबरपर्यंत हा दौरा चालेल. जालना इथं मोठा कार्यक्रम १ तारखेला होणार आहे. मराठा समाज प्रचंड संख्येने एकजूट झालाय. त्यामुळे गर्दी, गाठीभेटी यामुळे रात्रंदिवस जागल्याने त्रास होतोय, पण डॉक्टरांनी आता तपासले आहे. त्यामुळे पुन्हा समाजाच्या दर्शनसाठी चाललोय असं त्यांनी सांगितले. 

तुमच्या लोकांना थांबवा, मग सल्ला ऐकतो

मराठा समाजाला सरकारने गांभीर्याने घेतले आहे. आम्ही थंड होत नाही. जे आमच्या हक्काचे आहे ते आम्हाला द्या. त्यामुळे टिकवणारे आरक्षण देण्याची कसरत तुम्हाला करावी लागणार नाही. त्याशिवाय तुमचे जे लोक आहेत त्यांना सबुरीनं घ्यायला सांगा. त्यांना थांबवा. ते बोलले नाही तर आम्ही बोलत नाही. तुमच्या लोकांना थांबवा, तुमचा सल्ला ऐकतो असं प्रत्युत्तर मनोज जरांगे पाटील यांनी प्रफुल पटेल यांना दिले.

भुजबळांचे नाव न घेता टीका

पदाला चिटकून बसणारे हे लोक आहेत. गरळ ओकणारे आहेत. त्यामुळे राजीनामा देण्यासाठी मोठे मन लागते.राजकारण्यांना सल्ले कोण देणार, त्यांचे ते बघतील. कायद्याच्या पद्यावर बसून जातीय तेढ निर्माण करायचे, त्याचा गैरवापर करायचा यांना फार महत्व देण्याची गरज नाही. राजीनाम दिला तरी आम्हाला त्याचा फायदा काय? भावना नीट नसल्याने माणसाला सल्ले का द्यायचे आणि आपण इतके मोठे नाही सल्ला द्यायला.जुनाट लोकांना आपण सल्ला देत नाही अशा शब्दात जरांगेंनी नाव न घेता भुजबळांवर पुन्हा निशाणा साधला. 

शेतकऱ्यांना तातडीनं मदत करा

शेतकरी आणि त्याची जात बघणार नाही. परंतु आज अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालंय, त्यांना तातडीने सरकारने मदत द्यायला हवी. शेतकऱ्यांना वाचवणारे कुणी नाही.वर्षभर कष्ट करून हातातोंडाला आलेला घास जातो. त्याच्या डोळ्यातील अश्रू पुसायला कुणी नसते. त्यामुळे सरकारने तातडीने पंचनामा करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणChhagan Bhujbalछगन भुजबळ