शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

"कितीही जळाला तरी..."; फुलं उधळण्यावरून टीका करणाऱ्यांचा जरांगेंनी घेतला समाचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 12:11 IST

आज समाज ताकदीनं एकत्र येतोय, दुसरं काम सोडून मराठा समाज एकजूट दाखवतोय. त्याचा आनंद वाटतो असं जरांगे पाटील म्हणाले.

छत्रपती संभाजीनगर - गेली ७० वर्ष गोरगरिब मराठ्यांच्या लेकरांनी आरक्षणाची वाट पाहिली. आता कुठेतरी राज्यात ३२ लाख लोकांना आरक्षण मिळाले आहे. सातत्याने कुणबी नोंदी आढळतायेत. त्यामुळे मराठा समाजात आनंद आहे. मी समाजाला मायबाप मानलंय, त्यामुळे तेदेखील लेकरांप्रमाणे माझे स्वागत करतायेत. ज्याला वाटतंय त्याला आम्ही नाही म्हटलं तरी आमच्यावर फुले उधळतोय. हे आमच्यातले प्रेम आहे. ज्यांच्यावर फुले उधळली जात नाहीत तो कितीही जळाला तरी आमचा समाज एकमेकांवर माया लावतो.आम्ही एकमेकांच्या लेकरांसाठी लढतोय म्हणून समाज जीव लावतो. तुम्ही राजकीय फायद्यासाठी लढताय तुमच्यावर कोण फुले उधळतील असा टोला मनोज जरांगे पाटील यांनी टीकाकारांना लगावला आहे. 

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आज समाज ताकदीनं एकत्र येतोय, दुसरं काम सोडून मराठा समाज एकजूट दाखवतोय. त्याचा आनंद वाटतो. दौऱ्यावेळी मी वेळेत पोहचू शकत नाही, ज्या रस्त्याने जाणार त्या मार्गावरील गावातील लोकं स्वागतासाठी उभं राहतात. त्यांना भेटणे आवश्यक आहे. मराठा समाज एकजूट होणार नाही असं बोलले जात होते.परंतु आज समाज एकत्र आला. गोरगरिबांच्या लेकरांसाठी लढतोय त्यामुळे समाज एकत्र येतो. हॉस्पिटलमधून आज डिस्चार्ज मिळाला असून अंतरवाली सराटीला जाईन. उपचारानंतर तब्येत चांगली झालीय. त्यामुळे १ डिसेंबरपासून महाराष्ट्र दौरा सुरू होईल. १२ डिसेंबरपर्यंत हा दौरा चालेल. जालना इथं मोठा कार्यक्रम १ तारखेला होणार आहे. मराठा समाज प्रचंड संख्येने एकजूट झालाय. त्यामुळे गर्दी, गाठीभेटी यामुळे रात्रंदिवस जागल्याने त्रास होतोय, पण डॉक्टरांनी आता तपासले आहे. त्यामुळे पुन्हा समाजाच्या दर्शनसाठी चाललोय असं त्यांनी सांगितले. 

तुमच्या लोकांना थांबवा, मग सल्ला ऐकतो

मराठा समाजाला सरकारने गांभीर्याने घेतले आहे. आम्ही थंड होत नाही. जे आमच्या हक्काचे आहे ते आम्हाला द्या. त्यामुळे टिकवणारे आरक्षण देण्याची कसरत तुम्हाला करावी लागणार नाही. त्याशिवाय तुमचे जे लोक आहेत त्यांना सबुरीनं घ्यायला सांगा. त्यांना थांबवा. ते बोलले नाही तर आम्ही बोलत नाही. तुमच्या लोकांना थांबवा, तुमचा सल्ला ऐकतो असं प्रत्युत्तर मनोज जरांगे पाटील यांनी प्रफुल पटेल यांना दिले.

भुजबळांचे नाव न घेता टीका

पदाला चिटकून बसणारे हे लोक आहेत. गरळ ओकणारे आहेत. त्यामुळे राजीनामा देण्यासाठी मोठे मन लागते.राजकारण्यांना सल्ले कोण देणार, त्यांचे ते बघतील. कायद्याच्या पद्यावर बसून जातीय तेढ निर्माण करायचे, त्याचा गैरवापर करायचा यांना फार महत्व देण्याची गरज नाही. राजीनाम दिला तरी आम्हाला त्याचा फायदा काय? भावना नीट नसल्याने माणसाला सल्ले का द्यायचे आणि आपण इतके मोठे नाही सल्ला द्यायला.जुनाट लोकांना आपण सल्ला देत नाही अशा शब्दात जरांगेंनी नाव न घेता भुजबळांवर पुन्हा निशाणा साधला. 

शेतकऱ्यांना तातडीनं मदत करा

शेतकरी आणि त्याची जात बघणार नाही. परंतु आज अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालंय, त्यांना तातडीने सरकारने मदत द्यायला हवी. शेतकऱ्यांना वाचवणारे कुणी नाही.वर्षभर कष्ट करून हातातोंडाला आलेला घास जातो. त्याच्या डोळ्यातील अश्रू पुसायला कुणी नसते. त्यामुळे सरकारने तातडीने पंचनामा करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणChhagan Bhujbalछगन भुजबळ